शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

राजकारणात चंद्रकांत पाटील अज्ञानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:45 IST

कोपार्डे : ‘भोगावती’च्या दोन माजी उपाध्यक्षांच्या भाजप प्रवेशावेळी त्यांचेच विरोधक पी. एन. पाटील यांचे त्याच व्यासपीठावर गोडवे गाऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपले राजकारणातील अज्ञान दाखवून दिले, अशी टीका करीत ‘सत्ता येते, जाते; फार दिवस चालत नाही. गोरगरिबांची सेवा करावी लागते, याचे भान ठेवावे,’ असा इशाराही राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ...

कोपार्डे : ‘भोगावती’च्या दोन माजी उपाध्यक्षांच्या भाजप प्रवेशावेळी त्यांचेच विरोधक पी. एन. पाटील यांचे त्याच व्यासपीठावर गोडवे गाऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपले राजकारणातील अज्ञान दाखवून दिले, अशी टीका करीत ‘सत्ता येते, जाते; फार दिवस चालत नाही. गोरगरिबांची सेवा करावी लागते, याचे भान ठेवावे,’ असा इशाराही राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला.बालिंगे (ता. करवीर) येथे करवीर तालुका राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने आयोजित हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार व शेतकरी मेळाव्यात ते रविवारी बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील होते.आमदार मुश्रीफ म्हणाले, स्वर्गीय दिग्विजय खानविलकर यांच्या निधनानंतर करवीर तालुक्याकडे दुर्लक्ष झाल्याने कार्यकर्त्यांचे खच्चीकरण झाले, ही वस्तुस्थिती असली तरी आगामी काळात हा बॅकलॉग भरून काढला जाईल. करवीरला वजा करून येथून पुढे जिल्ह्णाचे राजकारण करणार नसल्याची शपथ त्यांनी यावेळी घेतली. शिवसेना-भाजपकडे राज्य करण्याची धमक नाही. राज्यावर कर्जाचा डोंगर उभा आहे. कर्जमाफीतून शेतकऱ्यांची थट्टा केली असून, हे सरकार भिकारडे बनले आहे. व्यापाºयांवर अन्याय सुरू आहे, तरुण बेरोजगार आहेत. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पैसे नाहीत. शाळा उद्योगपतींच्या घशात घातल्या जात आहेत. तरीही मुख्यमंत्र्यांपासून सर्वच मंत्र्यांची मस्तीची भाषा आहे.खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ताकद कमी असतानाही मधुकर जांभळे यांनी राष्टÑवादी जिवंत ठेवण्याची धडपड कायम ठेवली आहे. सर्वच नेते त्यांच्यामागे ठाम उभे राहतील. माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, युतीच्या राजकारणात झालेला अन्याय सहन करीत ‘करवीर’मधील कार्यकर्त्यांनी राष्टÑवादी मजबूत करण्याचे काम केले. आगामी काळात आघाडी की बिघाडी हे माहीत नाही; पण जर स्वबळावर लढायची वेळ आली तर ‘करवीर’मधून मधुकर जांभळे हे आमचे उमेदवार असतील. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, सर्वच निवडणुकांत करवीरमधील कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. आगामी काळात मुश्रीफ ताकद देतील.जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. माजी खासदार निवेदिता माने, तालुकाध्यक्ष शिवाजी देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. इंडियन डेअरी असोसिएशनच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल रामराजे कुपेकर यांचा सत्कार करण्यात आला. शहराध्यक्ष राजेश लाटकर, आर. के. पोवार, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, संगीता खाडे, रघुनाथ जाधव, राजाराम कासार, दत्ता गाडवे, सुनील कारंडे, शंकर पाटील, सुरेश पाटील, जी. डी. पाटील, राजश्री पाटील, तेजस पाटील, सुनील पाटील, रंगराव ढेरे, संभाजी पाटील, विश्वनाथ पाटील, आदी उपस्थित होते. किरण पाटील यांनी आभार मानले.मुश्रीफांच्या नेतृत्वाखालीच कामभाजपवर टीकास्त्र सोडत, गेल्या चार वर्षांत मतदारसंघात साडेसहा हजार कोटींची कामे खेचून आणल्याचे सांगत खासदार महाडिक म्हणाले, जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता केली आहे. आगामी काळात हसन मुश्रीफ यांच्याच नेतृत्वाखाली राष्टÑवादी बळकट करण्याचे काम करू.