शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
3
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
4
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
5
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
6
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
7
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
8
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
9
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
10
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
11
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
12
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
13
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
14
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर
15
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
16
Bhendwal Bhavishyvani 2025: शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
17
मलायकाला अटक होणार? कोर्टात हजर न झाल्यास अजामीनपात्र वॉरंट निघणार; नक्की प्रकरण काय?
18
युट्यूबच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची दिशाभूल, सेबीची मोठी कारवाई; शेअरमध्ये गुंतवणूकीचा दिलेला सल्ला
19
गुरु-राहु-केतु गोचर: ७ राशींना मे महिना दमदार, अचानक धनलाभ; पैसा राहील, धनलक्ष्मी प्रसन्न!
20
माहिरा खान ते हानिया आमिर, पाकिस्तानी कलाकारांचे इन्स्टाग्राम अकाऊंट भारताकडून 'बॅन'

बदल्यांबाबत मुश्रीफ म्हणतात ... चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य म्हणजे सौ चुहे खाके...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 16:10 IST

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे बदल्यांची सीआयडी मार्फत चौकशीची मागणी करत आहेत, ती आम्ही केव्हाच मान्य केली आहे. मात्र महायुतीच्या काळातील बदल्यांमध्ये अनेक विक्रम करणाऱ्यांकडून ही मागणी ऐकून आर्श्चयाचा धक्का बसला असून पाटील यांचे बदल्यांबाबतचे वक्तव्य म्हणजे सौ चुहे खाके चली बिली हजं को अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी केली.

ठळक मुद्देबदल्यांबाबत मुश्रीफ म्हणतातचंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य म्हणजे सौ चुहे खाके...

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे बदल्यांची सीआयडी मार्फत चौकशीची मागणी करत आहेत, ती आम्ही केव्हाच मान्य केली आहे. मात्र महायुतीच्या काळातील बदल्यांमध्ये अनेक विक्रम करणाऱ्यांकडून ही मागणी ऐकून आर्श्चयाचा धक्का बसला असून पाटील यांचे बदल्यांबाबतचे वक्तव्य म्हणजे सौ चुहे खाके चली बिली हजं को अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी केली.चंद्रकांत पाटील हे महसूल, बांधकाम, कृषी, मदत, पुर्नवसन आदी महत्वाच्या विभागाचे मंत्री होते. त्यांनीच गेल्या सहा महिन्यात झालेल्या बदल्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सीआयडी चौकशीची मागणी मान्य केलीच, त्याचबरोबर २०१४ पासून बदल्यांची चौकशी करू, असेही सांगितले आहे. मूळात कोरोनाच्या कालावधीत बदल्याच करू नये, असेच आघाडी सरकारचे धोरण होते. मात्र युती शासनात आणले गेलेले काही अधिकारी आजही त्यांच्या खाल्या मिठाला जागतात. त्यामुळे हेच अधिकारी महाविकास आघाडीला बदनाम करत आहेत. म्हणून बदल्या करण्याचा निर्णय घेतला, तेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अवघ्या १५ टक्के बदल्या करण्याचा निर्णय घेतल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले आहे.त्या बदल्यांची अजूनही चर्चा आहे.......युती सरकारच्या काळातील व आता त्यांच्या खाल्या मिठाला जागणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने चंद्रकांत पाटील यांचे पित्त खवळले आहे. मागील पाच वर्षात कशा पध्दतीने बदल्या झाल्या, याची अजूनही दबक्या आवाजात चर्चा सुरू असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :PoliticsराजकारणHasan Mushrifहसन मुश्रीफchandrakant patilचंद्रकांत पाटीलkolhapurकोल्हापूर