शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
5
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
6
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
7
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
8
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
9
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
10
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
11
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
12
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
13
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
14
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
15
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
16
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
17
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
18
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
19
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
20
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप

रसायनयुक्त सांडपाणी थेट गटारीत

By admin | Updated: February 2, 2015 00:10 IST

इचलकरंजीतील प्रकार : पंचगंगा प्रदूषण प्रश्न पुन्हा चर्चेत

इचलकरंजी : येथील आदर्श मंगल कार्यालयासमोर असलेल्या गटारीमधून गेल्या सहा दिवसांपासून प्रोसेसिंग हाऊसचे रसायनयुक्त सांडपाणी बाहेर पडत आहे. आज, रविवारी दुपारी मोठ्या प्रमाणात गटारीतून पाणी रस्त्यावर बाहेर पडत होते. त्यामुळे या परिसरातील नागरिकांच्या आरोग्याबरोबरच पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येत आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने मात्र नेहमीप्रमाणे याकडे दुर्लक्ष केले आहे. इचलकरंजीतील प्रोसेसर्स हाऊसचे रसायनयुक्त सांडपाणी प्रक्रिया करून सोडण्यासाठी क्लस्टर योजनेच्या माध्यमातून सीईटीपी प्रकल्प उभारण्यात आला आहे. असे असताना काही प्रोसेसर्सधारक सीईटीपीला जोडणी करूनही काही प्रमाणात रसायनयुक्त सांडपाणी गटारीत सोडतात. त्यामुळे विनाप्रक्रिया हे रसायनयुक्त सांडपाणी थेट पंचगंगा नदीत मिसळते. येथील आदर्श मंगल कार्यालयासमोर असलेल्या गटारीच्या झाकणामधून आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणात पिवळ्या रंगाचे रसायनयुक्त सांडपाणी बाहेर येऊ लागले. या परिसरातील एका नागरिकाचा पाय पाण्यात गेल्याने त्याला किरकोळ इजाही झाली. त्यामुळे नगरसेवक प्रमोद पाटील व मदन झोरे यांनी त्याठिकाणी जाऊन सीईटीपी व प्रोसेसर्सधारकांना बोलावून घेतले. परिसरातील ३० ते ४० प्रोसेसर्सधारक त्याठिकाणी आले होते. हे पाणी नेमक्या कोणत्या प्रोसेसर्समधून बाहेर पडत आहे, हे पाहण्यासाठी गत दोन दिवसांपासून आम्ही आमचे प्रोसेसर्स हाऊस बंद ठेवले आहेत. तरीही पाणी येतच आहे. आम्ही आमचे सांडपाणी सीईटीपीला प्रकल्पाला जोडले असून, त्यासाठी येणारा खर्चही नियमित सीईटीपीकडे भरत आहोत. त्यामुळे गटारीत पाणी सोडण्याचा प्रश्नच येत नाही, अशी भूमिका प्रोसेसर्सधारकांनी घेतली. तसेच सीईटीपीने उपलब्ध करून दिलेल्या पाईपलाईन कमी रुंदीच्या असल्याने त्यामधून ओव्हर प्लो होऊन हे पाणी बाहेर पडत असेल, असेही काहींनी सांगितले. त्यावर सीईटीपी प्रशासनाने आणखीन एक पंप बसवून हे पाणी ओढून घेण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले आहे.दरम्यान, गेल्या सहा दिवसांपासून हे पाणी विनाप्रक्रिया थेट गटारीतून जात आहे. त्याचबरोबर शहरातील अन्य कोणकोणत्या भागात अशा प्रकारे सीईटीपीच्या भोंगळ कारभारामुळे पाणी गटारीतून थेट पंचगंगा नदीत जाते, हेही तपासून पाहण्याची गरज असल्याचे घटनास्थळी बोलले जात होते. (प्रतिनिधी)