शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांत पाटील यांच्याकडून फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2018 00:13 IST

कोल्हापूर : शेतकरी आंदोलनाची आग विझविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा ‘फायर ब्रिगेड’ सारखा वापर केला. चंद्रकांत पाटील यांच्या अंगात कोल्हापूरचे पाणी असल्याने त्यांच्यावर आम्ही विश्वास टाकला; पण त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली अशी टीका अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित ...

कोल्हापूर : शेतकरी आंदोलनाची आग विझविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांचा ‘फायर ब्रिगेड’ सारखा वापर केला. चंद्रकांत पाटील यांच्या अंगात कोल्हापूरचे पाणी असल्याने त्यांच्यावर आम्ही विश्वास टाकला; पण त्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केली अशी टीका अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी रविवारी कोल्हापुरात केली. आई-बापांच्या प्रश्नाचेभांडवल करायचे आणि मलिदा मिळाला की त्यांना विसरायचे हे उद्योग बंद करा, अशा शब्दांत त्यांनीशेतकरी संघटनांच्या नेत्यांवर शरसंधान साधले.डॉ. नवले म्हणाले, शेतकरी संपाची आग विझवण्यासाठी चंद्रकांत पाटील यांनी तर ‘लाँग मार्च’वेळी गिरीश महाजन यांचा वापर केला. चंद्रकांत पाटील यांच्यावर आम्ही विश्वास टाकला; पण शेतकºयांची फसवणूक केली. पाटीलसाहेब जरा जपून, देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळातील अनेकांना नेम धरून गार केले आहे, तुम्हालाही कधी गार करतील हे सांगता येत नसल्याचा टोलाही त्यांनी हाणला.‘लॉँग मार्च’च्या आंदोलनातून शेतकरी संघटनांनी बोध घेण्याची गरज आहे. शेतकरी आई-बापाच्या प्रश्नांचे भांडवल करायचे आणि मलिदा दिसला की त्यांना विसरायचे, लाज वाटली पाहिजे. अहंकार व स्वत:च्या राजकारणासाठी शेतकºयांच्या प्रश्नांचे भांडवल करण्याचे शुद्र राजकारण थांबवा. भाडोत्री सैन्यांवर नव्हे तरघरचे खाऊन लढाई जिंकता येते,ही शिकवण शिवाजी महाराजांनी दिली.‘स्वाभिमानी’ नाव लावणे वेगळे आणि प्रत्यक्षात जगणे वेगळे असा टोला लगावत आमदार, खासदारकी डोळ्यांसमोर ठेवून चौकात आणि चौकाबाहेर लढाई करण्याची नाटके बंद करा. राजकीय झेंडे, स्वार्थ, महत्त्वाकांक्षा बाजूला ठेवून शेतकरी जमात म्हणून एकत्र या, असे आवाहन नवले यांनी केले.मलाच उठाबशा काढायला लावल्याशेतकºयांच्या प्रश्नांसाठी सगळ्यांना एकत्र आणले, पण त्यांच्यातील मतभेद मिटवण्यात यश आले नाही. मानापमान, एकमेकांना कोपरखळ्या मारण्यात व जिरवण्यात ही मंडळी धन्यता मानतात. सगळ्यांच्या ताकदीवर सरकारला उठाबशा काढायला लावणार होतो, पण निमंत्रक म्हणून या शेतकरी नेत्यांनीच मला उठाबशा काढायला लावल्या, अशा शब्दांत शेतकरी संघटनांच्या नेत्यांचा नवले यांनी समाचार घेतला.