शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

आराखड्याचे काम गतीने होण्यासाठीच निविदेत बदल : महापौर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2020 13:03 IST

कोल्हापूर शहराच्या तिसऱ्या विकास आराखड्याच्या टेंडरमध्ये कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचार, घोळ अथवा गैरप्रकार करण्याचा प्रश्न येत नसल्याचे स्पष्टीकरण महापौर निलोफर आजरेकर यांनी पत्रकाद्वारे केले आहे. तीन वर्षांपासून रखडलेला आराखडा गतीने होण्यासाठी अटी व शर्ती शिथिल केल्या.

ठळक मुद्देआराखड्याचे काम गतीने होण्यासाठीच निविदेत बदल : महापौर भाजप-ताराराणीकडून दिशाभूल 

कोल्हापूर : शहराच्या तिसऱ्या विकास आराखड्याच्या टेंडरमध्ये कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचार, घोळ अथवा गैरप्रकार करण्याचा प्रश्न येत नसल्याचे स्पष्टीकरण महापौर निलोफर आजरेकर यांनी पत्रकाद्वारे केले आहे. तीन वर्षांपासून रखडलेला आराखडा गतीने होण्यासाठी अटी व शर्ती शिथिल केल्या.

या संदर्भात अंतिम निर्णय आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी घेणार आहेत. त्यामुळे भाजप-ताराराणी आघाडीच्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. टीका करण्यासाठी कोणताच मुद्दा नसल्यामुळे या माध्यमातून आरोप करून दिशाभूल करण्याचा उद्योग त्यांच्याकडून सुरू असल्याचे त्यांनी यामध्ये म्हटले आहे.महापौर आजरेकर यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, शहराचा तिसरा सुधारित विकास आराखडा तयार करण्यासाठीची निविदा प्रक्रिया गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. महानगरपालिकेच्या स्थापनेपासून विविध कारणांनी शहराची एक इंचही वाढ होऊ शकलेली नाही; परंतु शहरीकरणामध्ये व लोकसंख्येत भरमसाट वाढ झालेली आहे.

या विकास आराखड्यामध्ये शहराची येत्या ३० वर्षांमध्ये होणारी वाढ लक्षात घेऊन जागांसंदर्भात नियोजन करण्यात येणार आहे. कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर भविष्यात उद्भवणाऱ्या अशा प्रकारच्या विविध आपत्तींचाही हा आराखडा तयार करताना विचार करणे गरजेचे आहे.

या सभागृहाची मुदत येत्या दोन महिन्यांमध्ये संपणार आहे. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या या प्रकल्पाचे काम लवकरात लवकर मार्गी लागावे. हे काम कोणा एका विशिष्ट संस्थेलाच न मिळता या निविदेमध्ये निकोप स्पर्धा व्हावी, यासाठी प्रशासनाला पत्र देऊन निविदेत सुधारणा करण्याबाबत कळविले होते.यानुसार केलेल्या सुधारणेमुळे टेंडरला जास्त प्रतिसाद मिळाला. यामुळे निविदा प्रक्रियेमध्ये इतर पात्र संस्थांचा सहभाग झाल्याने कोणाच्या संबंधातील एखाद्या संस्थेला टेंडर मिळाले नाही. त्यामुळे याबद्दल आरोप करणे ही बाब चुकीची आहे.भाजप सत्तेवर असताना कोणती कामे केली?महापालिकेतील काँग्रेस-राष्ट्रवादी व शिवसेना आघाडीच्या माध्यमातून कोल्हापूर शहराच्या विकासाचे प्रश्न सुटत असल्याने तसेच विरोधाचे कोणतेही मुद्दे मिळत नसल्यामुळेच विरोधकांकडून कुरघोड्यांचे राजकारण सुरू आहे. आमच्यावर आरोप करताना विरोधकांनी राज्यात भाजप आघाडीचे सरकार सत्तेवर असताना कोल्हापूर शहराच्या विकासाची कोणती ठोस कामे केली, याची माहितीही प्रसिद्ध करावी.जनतेच्या हिताची इतकी काळजी असेल तर त्यांनी कोरोना योद्धा म्हणून काम करण्यासाठी आपला वेळ सत्कारणी लावावा. महापालिकेची आगामी निवडणूक समोर दिसू लागल्यानेच विरोधकांकडून बिनबुडाचे व चुकीचे आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असल्याचे आजरेकर यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाMayorमहापौरkolhapurकोल्हापूर