शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
2
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
3
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
4
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
5
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
6
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
7
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
8
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
9
एक चूक अन् मिळाला १४ कोटी पगार; सुपरवायझरची गेली नोकरी
10
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
11
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
12
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
13
रक्त चाचणी आता होईल केवळ ५८२ रुपयांत; हिमोफिलिया, व्हॉन विलेब्रडग्रस्तांचे पैसे वाचणार
14
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
15
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
16
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
17
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
18
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
19
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
20
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर

आरोपांच्या फैरी झडू लागल्या

By admin | Updated: July 17, 2015 23:02 IST

शिरोळ तालुका : ९४१ उमेदवारांचे भवितव्य मतदारांच्या हाती

संदीप बावचे- शिरोळ  तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज माघारीनंतर आघाड्यांचे चित्र स्पष्ट झाले आहे. तालुक्यात ७४ जागा बिनविरोध झाल्या असून, आता ३२ ग्रामपंचायतींसाठी लढत होणार आहे. एकूण ग्रामपंचायत सदस्यांच्या ३५१ जागांसाठी ९४१ उमेदवार रिंगणात आहेत. या सर्वांचे भवितव्य आता मतदारांच्या हाती आहे. दरम्यान, बुहतांशी ठिकाणी सत्ताधारी व विरोधी गटाकडून प्रचाराचा नारळ फुटला असून, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फेरी झडू लागल्याने गावातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. शिरोळ तालुक्यातील ३३ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता. पैकी बुबनाळ ग्रामस्थांनी इतिहास घडविताना संपूर्ण अकरा जागांवरती महिलांना बिनविरोध निवडून आणून जिल्ह्यात आदर्श निर्माण केला आहे, तर कोथळी, शिरढोण, शेडशाळ, जुने दानवाड व मजरेवाडी येथे बहुतांशी जागा बिनविरोध झाल्या. मात्र, संपूर्ण जागा बिनविरोध करण्यात नेत्यांना अपयश आले. काही गावांत निवडणूक बिनविरोध पार पाडण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली. जेथे बिनविरोध निवडणुका झाल्या त्याठिकाणी अर्ज माघारीसाठी गट नेत्यांना विनवणी करावी लागली. गावातील इतर संस्थांवर संधी देण्याचे आश्वासन देण्याबरोबरच काही उमेदवारांनी यासाठी आर्थिक उलाढालही घडवून आणली. तालुक्यात ३२ ग्रामपंचायतींच्या ३५१ जागांसाठी ९४१ उमेदवार आपले भवितव्य आजमावत आहेत. तालुक्यात राजकीय गट-तट मोठ्या संख्येने असला, तरी काही गटांनी व उमेदवारांनी आपल्या सोयीनुसार तडजोडी घडवून आणल्या. काही गावांत सत्तेसाठी जातीचाही आधार घेतला जात आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर विजयासाठी सत्ताधारी व विरोधी गटांकडून हालचालींना सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी दुरंगी, तर काही ठिकाणी तिरंगी लढती होणार आहेत. विविध आघाड्यांकडून प्रचाराचा नारळ फोडला जात असून, एकमेकांची उणीदुणी काढण्यात धन्यता मानली जात आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असल्याने गावातील राजकीय वातावरण आता हळूहळू तापू लागले आहे. एकेका मतासाठी आतापासूनच व्यूहरचना आखली जात असून, नातीगोती आणि पै-पाहुण्यांचाही आवश्यकतेनुसार उपयोग करून घेतला जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ग्रामपंचायतीच्या यशावरच विविध पक्षांच्या नेत्यांची ताकद समजणार असल्याने सर्वच नेतेमंडळींकडून आपआपल्या कार्यकर्त्यांना सतर्क राहण्याबाबत सूचना केली जात आहे. विधानसभेचे पडसाद उमटणारविधानसभा निवडणुकीतील पडसाद काही गावांत हमखास उमटणार आहेत. गोकुळ, जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीनंतर तालुक्यात जातीय समीकरणाने पुन्हा जोर धरला आहे. पक्षापेक्षा गटा-तटांच्या निवडणुका होत असल्या, तरी विधानसभा निवडणुकीत पेरलेले राजकारण ग्रामपंचायत निवडणुकीत उगवणार, असेच चित्र सध्या तरी दिसत आहे.