शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

नशीब बदलण्यासाठी विचार बदला

By admin | Updated: February 10, 2015 00:05 IST

प्रल्हाद पै : ‘गडहिंग्लज’मध्ये समाजप्रबोधन महोत्सवास प्रतिसाद

गडहिंग्लज : कर्माचे फळ कर्मात आणि विचाराचे फळ विचारातच आहे. विचाराला आकार द्या, जीवनाला आकार मिळेल. विचाराला शिस्त लावा, विचार व्यापक करा, विचार शुद्ध करा, तरच जीवनात चमत्कार घडेल. किंबहुना नशीब बदलण्यासाठी विचार बदला, असा मोलाचा सल्ला प्रल्हाद वामनराव पै यांनी दिला.सद्गुरू वामनराव पै प्रणीत जीवन विद्या मिशनतर्फे येथील म. दुुं. श्रेष्ठी विद्यालयाच्या मैदानावर आयोजित भव्य समाजप्रबोधन महोत्सवात ‘विचार बदला, नशीब बदलेल’ या विषयावर ते बोलत होते. ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तूूू एकटा सुखी होऊ शकत नाहीस, सुख पाहिजे, दिल्यानेच मिळणार’ या सद्गुरूंच्या तीन सिद्धांतावर त्यांनी सविस्तर व सोदाहरण विवेचन केले.पै. म्हणाले, नशीब म्हणजे पूर्वीच्या कर्माचे फळ आहे. आपणाला ते सुख व दु:खाच्या रूपाने मिळते. चांगले फळ मिळण्यासाठी पूर्वीचे सोडा, आजपासूनच चांगला विचार करा.सज्जन माणूस म्हणजे विचार चांगले असणारा माणूस. त्यासाठी आपल्या विचारांकडे लक्ष द्या. दु:खाचे, निराशेचे, अपयशाचे विचार अधोगतीकडे नेतात, तर सकारात्मक विचार प्रगतीकडे नेतात. चांगल्या फळासाठी चांगल्या विचारांचा प्रयत्न करा.जगातील सर्व मोठी माणसं अपयशातूनच घडली आहेत. त्यामुळे अपयशाने खचून जाऊ नका. वस्तुस्थितीचा स्वीकार करा, चुकले तरी मागे फिरू नका. प्रयत्नातूनच मार्ग निघतो. प्रयत्न करणाऱ्यांमागेच समाज उभा राहतो. त्यामुळे प्रयत्न करीत रहा. त्यातूनच नशीब बदलू शकते.नशीब म्हणजे केवळ पैसा आणि उत्कर्ष नव्हे. उत्कर्षाने माणूस उन्मत होण्याचा धोका आहे. त्यामुळे उत्कर्षाबरोबरच माणसाची कुवत, पात्रता आणि मानवी मूल्ये वाढली पाहिजेत. चारित्र्य घडायला हवे. तरच माणूस स्मरणात राहील, असेही पै यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)नेटके नियोजन, उदंड प्रतिसादगडहिंग्लज शाखेच्या नामधारकांनी ‘जीवन विद्या मिशन’तर्फे आयोजित समाजप्रबोधन महोत्सवाचे नेटके नियोजन केल्यामुळे या ज्ञानमहोत्सवास उदंड प्रतिसाद मिळाला. सुमारे दहा हजार नागरिकांनी या प्रवचनाचा लाभ घेतला.