शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

धोके टाळण्यासाठी मानसिकता बदला

By admin | Updated: February 4, 2017 00:40 IST

राजेंद्रसिंह राणा यांचा सल्ला : जलव्यवस्थापन विषयावर मार्गदर्शन

कोल्हापूर : मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा प्रश्न गंभीर बनला असून, तो अधिक गुंतागुंतीचा व भयानक बनत चालला आहे. भविष्यातील पर्यावरणाचे धोके टाळण्यासाठी प्रत्येकाने आपल्या मानसिकतेत बदल करायला हवा, असा सल्ला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी शुक्रवारी दिला. येथील प्रा. डॉ. ए. डी. शिंदे यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त सायबर महाविद्यालयात आयोजित स्मृती व्याख्यानमालेत ते ‘हवामान बदल समस्येवर पर्याय : जल व्यवस्थापन’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. पी. बी. साबळे होते. यावेळी विश्वस्त डॉ. व्ही. एम. हिलगे, डॉ. पी. एस. राव, डॉ. टी. एम. शिवारे, अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे प्रमुख उपस्थित होते. यावेळी अमृतमहोत्सवानिमित्त ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचा सत्कार करण्यात आला.जलतज्ज्ञ राणा म्हणाले, एकविसाव्या शतकात मानवासमोर ऋतुचक्रातील बदल व जागतिक तापमानवाढ या पर्यावरणाच्या प्रमुख गंभीर समस्या असणार आहेत आणि त्यास आपणच जबाबदार आहेत. सध्याची शिक्षणव्यवस्थाही उपलब्ध नैसर्गिक साधनसामग्रीचे जास्तीत जास्त शोषण कसे करता येईल, हेच शिकविते. दोनशे वर्षांपूर्वी इथली शिक्षणव्यवस्था मानव आणि निसर्ग यांच्यामधे दुवा साधणारे शिक्षण देणारी होती. ती आता लुप्त झाली आहे. स्वातंत्र्यानंतर दुष्काळ दहापटींनी, तर पूर परिस्थितीत आठपटींनी वाढली आहे. याला आपली जीवनशैलीच जबाबदार आहे. पर्यावरणसंबंधी धोरणे आखतानाही मुख्यमंत्री, पंतप्रधान यांना आवडतील असे सल्ले देणारेच सल्लागार असल्याने, आपण या परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकलो नाही. आपल्या समाजातही पर्यावरणाबद्दल जागरूकतेचा अभाव आहे. नद्या, नाले यांचे प्रदूषण रोखण्यासाठी कायद्यांपेक्षा नागरिकांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. शिक्षणसंस्था, विद्यापीठांनी फक्त पुस्तकी ज्ञान न देता कृतिशील कार्यक्रमाची आखणी करून लोकशिक्षणाची मोहीम हाती घ्यायला हवी; तरच येणाऱ्या काळातील पर्यावरणाच्या आव्हानांना आपण सक्षमपणे तोंड देऊ शकू आणि या कामी राजर्षी शाहूंचा सामाजिक क्रांतीचा वारसा लाभलेल्या कोल्हापूरने पुढाकार घ्यावा.स्वातंत्र्यानंतर दुष्काळ दहापटींनी, तर पूर परिस्थितीत आठपटींनी वाढलीपर्यावरणासंबंधी धोरणे आखतानाही मुख्यमंत्री, पंतप्रधान यांना आवडतील असे सल्ले देणारेच सल्लागार फक्त पुस्तकी ज्ञान न देता कृतिशील कार्यक्रमाची आखावेत