शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
3
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
4
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
5
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
6
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
7
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
8
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
9
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
10
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
11
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
12
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
13
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
14
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
15
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
16
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
17
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
18
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
19
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
20
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय

चांदोलीत बनावट प्रकल्पग्रस्तांना रोखले

By admin | Updated: July 31, 2016 00:50 IST

जमीन संपादनाचा डाव उधळला : महामार्गावरच घेराव; गावात पुन्हा न येण्याचा इशारा

 आंबा : चांदोली (ता. शाहूवाडी) येथे जमीन संपादनास आलेल्या महसूल अधिकाऱ्यांसह बनावट प्रकल्पग्रस्त खातेदारांना ग्रामस्थांनी महामार्गावरच घेराव घालून सायंकाळपर्यंत रोखले. काठ्या व रॉकेल घेऊन आकस्मिक आलेला ग्रामस्थांचा जमाव पाहून संपादनास आलेल्या मंडळींनी काढता पाय घेतला. मात्र, धावत्या गाडीला महिला सामोऱ्या होऊन बनावट खातेदारांना जाब विचारत गावात पुन्हा पाय ठेवला तर खुब्यातून काढू, अशी धमकी देत महसूल अधिकाऱ्यांना धारेवर धरले. दुपारी एक वाजता जिल्हा पुनर्वसन विभागाचे भूमापक संदीप पाटील, मंडल अधिकारी एस. ए. गावित, तलाठी एम. एस. उपाध्ये अन्य चार खातेदारांना घेऊन पांडुरंग शिंदे यांची गट नं. १६६ मधील ४० व ३८ गुंठे, तर दिलीप शिंदे यांची गट नं. २२२ मधील ३८ गुंठे जमीन संपादनास दाखल झाले. अप्पर जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने अण्णा मारुती सुतार, शामराव आवजी पाटील व दत्तू मारुती सुतार (रा. सर्व कोडोली ) या वारणा प्रकल्पग्रस्तांना जिल्हाधिकारी यांचे नावे वर्ग केलेली ही जमीन शनिवारी संपादित होणार होती. मात्र, प्रत्यक्षात आदेशावरचे खातेदार नसल्याचे समजताच ग्रामस्थांनी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र, माजी सरपंच आनंदा पाटील व उपसरपंच सुनीता कुंभार यांनी मध्यस्थी करून ग्रामस्थांना शांत केले व अधिकाऱ्यांना शेतातून ग्रामपंचायत कार्यालयात नेऊन ग्रामस्थांच्या बैठकीत जाब विचारला. यावेळी अधिकाऱ्यांसोबत आलेल्या कोडोली परिसरातील रणजित पाटील, शिवाजी पाटील, प्रवीण कोल्ले, सुरेश चौगुले ही मंडळी जमीन संपादनास कशी आली हे विचारता संबंधित अधिकाऱ्यांनी त्यांचा व माझा काही संबंध नसल्याचे सांगितले, तर संबंधित चौघांनी आम्ही भूमापक संदीप पाटील यांच्यासोबत आल्याचे आंदोलनकर्त्या महिलांना सांगितले. त्यामुळे बनावट खातेदारांबरोबर भूमापकही व आदेशही बनावट असल्याची शंका घेऊन संपादनास आलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामपंचायतीत पुन्हा रोखले. जिल्हाधिकारी आल्याशिवाय तुम्ही येथून हलायचे नाही, असा पवित्रा महिला आंदोलकांनी घेतला. दरम्यान, शाहूवाडीचे नायब तहसीलदार यांना बोलावण्याचा आग्रह नामदेव पाटील व संदीप पाटील यांनी धरला, पण साहेब बैठकीमध्ये असल्याचा मेसेज गावित यांनी ग्रामस्थांना दाखवून वेळ मारून नेली. (वार्ताहर) आत्मदहनाचा प्रयत्न संपादनास आलेल्या बोगस खातेदारांना पोलिसांत देण्याची मागणी सदस्य नामदेव पाटील यांनी केली, तर लक्ष्मी शिंदे हिने चक्क रॉकेल भरलेला डबा घेऊन बोगस खातेदारांच्या गाडीपुढे येऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, महिलांनी तिला रोखले. हे गाव भूसंपादनातून वगळले नाही तर तेरा शेतकरी आत्मदहन करणार असल्याचा इशारा माजी सरपंच आनंदा पाटील यांनी यावेळी दिला. मंडल अधिकारी यांनी ग्रामस्थांच्या लेखी मागणीनुसार संपादनाची कारवाई थांबवण्यात येत असल्याचे जाहीर केले व त्यानंतर ग्रामस्थांनी रोखलेल्या मंडळींची सुटका केली.