शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

राजकारणात चंद्रकांत पाटील अज्ञानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 00:45 IST

कोपार्डे : ‘भोगावती’च्या दोन माजी उपाध्यक्षांच्या भाजप प्रवेशावेळी त्यांचेच विरोधक पी. एन. पाटील यांचे त्याच व्यासपीठावर गोडवे गाऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपले राजकारणातील अज्ञान दाखवून दिले, अशी टीका करीत ‘सत्ता येते, जाते; फार दिवस चालत नाही. गोरगरिबांची सेवा करावी लागते, याचे भान ठेवावे,’ असा इशाराही राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ...

कोपार्डे : ‘भोगावती’च्या दोन माजी उपाध्यक्षांच्या भाजप प्रवेशावेळी त्यांचेच विरोधक पी. एन. पाटील यांचे त्याच व्यासपीठावर गोडवे गाऊन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आपले राजकारणातील अज्ञान दाखवून दिले, अशी टीका करीत ‘सत्ता येते, जाते; फार दिवस चालत नाही. गोरगरिबांची सेवा करावी लागते, याचे भान ठेवावे,’ असा इशाराही राष्टÑवादी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांनी दिला.बालिंगे (ता. करवीर) येथे करवीर तालुका राष्टÑवादी कॉँग्रेसच्या वतीने आयोजित हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार व शेतकरी मेळाव्यात ते रविवारी बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्टÑवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील होते.आमदार मुश्रीफ म्हणाले, स्वर्गीय दिग्विजय खानविलकर यांच्या निधनानंतर करवीर तालुक्याकडे दुर्लक्ष झाल्याने कार्यकर्त्यांचे खच्चीकरण झाले, ही वस्तुस्थिती असली तरी आगामी काळात हा बॅकलॉग भरून काढला जाईल. करवीरला वजा करून येथून पुढे जिल्ह्णाचे राजकारण करणार नसल्याची शपथ त्यांनी यावेळी घेतली. शिवसेना-भाजपकडे राज्य करण्याची धमक नाही. राज्यावर कर्जाचा डोंगर उभा आहे. कर्जमाफीतून शेतकऱ्यांची थट्टा केली असून, हे सरकार भिकारडे बनले आहे. व्यापाºयांवर अन्याय सुरू आहे, तरुण बेरोजगार आहेत. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे पैसे नाहीत. शाळा उद्योगपतींच्या घशात घातल्या जात आहेत. तरीही मुख्यमंत्र्यांपासून सर्वच मंत्र्यांची मस्तीची भाषा आहे.खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ताकद कमी असतानाही मधुकर जांभळे यांनी राष्टÑवादी जिवंत ठेवण्याची धडपड कायम ठेवली आहे. सर्वच नेते त्यांच्यामागे ठाम उभे राहतील. माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, युतीच्या राजकारणात झालेला अन्याय सहन करीत ‘करवीर’मधील कार्यकर्त्यांनी राष्टÑवादी मजबूत करण्याचे काम केले. आगामी काळात आघाडी की बिघाडी हे माहीत नाही; पण जर स्वबळावर लढायची वेळ आली तर ‘करवीर’मधून मधुकर जांभळे हे आमचे उमेदवार असतील. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील म्हणाले, सर्वच निवडणुकांत करवीरमधील कार्यकर्त्यांवर अन्याय झाला आहे. आगामी काळात मुश्रीफ ताकद देतील.जिल्हा उपाध्यक्ष मधुकर जांभळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. माजी खासदार निवेदिता माने, तालुकाध्यक्ष शिवाजी देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. इंडियन डेअरी असोसिएशनच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल रामराजे कुपेकर यांचा सत्कार करण्यात आला. शहराध्यक्ष राजेश लाटकर, आर. के. पोवार, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, संगीता खाडे, रघुनाथ जाधव, राजाराम कासार, दत्ता गाडवे, सुनील कारंडे, शंकर पाटील, सुरेश पाटील, जी. डी. पाटील, राजश्री पाटील, तेजस पाटील, सुनील पाटील, रंगराव ढेरे, संभाजी पाटील, विश्वनाथ पाटील, आदी उपस्थित होते. किरण पाटील यांनी आभार मानले.मुश्रीफांच्या नेतृत्वाखालीच कामभाजपवर टीकास्त्र सोडत, गेल्या चार वर्षांत मतदारसंघात साडेसहा हजार कोटींची कामे खेचून आणल्याचे सांगत खासदार महाडिक म्हणाले, जाहीरनाम्यातील आश्वासनांची पूर्तता केली आहे. आगामी काळात हसन मुश्रीफ यांच्याच नेतृत्वाखाली राष्टÑवादी बळकट करण्याचे काम करू.