शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

‘कुंभी’त पुन्हा विजयाचा ‘चंद्रदीप’

By admin | Updated: December 30, 2015 01:11 IST

‘बचाव मंच’चा धुव्वा : नरके पॅनेलची हॅट्ट्रिक, ‘संदीप’चा ‘पतंग’ हवेतच : वीस जागा आठ हजारांच्या फरकाने विजयी

प्रकाश पाटील -कोपार्डे  -संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत आमदार चंद्रदीप नरके यांच्या नेतृत्वाखालील ‘नरके पॅनेल’ने विजयाची हॅट्ट्रिक केली. नरके पॅनेलच्या सर्वच्या सर्व २० जागा सरासरी आठ हजारांच्या फरकाने विजयी झाल्या. विरोधी बाजीराव खाडे यांच्या नेतृत्वाखालील ‘कुंभी बचाव मंच’चा अक्षरश: धुव्वा उडाला असून, अपक्ष उमेदवार संदीप अरुण नरके यांची निवडणुकीतील हवा मतपेटीपर्यंत पोहोचली नसल्याने त्यांचा ‘पतंग’ हवेतच राहिला. इतर मागासवर्गीय गटातून सत्तारूढ गटाचे उमेदवार आनंदराव माने हे बिनविरोध म्हणून अगोदरच निवडून आले होते. ‘कुंभी’च्या निवडणुकीत सत्तारूढ ‘नरके पॅनेल’विरोधात ‘राजर्षी शाहू कुंभी बचाव मंच’ने जोरदार आव्हान देण्याचा प्रयत्न केला. ऐनवेळी पॅनेलची बांधणी करीत बाजीराव खाडे यांनी टक्कर देण्याचा प्रयत्न केला; पण त्यामध्ये त्यांना यश आले नाही. २० जागांसाठी रविवारी २२ हजार ७२७ मतांपैकी १९ हजार ६५४ मतदारांनी (८६ टक्के) मतदानाचा हक्क बजावला होता. मंगळवारी सकाळी आठपासून रमणमळा येथील शासकीय बहुउद्देशीय हॉलमध्ये मतमोजणीस सुरुवात झाली. पहिल्या फेरीत १ ते ५३ केंद्रांतील म्हणजेच करवीर तालुक्यातील गट क्रमांक १ ते ३ मधील मतमोजणी करण्यात आली. यामध्ये सुरुवातीपासूनच नरके पॅनेलने मताधिक्य घेत विजयाकडे आगेकूच सुरू ठेवली होती. पहिल्या फेरीचा निकाल तब्बल आठ तासांनी दुपारी चार वाजता जाहीर करण्यात आला. यामध्ये नरके पॅनेलचे सर्वच उमेदवार बचाव मंचच्या उमेदवारांपेक्षा २८०० ते ३५०० च्या मताधिक्याने आघाडीवर राहिले. संदीप नरके यांना ‘करवीर’मधील मतदारांनी साथ दिल्याने ते नरके पॅनेलच्या गट क्रमांक पाच मधील उमेदवार प्रकाश दौलू पाटील यांच्यापेक्षा केवळ १८०० मतांनी पिछाडीवर होते. त्यामुळे संदीप नरके हे उर्वरित पन्हाळा तालुक्यातील मतमोजणीत मुसंडी मारतील, असे आडाखे बांधले जात होते; पण पन्हाळ्यातील मतदारांनी आमदार नरके यांची पाठराखण करीत संदीप नरके यांना नाकारले. बचाव मंचचे नेते बाजीराव खाडे हे कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांचे खंदे समर्थक; तर ‘गोकुळ’चे संचालक बाळासाहेब खाडे यांचे ते भाऊ आहेत. त्यांनी विरोधी पॅनेलमध्ये सर्वाधिक ५१४१ मते घेतली. दुसऱ्या फेरीत केंद्र क्रमांक ५४ ते १०५ म्हणजेच पन्हाळा, शाहूवाडी, राधानगरी व करवीर या तालुक्यांतील दहा गावांतील मतमोजणी करण्यात आली. यामध्ये