शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचा मोठा निर्णय; मंत्री, खासदार आणि आमदारांच्या नातेवाईकांना महापालिकेचं तिकीट नाही!
2
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
3
तीन कोटींचा विमा आणि सरकारी नोकरीसाठी मुलाने रचला भयंकर कट, वडिलांना सर्पदंश करवला, त्यानंतर...
4
संभाजीनगरात 'हायव्होल्टेज' ड्रामा; जंजाळांच्या डोळ्यात अश्रू, शिरसाटांच्या घराबाहेर कार्यकर्ते जमा
5
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
6
किशोरी पेडणेकर यांना अखेर एबी फॉर्म मिळाला; उमेदवारी मिळताच ठाकरेंची रणरागिनी गरजली!
7
जेवणावळीत ऐनवेळी भात संपला, संतापलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी मिळेल त्यावर ताव मारला, व्हिडीओ व्हायरल  
8
पॉलिटिकल 'स्टेटस' ठेवाल तर सरकारी नोकरी गमावून बसाल ! कर्मचाऱ्यांसाठी काय नियम ?
9
वर्षानुवर्षे द्वेष मनात विषासारखा पेरला जातो..; एंजेल चकमाच्या मृत्यूवर राहुल-अखिलेश संतापले
10
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
11
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
12
Kishori Pednekar: अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
13
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
14
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
15
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
16
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
17
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
18
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
19
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
20
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
Daily Top 2Weekly Top 5

धोके टाळण्यासाठी मानसिकता बदला

By admin | Updated: February 4, 2017 00:40 IST

राजेंद्रसिंह राणा यांचा सल्ला : जलव्यवस्थापन विषयावर मार्गदर्शन

कोल्हापूर : मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणाचा प्रश्न गंभीर बनला असून, तो अधिक गुंतागुंतीचा व भयानक बनत चालला आहे. भविष्यातील पर्यावरणाचे धोके टाळण्यासाठी प्रत्येकाने आपल्या मानसिकतेत बदल करायला हवा, असा सल्ला आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी शुक्रवारी दिला. येथील प्रा. डॉ. ए. डी. शिंदे यांच्या सातव्या पुण्यस्मरणानिमित्त सायबर महाविद्यालयात आयोजित स्मृती व्याख्यानमालेत ते ‘हवामान बदल समस्येवर पर्याय : जल व्यवस्थापन’ या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. पी. बी. साबळे होते. यावेळी विश्वस्त डॉ. व्ही. एम. हिलगे, डॉ. पी. एस. राव, डॉ. टी. एम. शिवारे, अ‍ॅड. श्रीपतराव शिंदे प्रमुख उपस्थित होते. यावेळी अमृतमहोत्सवानिमित्त ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांचा सत्कार करण्यात आला.जलतज्ज्ञ राणा म्हणाले, एकविसाव्या शतकात मानवासमोर ऋतुचक्रातील बदल व जागतिक तापमानवाढ या पर्यावरणाच्या प्रमुख गंभीर समस्या असणार आहेत आणि त्यास आपणच जबाबदार आहेत. सध्याची शिक्षणव्यवस्थाही उपलब्ध नैसर्गिक साधनसामग्रीचे जास्तीत जास्त शोषण कसे करता येईल, हेच शिकविते. दोनशे वर्षांपूर्वी इथली शिक्षणव्यवस्था मानव आणि निसर्ग यांच्यामधे दुवा साधणारे शिक्षण देणारी होती. ती आता लुप्त झाली आहे. स्वातंत्र्यानंतर दुष्काळ दहापटींनी, तर पूर परिस्थितीत आठपटींनी वाढली आहे. याला आपली जीवनशैलीच जबाबदार आहे. पर्यावरणसंबंधी धोरणे आखतानाही मुख्यमंत्री, पंतप्रधान यांना आवडतील असे सल्ले देणारेच सल्लागार असल्याने, आपण या परिस्थितीवर नियंत्रण मिळवू शकलो नाही. आपल्या समाजातही पर्यावरणाबद्दल जागरूकतेचा अभाव आहे. नद्या, नाले यांचे प्रदूषण रोखण्यासाठी कायद्यांपेक्षा नागरिकांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. शिक्षणसंस्था, विद्यापीठांनी फक्त पुस्तकी ज्ञान न देता कृतिशील कार्यक्रमाची आखणी करून लोकशिक्षणाची मोहीम हाती घ्यायला हवी; तरच येणाऱ्या काळातील पर्यावरणाच्या आव्हानांना आपण सक्षमपणे तोंड देऊ शकू आणि या कामी राजर्षी शाहूंचा सामाजिक क्रांतीचा वारसा लाभलेल्या कोल्हापूरने पुढाकार घ्यावा.स्वातंत्र्यानंतर दुष्काळ दहापटींनी, तर पूर परिस्थितीत आठपटींनी वाढलीपर्यावरणासंबंधी धोरणे आखतानाही मुख्यमंत्री, पंतप्रधान यांना आवडतील असे सल्ले देणारेच सल्लागार फक्त पुस्तकी ज्ञान न देता कृतिशील कार्यक्रमाची आखावेत