शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

सरकार पडेल म्हणणारे चंद्रकांतदादा कोम्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:19 IST

कोल्हापूर : महाराष्ट्र झोपेत असतानाच राज्य सरकार रात्रीत कोसळेल, असे म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपवाले कोमात आहेत. गेली अठरा ...

कोल्हापूर : महाराष्ट्र झोपेत असतानाच राज्य सरकार रात्रीत कोसळेल, असे म्हणणाऱ्या चंद्रकांत पाटील यांच्यासह भाजपवाले कोमात आहेत. गेली अठरा महिने आमचे सरकार सुस्थितीत चालले आहे. आरक्षणावरून मराठा समाजात गैरसमज पसरवून सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा डाव असल्याचा आरोप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना केला. मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

मुश्रीफ म्हणाले, विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घाईने आरक्षण जाहीर करून मराठा समाजाची फसवणूक केली आहे. मराठा आरक्षणाच्या विरोधात उच्च न्यायालयात गेलेली "सेव्ह मेरीट- सेव्ह नेशन" ही संघटना भाजप आणि आरएसएसशी संबंधित आहे, त्यांच्या संघटनांचे पदाधिकारी आहेत. एका बाजूला मराठा समाजाला आरक्षण मिळू नये म्हणून प्रयत्न करायचे आणि दुसरीकडे टिकणार नाही असे आरक्षण द्यायचे, तसेच मराठा समाजामध्ये गैरसमज पसरवून आंदोलनासाठी उचकवून सरकार अस्थिर करण्याचा भाजपचा तिहेरी डाव आहे, पण काहीही झाले तरी मराठा समाजाला आरक्षण दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.

----

बोनस पुढच्या पाच वर्षांत

चंद्रकांत पाटील राज्य सरकार बोनसमध्ये चालले असल्याची टीका केली आहे. सरकार स्थापन झाल्यापासून ते असेच म्हणत आहेत, गेली अठरा महिने राज्य सरकार चांगले चालले आहे, आम्ही पाच वर्षे पूर्ण करू आणि त्याचा बोनस त्यापुढच्या पाच वर्षांत मिळवू ,असेही मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

--

संभाजीराजेंच्या भूमिकेचे स्वागत...

संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना भेटून मराठा आरक्षणाबाबत माझं तुझं करण्यापेक्षा सर्वांनी एकत्र येऊन लढू या, ही भूमिका त्यांनी मांडली. अनेक विधितज्ज्ञांशी चर्चा केली आहे, त्यांच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो. आरक्षणाचे अधिकार केंद्र सरकारला आहेत. त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजेत, असे मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.

--