नरके पॅनेलच्या उमेदवारांनी जोरदार मुसंडी मारत मताधिक्यात उच्चांक गाठला. सायंकाळी सात वाजता पहिल्या गटातील निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये नरके पॅनेलचे उमेदवार अनिल पाटील यांनी १३,३९२, गट क्रमांक दोनमध्ये उत्तम वरुटे यांना १३,४८७, गट क्रमांक तीनमध्ये प्रकाश कुंडलिक पाटील यांना १३,४८१, गट क्रमांक चारमध्ये जयसिंग यशवंत पाटील यांना १३,१६३, तर गट क्रमांक पाचमध्ये आमदार चंद्रदीप नरके यांनी १३,०४८ अशी सर्वाधिक मते घेतली. महिला गटात अनिता पाटील यांना १३,०४२ व माधुरी पाटील यांना १३,०४० मते पडली. त्यांच्या निकटच्या प्रतिस्पर्धी कविता पाटील यांच्यावर मोठे मताधिक्य घेऊन बाजी मारली. अनुसूचित जाती गटात यल्लाप्पा कांबळे यांना १२,८५९ मते मिळाली तर भटक्या-विमुक्त गटात दिलीप गोसावी यांनी १३,७४० मते घेऊन विजय मिळविला. पहिल्या गटातील निकाल जाहीर होताच नरके पॅनेलच्या समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करीत गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला. पॅनेलचे प्रमुख आमदार चंद्रदीप नरके रात्री १० वाजता मतमोजणी केंद्रावर दाखल झाले. यावेळी त्यांच्या समर्थकांनी एकच जल्लोष करून त्यांना उचलून घेऊन विजयोत्सव साजरा केला. निवडणूक निर्णय अधिकारी संजय पवार, सहायक निवडणूक अधिकारी योगेश खरमाटे व प्रदीप मालगावे यांनी मतमोजणीचे नेटके नियोजन केले होते. गेले पंचवार्षिक निवडणुकीतील मतमोजणी दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत सुरू होती; पण संजय पवार यांनी मतमोजणीचे केलेल्या नियोजनामुळे रात्री दहापर्यंत सर्वच गटांचे निकाल जाहीर करण्यात आल्याने उमेदवार व त्यांच्या समर्थकांमधून निवडणूक यंत्रणेचे कौतुक करण्यात आले. अवैध मतांचा टक्का वाढला!पहिल्या फेरीत अनुसूचित जाती / जमाती गटात १६१२ मते अवैध ठरली. या गटात सात उमेदवार असल्याने मतदार काहीसे गोंधळून गेल्याचे दिसले. महिला गटाच्या मतपत्रिकेनंतर ही मतपत्रिका असल्याने मतदारांनी या गटातही दोन शिक्के मारल्याने एवढ्या मोठ्या प्रमाणात मते अवैध ठरली. क्रॉस व्होटिंगमुळे ६०० पासून २८५४ पर्यंत मते अवैध ठरल्याचे स्पष्ट झाले. संदीप नरके, बाजीराव खाडे शेवटपर्यंत तळ ठोकूनपहिल्या फेरीतच निकालाचा कल लक्षात आला होता. नरके पॅनेलच्या उमेदवारांची विजयाकडे घोडदौड होती; पण मतमोजणी केंद्रात संदीप नरके व बाजीराव खाडे शेवटपर्यंत तळ ठोकून होते. संदीप यांच्याविषयी उत्सुकता निवडणूक एकतर्फी असल्याने निकाल काय लागणार हे माहीत होते; पण संदीप नरके हे मुसंडी मारतील, असे चित्र होते. त्यामुळे मतमोजणीस सुरुवात झाल्यापासून ‘संदीप नरकेंचे काय झाले?’ एवढीच विचारणा अनेकांकडून होत होती.