शहरं
Join us  
Trending Stories
1
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
2
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
3
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
4
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
5
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
6
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
7
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
8
Rana Daggubati Weight Loss: नॉनव्हेज पूर्ण बंद, मीठ कमी आणि...; तब्बल ३० किलो वजन घटवण्याचा 'भल्लालदेव' फॉर्म्युला
9
शिक्षणासाठी रशियाला गेला, युक्रेन युद्धात मृत्यू झाला; आधीच MEA कडून सुरक्षा मागितली होती
10
ढाका येथे उच्चायुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन; बांगलादेशी कट्टरपंथी नेत्याची भारताला पोकळ धमकी
11
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
12
Ram Sutar Death: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
13
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
14
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
15
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
16
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
17
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
18
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
19
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
20
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत पाटील यांच्याकडून फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:13 IST

कोल्हापूर : शेतकरी आंदोलनाची आग विझविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा ‘फायर ब्रिगेड’ सारखा वापर केला. चंद्रकांत पाटील यांच्या अंगात कोल्हापूरचे पाणी असल्याने त्यांच्यावर आम्ही विश्वास टाकला; पण त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली अशी टीका अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित ...

कोल्हापूर : शेतकरी आंदोलनाची आग विझविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा ‘फायर ब्रिगेड’ सारखा वापर केला. चंद्रकांत पाटील यांच्या अंगात कोल्हापूरचे पाणी असल्याने त्यांच्यावर आम्ही विश्वास टाकला; पण त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली अशी टीका अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी रविवारी कोल्हापुरात केली. आई-बापांच्या प्रश्नाचेभांडवल करायचे आणि मलिदा मिळाला की त्यांना विसरायचे हे उद्योग बंद करा, अशा शब्दांत त्यांनीशेतकरी संघटनांच्या नेत्यांवर शरसंधान साधले.डॉ. नवले म्हणाले, शेतकरी संपाची आग विझवण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी तर ‘लाँग मार्च’वेळी गिरीश महाजन यांचा वापर केला. चंद्रकांत पाटील यांच्यावर आम्ही विश्वास टाकला; पण शेतकºयांची फसवणूक केली. पाटीलसाहेब जरा जपून, देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील अनेकांना नेम धरून गार केले आहे, तुम्हालाही कधी गार करतील हे सांगता येत नसल्याचा टोलाही त्यांनी हाणला.‘लॉँग मार्च’च्या आंदोलनातून शेतकरी संघटनांनी बोध घेण्याची गरज आहे. शेतकरी आई-बापाच्या प्रश्नांचे भांडवल करायचे आणि मलिदा दिसला की त्यांना विसरायचे, लाज वाटली पाहिजे. अहंकार व स्वत:च्या राजकारणासाठी शेतकºयांच्या प्रश्नांचे भांडवल करण्याचे शुद्र राजकारण थांबवा. भाडोत्री सैन्यांवर नव्हे तरघरचे खाऊन लढाई जिंकता येते,ही शिकवण शिवाजी महाराजांनी दिली.‘स्वाभिमानी’ नाव लावणे वेगळे आणि प्रत्यक्षात जगणे वेगळे असा टोला लगावत आमदार, खासदारकी डोळ्यांसमोर ठेवून चौकात आणि चौकाबाहेर लढाई करण्याची नाटके बंद करा. राजकीय झेंडे, स्वार्थ, महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून शेतकरी जमात म्हणून एकत्र या, असे आवाहन नवले यांनी केले.मलाच उठाबशा काढायला लावल्याशेतकºयांच्या प्रश्नांसाठी सगळ्यांना एकत्र आणले, पण त्यांच्यातील मतभेद मिटवण्यात यश आले नाही. मानापमान, एकमेकांना कोपरखळ्या मारण्यात व जिरवण्यात ही मंडळी धन्यता मानतात. सगळ्यांच्या ताकदीवर सरकारला उठाबशा काढायला लावणार होतो, पण निमंत्रक म्हणून या शेतकरी नेत्यांनीच मला उठाबशा काढायला लावल्या, अशा शब्दांत शेतकरी संघटनांच्या नेत्यांचा नवले यांनी समाचार घेतला.