शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
2
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
3
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
4
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
5
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
6
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
7
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
8
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
9
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
10
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
11
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
12
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
13
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
14
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
15
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
16
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
17
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
18
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
19
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
20
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली

पूर्वीच्या रेखांकनात बदल केल्यास रस्त्यावर उतरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोपार्डे - भुये व भुयेवाडी दरम्यान रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी मंत्री, खासदार, आमदार व शेतकऱ्यांच्या सर्व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपार्डे - भुये व भुयेवाडी दरम्यान रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गासाठी मंत्री, खासदार, आमदार व शेतकऱ्यांच्या सर्व संमतीने मंजूर करण्यात आलेले रेखांकन डावलून नवीन रेखांकनाने दोन महामार्गांचे रस्ते केले जाणार असतील तर तो अन्याय आहे. यासाठी भूसंपादनाला कोणी आले तर त्याला रस्त्यावर उतरून विरोध करणार असल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

रत्नागिरी नागपूर १६६ राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. करवीर तालुक्यातील केर्ली ते शिये दरम्यानच्या १४ किमी भूसंपादन प्रक्रियेत माजी आमदार चंद्रदीप नरके यांनी लोकांच्या शेती व स्थावर मालमत्तेचे कमीत कमी नुकसान व्हावे, यासाठी ३० जानेवारी २०१८ व १२ एप्रिल २०१८ या दिवशी मंत्रालयात झालेल्या बैठकीत प्रस्ताव सादर केला. यावेळी माजी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, खासदार संभाजीराजे, राजू शेट्टी, चंद्रदीप नरके, अमल महाडिक, सत्यजीत पाटील व राज्य व राष्ट्रीय महामार्गचे अधिकारी, शेतकरी प्रतिनिधी हजर होते. भुये व भुयेवाडी दरम्यान राज्य मार्ग १९४ चे २०० फुटाने रुंदीकरण करून राष्ट्रीय महामार्ग १६६ चे रेखांकन मंजूर करण्यात आले.

यात शेतकरी व ग्रामस्थांचे कमीत कमी नुकसान होत असताना पुन्हा भुये भुयेवाडी बायपास करण्याचा घाट सुरू झाला आहे.

प्रतिक्रिया

गेली दोन वर्षे याबाबत मंत्रालय पातळीवर चर्चा होऊन भुये ते भुयेवाडी दरम्यान राज्य मार्गाचे रुंदीकरण करून रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्ग करण्याचा प्लॅन मंजूर आहे. यामुळे शेती व स्थावर मालमत्तेचे नुकसान होणार नाही महामार्गाला आमचा विरोध नाही पण नवीन बायपास रस्त्याला आमचा विरोध आहे

--रमेश कांबळे सरपंच भुये

करवीर तालुक्यातील भुये व भुयेवाडी दरम्यान राज्य मार्गावरुनच रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गाला मंत्रालयात मंजुरी मिळाली आहे. दोन रस्ते होणार असतील तर आमचा विरोध असेल

-- मा. आ. चंद्रदीप नरके

आमचा महामार्गाला विरोध नाही पण मंत्री, खासदार, आमदार,अधिकारी व शेतकऱ्यांच्या बैठकीत मंजूर करण्यात आलेला प्लॅन पुन्हा बदलला जातो. शेतकरी ग्रामस्थांचे नुकसान करून कुणाच्या राजकीय हितासाठी प्लॅन बदलला याबाबत पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे अन्यथा रस्त्यावर उतरू

--- धन्वंती दादासाहेब पाटील -भुयेवाडी ग्रामस्थ

(फोटो)

करवीर तालुक्यातील भुयेवाडी दरम्यान दीड किलोमीटर अंतरासाठी दोन महामार्गचे रेखांकन होत असलेला नकाशा