शहरं
Join us  
Trending Stories
1
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
2
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
3
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
4
Vijay Hazare Trophy: कॅप्टनची वैभवपेक्षा जलद सेंच्युरी! बिहारनं ५७४ धावांसह सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
5
H-1B व्हिसा आता 'मेरिट'वर! १ लाख डॉलर अतिरिक्त फी अन् पगाराची अट; पाहा काय आहे नवीन नियम
6
Eclipse 2026: २०२६ मध्ये ४ ग्रहणांची मालिका, विशेषतः होळीला चंद्रग्रहण वेधणार जगाचं लक्ष?
7
"नेमके कशासाठी आज घालताय एकमेकांच्या गळ्यात गळे?"; युती होताच भाजपाचा खोचक सवाल
8
...म्हणून उद्धव आणि राज ठाकरेंनी जागावाटप, उमेदवार याबाबत काहीच घोषणा केली नाही; कारण सांगताच सगळे हसले
9
२६ डिसेंबरपासून आणखी एका कंपनीचा IPO उघडणार; आतापासून GMP ₹१२५ वर, कोणती आहे कंपनी?
10
Shiv Sena UBT & MNS Alliance: 'शिवतीर्थ'वर राज-उद्धव! बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर संपूर्ण ठाकरे कुटुंबाचं अभिवादन
11
शिवसेनेनं 'करून दाखवलं', मनसेचं 'इंजिन' घसरलं! पाहा, मागील दोन निवडणुकांमध्ये नेमकं काय घडलं?
12
अतिश्रीमंतांचा 'आक्रमक' गुंतवणुकीवर भर! 'या' क्षेत्रात लावतात ७०% पैसे; सोन्याकडे मात्र पाठ
13
IND W vs SL W: भारताच्या 'लेडी सेहवाग'चा मोठा पराक्रम; स्मृती मानधना, दिप्ती शर्मा, जेमिमालाही टाकलं मागं!
14
'आम्ही भारतातील सर्वात मोठे फरार', ललित मोदी आणि विजय मल्ल्या यांचा सरकारवर हल्लाबोल; व्हिडीओ व्हायरल
15
सोने-चांदी-हिरे काही कमी नाही, राममूर्ती घडवायला दिले ३० कोटी; अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली
16
कुणीही एकत्र आले तरी मुंबईत भाजपाचा महापौर बसेल; मंत्री बावनकुळेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा
17
फास्ट फूडमुळे खरंच झाला विद्यार्थिनीचा मृत्यू? डॉक्टर आणि कुटुंबीयांनी सांगितलं धक्कादायक 'सत्य'
18
DCM शिंदे पोहोचले बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर; ठाकरे बंधूंच्या यूतीपूर्वी घडामोडींना वेग
19
बांग्लादेशात हिंदूंवरील अत्याचार वाढले; चिटगावमध्ये कट्टरतावाद्यांनी हिंदूंची घरे जाळली
20
Vijay Hazare Trophy स्पर्धेतील पहिल्याच सामन्यात वैभव सूर्यवंशीचा धमाका! वादळी शतकासह रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

सहकार कायद्यात बदल विचाराधीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2017 00:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सर्वप्रकारच्या संस्थांना एकच कायदा असल्याने त्याची अंमलबजावणी करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे संस्था प्रकारानुसार सहकार कायद्यात बदल करावा, अशा सूचना संस्था पातळीवर येत आहेत. हा बदल कायदा दुरुस्ती समितीच्या विचाराधीन असल्याची माहिती राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.