शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Lok sabha 2024: ‘हातकणंगले’तून नकार, ‘कोल्हापुरा’तून रिंगणात उतरणार - चेतन नरके 

By भीमगोंड देसाई | Updated: March 28, 2024 14:28 IST

तीन-चार पक्षांनी दिला आहे प्रस्ताव, विजयासाठी लढणार

कोल्हापूर : हातकणंगले मतदार संघातून निवडणूक लढण्यास नकार देत ‘कोल्हापूर’ मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा ‘गोकुळ’चे संचालक चेतन नरके यांनी आज, गुरूवारी पत्रकार परिषदेत केली. यामुळे कोल्हापुरात आता तिरंगी लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले.

गेल्या तीन वर्षापासून कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे. माझा संपर्क आणि कामाच्या आवाक्यामुळे शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून लढण्याची ऑफर दिली होती. मात्र कमी दिवसांत मतदारसंघातील सर्व गावांत पोहचणे शक्य नसल्याने मी हातकणंगलेतून लढण्यास नम्रपणे नकार दिला आहे. पण ‘कोल्हापूर’ मतदारसंघातून मी निवडणूक लढवणार आहे. तीन ते चार पक्ष माझ्या संपर्कात आहे. कोणत्या पक्षाकडून लढणार हे मी लवकरच जाहीर करेन, अशी माहिती ‘गोकुळ’चे संचालक चेतन नरके यांनी दिली.ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या बैठकीत हातकणंगलेतून माझे नावे पुढे आले होते. पण मी या मतदारसंघातून लढण्यास नकार दिला आहे. कोल्हापुरातून तयारी केली आहे. या मतदारसंघातून जिंकण्यासाठी लढणार आहे. कोल्हापूरसाठी मी संपर्क मोहीम गतीमान केली आहे. या मतदारसंघातून महाविकास आघाडीतून दुसरे नाव पुढे आले तरी मी अजून निवडणूक रिंगणातून एक्झिट घेेतलेलो नाही. मी रिंगणार राहणार आहे. पक्ष, गट कोणता हे मी आगामी काळात जाहीर करेन. कोल्हापूरची जनता स्वाभिमानी, विकासाला प्राधान्य देते. माझ्याकडे विकास करण्याची क्षमता आहे. यामुळे मतदार तिसरा पर्याय म्हणून माझा निश्चित विचार करतील.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरlok sabhaलोकसभाPoliticsराजकारण