शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
2
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
3
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
4
सणासुदीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण; खरेदीपूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याची नवी किंमत
5
'शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचे नाव सेंट मेरी करा'; आमदाराच्या मागणीला CM सिद्धरामय्यांचा होकार
6
Navratri 2025: नवरात्रीची सुरुवात कधीपासून? घटस्थापनेचे महत्त्व, नऊ रंग आणि उत्सवाची पार्श्वभूमी जाणून घ्या
7
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
8
"तुमची मुलगी नक्षलवादी आहे, तिचे आधारकार्ड द्या !" पोलिसांना माओवाद आणि मार्क्सवाद यातील फरक समजत नाही का?
9
विश्रांतीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार 'अँक्शन मोड'मध्ये! प्रशासनाला दिले महत्त्वाचे आदेश
10
पत्नीचं अफेअर, घराच्या छतावर चाळे करताना पतीने बॉयफ्रेंडसह पकडलं, त्यानंतर दिली ऐकून थरकाप उडेल अशी शिक्षा
11
भारतात राहून पोस्ट ग्रॅजुएशन अन् देशालाच उडवण्याची योजना; पोलिसांनी सांगितले अटक केलेल्या ५ दहशतवाद्यांचे मनसुबे! 
12
साखरेच्या डब्यात मुंग्याच मुंग्या; पाहून डोक्याचा होतो भुगा, 'या' घरगुती उपायाने होतील छूमंतर
13
भारतासाठी T20I मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे ५ फिरकीपटू!
14
VIDEO: बापरे... मगर आणि पाणघोडा आले समोरासमोर, दोघांमध्ये तुफान जुंपली... कोण जिंकलं?
15
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
16
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
17
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
18
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
19
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी

चंद्रकांत पाटील यांच्याकडून फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:13 IST

कोल्हापूर : शेतकरी आंदोलनाची आग विझविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा ‘फायर ब्रिगेड’ सारखा वापर केला. चंद्रकांत पाटील यांच्या अंगात कोल्हापूरचे पाणी असल्याने त्यांच्यावर आम्ही विश्वास टाकला; पण त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली अशी टीका अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित ...

कोल्हापूर : शेतकरी आंदोलनाची आग विझविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा ‘फायर ब्रिगेड’ सारखा वापर केला. चंद्रकांत पाटील यांच्या अंगात कोल्हापूरचे पाणी असल्याने त्यांच्यावर आम्ही विश्वास टाकला; पण त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली अशी टीका अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी रविवारी कोल्हापुरात केली. आई-बापांच्या प्रश्नाचेभांडवल करायचे आणि मलिदा मिळाला की त्यांना विसरायचे हे उद्योग बंद करा, अशा शब्दांत त्यांनीशेतकरी संघटनांच्या नेत्यांवर शरसंधान साधले.डॉ. नवले म्हणाले, शेतकरी संपाची आग विझवण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी तर ‘लाँग मार्च’वेळी गिरीश महाजन यांचा वापर केला. चंद्रकांत पाटील यांच्यावर आम्ही विश्वास टाकला; पण शेतकºयांची फसवणूक केली. पाटीलसाहेब जरा जपून, देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील अनेकांना नेम धरून गार केले आहे, तुम्हालाही कधी गार करतील हे सांगता येत नसल्याचा टोलाही त्यांनी हाणला.‘लॉँग मार्च’च्या आंदोलनातून शेतकरी संघटनांनी बोध घेण्याची गरज आहे. शेतकरी आई-बापाच्या प्रश्नांचे भांडवल करायचे आणि मलिदा दिसला की त्यांना विसरायचे, लाज वाटली पाहिजे. अहंकार व स्वत:च्या राजकारणासाठी शेतकºयांच्या प्रश्नांचे भांडवल करण्याचे शुद्र राजकारण थांबवा. भाडोत्री सैन्यांवर नव्हे तरघरचे खाऊन लढाई जिंकता येते,ही शिकवण शिवाजी महाराजांनी दिली.‘स्वाभिमानी’ नाव लावणे वेगळे आणि प्रत्यक्षात जगणे वेगळे असा टोला लगावत आमदार, खासदारकी डोळ्यांसमोर ठेवून चौकात आणि चौकाबाहेर लढाई करण्याची नाटके बंद करा. राजकीय झेंडे, स्वार्थ, महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून शेतकरी जमात म्हणून एकत्र या, असे आवाहन नवले यांनी केले.मलाच उठाबशा काढायला लावल्याशेतकºयांच्या प्रश्नांसाठी सगळ्यांना एकत्र आणले, पण त्यांच्यातील मतभेद मिटवण्यात यश आले नाही. मानापमान, एकमेकांना कोपरखळ्या मारण्यात व जिरवण्यात ही मंडळी धन्यता मानतात. सगळ्यांच्या ताकदीवर सरकारला उठाबशा काढायला लावणार होतो, पण निमंत्रक म्हणून या शेतकरी नेत्यांनीच मला उठाबशा काढायला लावल्या, अशा शब्दांत शेतकरी संघटनांच्या नेत्यांचा नवले यांनी समाचार घेतला.