शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

पूर्वीच्या रेखांकनात बदल केल्यास रस्त्यावर उतरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे - भुये व भुयेवाडी दरम्यान रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी मंत्री, खासदार, आमदार व शेतकऱ्यांच्या सर्व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपार्डे - भुये व भुयेवाडी दरम्यान रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी मंत्री, खासदार, आमदार व शेतकऱ्यांच्या सर्व संमतीने मंजूर करण्यात आलेले रेखांकन डावलून नवीन रेखांकनाने दोन महामार्गांचे रस्ते केले जाणार असतील तर तो अन्याय आहे. यासाठी भूसंपादनाला कोणी आले तर त्याला रस्त्यावर उतरून विरोध करणार असल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

रत्नागिरी नागपूर १६६ राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. करवीर तालुक्यातील केर्ली ते शिये दरम्यानच्या १४ किमी भूसंपादन प्रक्रियेत माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी लोकांच्या शेती व स्थावर मालमत्तेचे कमीत कमी नुकसान व्हावे, यासाठी ३० जानेवारी २०१८ व १२ एप्रिल २०१८ या दिवशी मंत्रालयात झालेल्या बैठकीत प्रस्ताव सादर केला. यावेळी माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संभाजीराजे, राजू शेट्टी, चंद्रदीप नरके, अमल महाडिक, सत्यजीत पाटील व राज्य व राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी, शेतकरी प्रतिनिधी हजर होते. भुये व भुयेवाडी दरम्यान राज्य मार्ग १९४ चे २०० फुटाने रुंदीकरण करून राष्ट्रीय महामार्ग १६६ चे रेखांकन मंजूर करण्यात आले.

यात शेतकरी व ग्रामस्थांचे कमीत कमी नुकसान होत असताना पुन्हा भुये भुयेवाडी बायपास करण्याचा घाट सुरू झाला आहे.

प्रतिक्रिया

गेली दोन वर्षे याबाबत मंत्रालय पातळीवर चर्चा होऊन भुये ते भुयेवाडी दरम्यान राज्य मार्गाचे रुंदीकरण करून रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग करण्याचा प्लॅन मंजूर आहे. यामुळे शेती व स्थावर मालमत्तेचे नुकसान होणार नाही महामार्गाला आमचा विरोध नाही पण नवीन बायपास रस्त्याला आमचा विरोध आहे

--रमेश कांबळे सरपंच भुये

करवीर तालुक्यातील भुये व भुयेवाडी दरम्यान राज्य मार्गावरुनच रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाला मंत्रालयात मंजुरी मिळाली आहे. दोन रस्ते होणार असतील तर आमचा विरोध असेल

-- मा. आ. चंद्रदीप नरके

आमचा महामार्गाला विरोध नाही पण मंत्री, खासदार, आमदार,अधिकारी व शेतकऱ्यांच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेला प्लॅन पुन्हा बदलला जातो. शेतकरी ग्रामस्थांचे नुकसान करून कुणाच्या राजकीय हितासाठी प्लॅन बदलला याबाबत पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे अन्यथा रस्त्यावर उतरू

--- धन्वंती दादासाहेब पाटील -भुयेवाडी ग्रामस्थ

(फोटो)

करवीर तालुक्यातील भुयेवाडी दरम्यान दीड किलोमीटर अंतरासाठी दोन महामार्गचे रेखांकन होत असलेला नकाशा