सहकार कायदा बदल व ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : सर्वप्रकारच्या संस्थांना एकच कायदा असल्याने त्याची अंमलबजावणी करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे संस्था प्रकारानुसार सहकार कायद्यात बदल करावा, अशा सूचना संस्था पातळीवर येत आहेत. हा बदल कायदा दुरुस्ती समितीच्या विचाराधीन असल्याची माहिती राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना दिली.सहकार कायदा बदल व दुरुस्ती समिती सदस्यांची बुधवारी जिल्हा मध्यवर्ती बँकेत कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील संस्था प्रतिनिधींसोबत बैठक आयोजित केली होती. सहकार कायद्यातील बदल व दुरुस्तीबाबत संस्थांसह थेट नागरिकांसोबत चर्चा करण्यासाठी राज्य सहकारी परिषदेने दहाजणांची समिती स्थापन केली आहे. आतापर्यंत पुणे, लातूर विभागांत बैठका घेऊन मते आजमावून घेतली आहेत. लोकाभिमुख व सहकारी संस्थांना सक्षम करणारा कायदा व्हावा, यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील आहे. संस्था प्रतिनिधी, वकील व सहकारातील अभ्यासकांशी चर्चा करताना अनेक मुद्दे उपस्थित झाले आहे. आपल्याकडे ५४ प्रकारच्या सहकारी संस्था कार्यरत आहेत, पण कायदा एकच असल्याने त्याची अंमलबजावणी करताना सगळ्यांनाच अडचणी येत आहेत.९७ व्या घटना दुरुस्तीनंतर ‘क्रियाशील’, ‘अक्रियाशील’चा मुद्दा पुढे आला, पण काही संस्थांच्या पातळीवर त्याचा अंमल करता येत नाही. संस्थांना न्याय देण्यासाठी व कायद्याची अंमलबजावणी सहजरित्या व्हावी यासाठी संस्था प्रकारांनुसार सहकार कायद्यात बदल करणे विचाराधीन असल्याचे शेखर चरेगांवकर यांनी सांगितले.बॅँकांना थकबाकी वसुलीसाठी ‘कलम १०१’ व ‘कलम ९१’ हे वापरता येते; पण ‘कलम १०१’नुसार थेट निबंधक मान्यता देत असल्याने सोयीस्कर होते, यासाठी बॅँकांचा आग्रह आहे. पूर्वी वसुलीसाठी शासकीय यंत्रणा वापरली जात असल्याने ६ टक्के सरचार्ज लावला जातो, पण आता संस्था स्वत:च्या यंत्रणेकडून वसुली करते, पण अजूनही ६ टक्के सरचार्जची वसुली सुरू असल्याची तक्रारी आहेत. वसुलीची प्रक्रिया गतिमान करण्याबरोबरच संचालक रिक्त पद निवड, बिनविरोध निवडणुकीवरील खर्चाबाबत सूचना आल्या आहेत. संस्थांना स्वायत्ता मिळावी, वसुली गतिमान व्हावी, निवडणुकीचे काम सोपे व कामकाजात सुलभता यावी, यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. काही संस्थाचालक सोयीनुसार कायदा वाकवत असल्याचे सांगत थकबाकीदार संचालकांवर तक्रारी झाल्यानंतरच कारवाई होते; पण कायदा व निवडणुकीचा अर्ज दाखल करतानाचे प्रतिज्ञापत्राच्या आधारे संस्था व अधिकाºयांनी थेट कारवाई करणे अपेक्षित आहे. कायद्याच्या अगोदर संस्थांचा जन्म झाला असून केवळ कायद्यात बदल करून संस्था सक्षम होणार नाहीत, तर सभासदांमध्ये जागृती करणे आवश्यक असल्याचे चरेगांवकर यांनी सांगितले.यावेळी समितीचे सदस्य उदय जोशी, धरणीधर पाटील, जयंत कुलकर्णी, अ‍ॅड. शंतनू खुर्जोकर, विभागीय सहनिबंधक धनंजय डोईफोडे, जिल्हा उपनिबंधक अरुण काकडे, डॉ. महेश जाधव, दिग्विजय राठोड, सुनील धायगुडे, प्रदीप मालगांवे उपस्थित होते.बिन परतीची ठेव बेकायदेशीरचअनेक संस्था बिन परतीच्या व बिन व्याजी ठेवी घेतात. याबाबतही काही तक्रारी आलेल्या आहेत; पण कायद्यानुसार अशा ठेवी घेताच येत नसल्याचे चरेगांवकर यांनी सांगितले.