शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

चांदोली धरण ५० टक्के भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2021 04:17 IST

सतीश नांगरे लोकमत न्यूज नेटवर्क शित्तूर-वारूण : गेल्या पाच ते सहा दिवसांपासून चांदोली धरणक्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या ...

सतीश नांगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

शित्तूर-वारूण :

गेल्या पाच ते सहा दिवसांपासून चांदोली धरणक्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने आज चांदोली धरण यावर्षी पहिल्यांदाच जून महिन्यामध्ये ५०.६६ टक्के भरले आहे. ३४.४० टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या धरणात आजपर्यंत १७.४३ टीएमसी साठा झाला असून, धरणाची पाणीपातळी ६०६.७५ मीटर इतकी झाली आहे.

सध्या धरणातून १ हजार ६०७ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग वारणा नदी पात्रात सुरू आहे.

चांदोली धरणातून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार वारणा डावा व उजवा कालवा, वाकुर्डे योजना व वारणा नदीत पाणी सोडले जाते. त्यामुळे वारणा धरण पूर्ण भरण्याकडे लोकांचे लक्ष लागून राहिलेले असते. निर्धारित क्षमतेपर्यंत पाणी साठा झाल्यानंतरच वारणा नदीमध्ये धरणातील पाण्याचा विसर्ग सुरू केला जातो. परिसरातील ओढे, नाले तुडुंब भरून वाहत आहेत. वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे. गेल्या चोवीस तासांत ३८ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे, तर आजअखेर एकूण ४५२ मिलिमीटर पावसाची नोंद पर्जन्यमापन केंद्रावर झाली आहे. पाणलोट क्षेत्रातून धरणामध्ये ७ हजार ६८१ क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे. सध्या धरणाची पाणीपातळी ६०६.७५ मीटर असून, पाणीसाठा ४९३.४८ द. ल. घ. मी. इतका म्हणजे १७.४३ टीएमसी इतका झाला आहे.

फोटोः २० चांदोली

चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पहिल्यांदाच जून महिन्यात धरणाच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे.