शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
3
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
4
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
5
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
6
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
7
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
8
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
9
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
10
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
11
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
12
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
13
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
14
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
15
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
16
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
17
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
18
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
19
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
20
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!

नशीब बदलण्यासाठी विचार बदला

By admin | Updated: February 10, 2015 00:05 IST

प्रल्हाद पै : ‘गडहिंग्लज’मध्ये समाजप्रबोधन महोत्सवास प्रतिसाद

गडहिंग्लज : कर्माचे फळ कर्मात आणि विचाराचे फळ विचारातच आहे. विचाराला आकार द्या, जीवनाला आकार मिळेल. विचाराला शिस्त लावा, विचार व्यापक करा, विचार शुद्ध करा, तरच जीवनात चमत्कार घडेल. किंबहुना नशीब बदलण्यासाठी विचार बदला, असा मोलाचा सल्ला प्रल्हाद वामनराव पै यांनी दिला.सद्गुरू वामनराव पै प्रणीत जीवन विद्या मिशनतर्फे येथील म. दुुं. श्रेष्ठी विद्यालयाच्या मैदानावर आयोजित भव्य समाजप्रबोधन महोत्सवात ‘विचार बदला, नशीब बदलेल’ या विषयावर ते बोलत होते. ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तूूू एकटा सुखी होऊ शकत नाहीस, सुख पाहिजे, दिल्यानेच मिळणार’ या सद्गुरूंच्या तीन सिद्धांतावर त्यांनी सविस्तर व सोदाहरण विवेचन केले.पै. म्हणाले, नशीब म्हणजे पूर्वीच्या कर्माचे फळ आहे. आपणाला ते सुख व दु:खाच्या रूपाने मिळते. चांगले फळ मिळण्यासाठी पूर्वीचे सोडा, आजपासूनच चांगला विचार करा.सज्जन माणूस म्हणजे विचार चांगले असणारा माणूस. त्यासाठी आपल्या विचारांकडे लक्ष द्या. दु:खाचे, निराशेचे, अपयशाचे विचार अधोगतीकडे नेतात, तर सकारात्मक विचार प्रगतीकडे नेतात. चांगल्या फळासाठी चांगल्या विचारांचा प्रयत्न करा.जगातील सर्व मोठी माणसं अपयशातूनच घडली आहेत. त्यामुळे अपयशाने खचून जाऊ नका. वस्तुस्थितीचा स्वीकार करा, चुकले तरी मागे फिरू नका. प्रयत्नातूनच मार्ग निघतो. प्रयत्न करणाऱ्यांमागेच समाज उभा राहतो. त्यामुळे प्रयत्न करीत रहा. त्यातूनच नशीब बदलू शकते.नशीब म्हणजे केवळ पैसा आणि उत्कर्ष नव्हे. उत्कर्षाने माणूस उन्मत होण्याचा धोका आहे. त्यामुळे उत्कर्षाबरोबरच माणसाची कुवत, पात्रता आणि मानवी मूल्ये वाढली पाहिजेत. चारित्र्य घडायला हवे. तरच माणूस स्मरणात राहील, असेही पै यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)नेटके नियोजन, उदंड प्रतिसादगडहिंग्लज शाखेच्या नामधारकांनी ‘जीवन विद्या मिशन’तर्फे आयोजित समाजप्रबोधन महोत्सवाचे नेटके नियोजन केल्यामुळे या ज्ञानमहोत्सवास उदंड प्रतिसाद मिळाला. सुमारे दहा हजार नागरिकांनी या प्रवचनाचा लाभ घेतला.