शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

चंद्रकांतदादांनी विधानसभेला उभे राहावे; त्यांना ताकद दाखवू : गजानन कीर्तिकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 15:19 IST

शिवसेना संपवायला निघालेल्या पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची मनमानी इथून पुढे सहन केली जाणार नाही. त्यांनी येणाºया विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरातील एक मतदार संघ निवडून तेथून उभा राहून दाखवावे, त्यावेळी शिवसेना त्यांना आपली ताकद दाखवेल असे थेट आव्हान शिवसेना नेते खासदार गजानन किर्तीकर यांनी रविवारी येथे दिला.

ठळक मुद्दे शिवसेना पदाधिकारी मेळावा कोल्हापूरात आमदारांवरील अन्यायाविरोधात शिवसेना रस्त्यावर उतरणार जिल्ह्यात आठ आमदार व एक खासदार निवडून आणण्यासाठी कामाला लागावे

कोल्हापूर :शिवसेना संपवायला निघालेल्या पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची मनमानी इथून पुढे सहन केली जाणार नाही. त्यांनी येणा-या विधानसभा निवडणुकीत कोल्हापूरातील एक मतदार संघ निवडून तेथून उभा राहून दाखवावे, त्यावेळी शिवसेना त्यांना आपली ताकद दाखवेल असे थेट आव्हान शिवसेना नेते खासदार गजानन किर्तीकर यांनी रविवारी येथे दिला.

भाजपा जनाधार विकत घेऊन आमच्या मागे जनतेची ताकद असल्याचे चित्र निर्माण करत आहे, अशी खिल्ली उडवित जिल्ह्यात आठ आमदार व एक खासदार निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे असे आवाहनही त्यांनी केले.

कळंबा रोडवरील अमृतसिध्दी हॉल येथे शिवसेनेच्या कोल्हापूर व हातकणंगले लोकसभा मतदारसंघांतील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, गटप्रमुख, अंगीकृत संघटनांचे प्रमुख पदाधिकाºयांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.

यावेळी संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव, आमदार सर्वश्री चंद्रदीप नरके, राजेश क्षीरसागर, सत्यजीत पाटील-सरुडकर, उल्हास पाटील, डॉ. सुजित मिणचेकर आदी प्रमुख उपस्थित होते.

शिवसेना संपविण्यासाठी पालकमंत्री पाटील यांच्याकडून पावले उचलली आहेत. त्यांच्याकडून शिवसेनेच्या आमदारांना जिल्हा नियोजनमधील निधी न देणे तसेच आपल्या अधिकाराचा गैरवापर करुन त्यांच्यावर खोट्या पोलीस केसेस दाखल करणे असे प्रकार होत आहेत. ते थांबविले नाही तर शिवसेना त्यांच्याविरोधात रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल असा इशारा किर्तीकर यांनी दिला.

शिवसेनेच्या पाठबळामुळेच राज्यात भाजपाचे सरकार असून त्यामुळे चंद्रकांतदादा पाटील हे राज्याचे मंत्री व पालकमंत्री झाले आहेत हे त्यांनी विसरु नये. असा टोलाही त्यांनी लगावला. जिल्ह्यात शिवसेनेचे सहा आमदार असून लोकसभेचा उमेदवार थोडक्यात पराभूत झाला आहे. या माध्यमातून शिवसेनेला जिल्ह्यात ६५ टक्के जनाधार मिळाला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत जिल्ह्यात किमान आठ आमदार, एक खासदार निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी तयारीला लागावे, असे आवाहन किर्तीकर यांनी व्यक्त केला.

कोल्हापूरसह सांगली व सातारा जिल्ह्यात किमान १६ आमदार व राज्यात १५० आमदार निवडून येतील असा विश्वास व्यक्त करत आगामी निवडणूक ही स्वबळावरच लढण्याचे संकेतही त्यांनी यावेळी दिले.

अरुण दुधवडकर म्हणाले, भाजपाने आयात उमेदवारांवर कोणतीही वल्गना केली तरी आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना ठामपणे सामारी जाईल. संजय पवार म्हणाले, पक्षप्रमुख उध्दव ठाकरेंच्या करारी बाण्यामुळे जिल्ह्यात शिवसेनेला विधानसभा, जिल्हा परिषद, नगरपालिका या ठिकाणी भरघोस यश मिळाले आहे. ग्रामपंचायतीवर पक्षा झेंडा फडकविण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे.