शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

धोके टाळण्यासाठी मानसिकता बदला

By admin | Updated: February 4, 2017 00:40 IST

राजेंद्रसिंह राणा यांचा सल्ला : जलव्यवस्थापन विषयावर मार्गदर्शन

कोल्हापूर : मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा प्रश्न गंभीर बनला असून, तो अधिक गुंतागुंतीचा व भयानक बनत चालला आहे. भविष्यातील पर्यावरणाचे धोके टाळण्यासाठी प्रत्येकाने आपल्या मानसिकतेत बदल करायला हवा, असा सल्ला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी शुक्रवारी दिला. येथील प्रा. डॉ. ए. डी. शिंदे यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त सायबर महाविद्यालयात आयोजित स्मृती व्याख्यानमालेत ते ‘हवामान बदल समस्येवर पर्याय : जल व्यवस्थापन’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. पी. बी. साबळे होते. यावेळी विश्वस्त डॉ. व्ही. एम. हिलगे, डॉ. पी. एस. राव, डॉ. टी. एम. शिवारे, अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे प्रमुख उपस्थित होते. यावेळी अमृतमहोत्सवानिमित्त ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचा सत्कार करण्यात आला.जलतज्ज्ञ राणा म्हणाले, एकविसाव्या शतकात मानवासमोर ऋतुचक्रातील बदल व जागतिक तापमानवाढ या पर्यावरणाच्या प्रमुख गंभीर समस्या असणार आहेत आणि त्यास आपणच जबाबदार आहेत. सध्याची शिक्षणव्यवस्थाही उपलब्ध नैसर्गिक साधनसामग्रीचे जास्तीत जास्त शोषण कसे करता येईल, हेच शिकविते. दोनशे वर्षांपूर्वी इथली शिक्षणव्यवस्था मानव आणि निसर्ग यांच्यामधे दुवा साधणारे शिक्षण देणारी होती. ती आता लुप्त झाली आहे. स्वातंत्र्यानंतर दुष्काळ दहापटींनी, तर पूर परिस्थितीत आठपटींनी वाढली आहे. याला आपली जीवनशैलीच जबाबदार आहे. पर्यावरणसंबंधी धोरणे आखतानाही मुख्यमंत्री, पंतप्रधान यांना आवडतील असे सल्ले देणारेच सल्लागार असल्याने, आपण या परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकलो नाही. आपल्या समाजातही पर्यावरणाबद्दल जागरूकतेचा अभाव आहे. नद्या, नाले यांचे प्रदूषण रोखण्यासाठी कायद्यांपेक्षा नागरिकांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. शिक्षणसंस्था, विद्यापीठांनी फक्त पुस्तकी ज्ञान न देता कृतिशील कार्यक्रमाची आखणी करून लोकशिक्षणाची मोहीम हाती घ्यायला हवी; तरच येणाऱ्या काळातील पर्यावरणाच्या आव्हानांना आपण सक्षमपणे तोंड देऊ शकू आणि या कामी राजर्षी शाहूंचा सामाजिक क्रांतीचा वारसा लाभलेल्या कोल्हापूरने पुढाकार घ्यावा.स्वातंत्र्यानंतर दुष्काळ दहापटींनी, तर पूर परिस्थितीत आठपटींनी वाढलीपर्यावरणासंबंधी धोरणे आखतानाही मुख्यमंत्री, पंतप्रधान यांना आवडतील असे सल्ले देणारेच सल्लागार फक्त पुस्तकी ज्ञान न देता कृतिशील कार्यक्रमाची आखावेत