शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

सरकार पडेल म्हणणारे चंद्रकांतदादा कोम्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:19 IST

कोल्हापूर : महाराष्ट्र झोपेत असतानाच राज्य सरकार रात्रीत कोसळेल, असे म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपवाले कोमात आहेत. गेली अठरा ...

कोल्हापूर : महाराष्ट्र झोपेत असतानाच राज्य सरकार रात्रीत कोसळेल, असे म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपवाले कोमात आहेत. गेली अठरा महिने आमचे सरकार सुस्थितीत चालले आहे. आरक्षणावरून मराठा समाजात गैरसमज पसरवून सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केला. मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुश्रीफ म्हणाले, विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घाईने आरक्षण जाहीर करून मराठा समाजाची फसवणूक केली आहे. मराठा आरक्षणाच्या विरोधात उच्च न्यायालयात गेलेली "सेव्ह मेरीट- सेव्ह नेशन" ही संघटना भाजप आणि आरएसएसशी संबंधित आहे, त्यांच्या संघटनांचे पदाधिकारी आहेत. एका बाजूला मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून प्रयत्न करायचे आणि दुसरीकडे टिकणार नाही असे आरक्षण द्यायचे, तसेच मराठा समाजामध्ये गैरसमज पसरवून आंदोलनासाठी उचकवून सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा तिहेरी डाव आहे, पण काहीही झाले तरी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.

----

बोनस पुढच्या पाच वर्षांत

चंद्रकांत पाटील राज्य सरकार बोनसमध्ये चालले असल्याची टीका केली आहे. सरकार स्थापन झाल्यापासून ते असेच म्हणत आहेत, गेली अठरा महिने राज्य सरकार चांगले चालले आहे, आम्ही पाच वर्षे पूर्ण करू आणि त्याचा बोनस त्यापुढच्या पाच वर्षांत मिळवू ,असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

--

संभाजीराजेंच्या भूमिकेचे स्वागत...

संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटून मराठा आरक्षणाबाबत माझं तुझं करण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन लढू या, ही भूमिका त्यांनी मांडली. अनेक विधितज्ज्ञांशी चर्चा केली आहे, त्यांच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. आरक्षणाचे अधिकार केंद्र सरकारला आहेत. त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत, असे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

--