शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK: पाकिस्तानची रडारड सुरूच! FINALआधी PCBची अर्शदीप सिंगबाबत ICCकडे तक्रार, कारण...
2
OBC आंदोलने, पण कुठेत नाना पटोले; पदावरून दूर केल्याचा मूक निषेध की नव्या योजनेची तयारी? 
3
भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त
4
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
5
तुमचा गॅस एजन्सीवाला चांगली सेवा देत नाही? मोबाईल सिमप्रमाणे आता LPG गॅस कंपनी बदला
6
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
7
गर्दीवर दगडफेक, पोलिसांकडून लाठीमार, करूरमधील चेंगराचेंगरीबाबत विजयच्या पक्षाला वेगळाच संशय, केली अशी मागणी 
8
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
9
Triptii Dimri : "आयुष्यात रोमान्स करण्यासाठी..."; करोडपती बिझनेसमनच्या प्रेमात आहे अभिनेत्री, गुपचूप करतेय डेट?
10
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
11
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
12
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
13
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
14
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
15
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
16
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
17
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
18
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
19
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
20
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले

चंदगडला कोरोनाचा काजू उद्योगाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:23 IST

नंदकुमार ढेरे । चंदगड कोट्यवधी रूपयांची उलाढाल होणाऱ्या चंदगड तालुक्यातील काजू उद्योगाला कोरोना महामारीचा सलग दुसऱ्या वर्षीही फटका बसला ...

नंदकुमार ढेरे ।

चंदगड

कोट्यवधी रूपयांची उलाढाल होणाऱ्या चंदगड तालुक्यातील काजू उद्योगाला कोरोना महामारीचा सलग दुसऱ्या वर्षीही फटका बसला आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सतत बदलणारे हवामान, दाट धुक्यामुळे काजू उत्पादनात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे शेतकरी व काजू कारखानदार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. तसेच या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या कामगारांवर ही बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

दोन वर्षांपूर्वी व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात काजूचा साठा होता. दरवर्षीच्या जमा-खर्चाचा ताळमेळ घालून शेतकऱ्यांनी काजू उत्पादन चांगले होईल या आशेने मुलांची लग्ने जमवली आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी तसेच काजू-खरेदी व्यापारी व कारखानदारांनीही बँकांकडून लाखो रुपयांची कर्जे उचलली आहेत.

काजू बागामध्ये दिवसभर फिरून २ किलो काजू जमा होत नसल्याने मजुरीही मिळेनाशी झाली आहे. काजू देतो असे सांगून व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांनी काजू पोटी काही रक्कम घेतली आहे. त्याची परतफेड कशी करावी या विवंचनेत शेतकरी आहे.

गतवर्षी काजूलाही प्रति किलो ७० ते ९० रुपये दर होता. आणि काजू उत्पन्नही चांगले होते. यावर्षी काजू उत्पन्न कमी असल्यामुळे प्रति किलो ९० ते ११० रूपयांपर्यंत दर मिळत आहे.

-

-----------------------

काेट...

* काजू उत्पादन घटल्याने काजू कारखानदारी अडचणीत आली आहेत. छोटे कारखानदार कारखाने बंद करण्याच्या मार्गावर आहेत. आर्थिक मंदी जून अखेरपर्यंत राहिली तर मोठ्या कारखानदारांना याचा सामना करावा लागणार आहे. याचा फटका कारखान्यात काम करणाऱ्या महिला कामगारांना बसणार आहे. एकंदरीत कारखानदार, व्यापारी, शेतकरी मजूर अडचणीत येणार आहेत.

- शामराव बेनके, काजू कारखानदार, माणगाव.

-----------------

केळी, द्राक्ष, कापूस आदी पिकांची निसर्गाने हाल झाले तर शासन नुकसान भरपाई देते. मात्र, राज्याच्या कोकण पट्ट्यातील काजू उत्पादकांना भरपाई मिळत नाही. गेल्यावर्षी कोकणातील काजू उत्पादकांना शासनाने नुकसान भरपाई दिली होती. त्याचप्रमाणे कोकणाशी संलग्न असणाऱ्या चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी.

- नितीन पाटील, बळीराजा, शेतकरी संघटना

------------------------

* चंदगडला मद्यार्क निर्मितीच्या कारखान्यांची गरज

तालुक्यात सरासरी १० हजार टन काजू बिचे तर ४२ हजार टन काजू बोंडाचे (मुरटा) उत्पादन होते. काजू बोंडांची गोव्याचे कारखानदार कवडीमोल दराने खरेदी करतात. यामध्ये दलाल, व्यापारी आणि मद्यार्क निर्मिती कारखानदार आजपर्यंत मालामाल झालेत. काजू पिकवणारा शेतकरी मात्र कंगालच राहिला आहे. गोवा राज्याप्रमाणेच महाराष्ट्र शासनाकडून काजूच्या फळावर योग्य प्रक्रिया करण्यास परवानगी मिळत नाही. त्यामुळे चंदगड तालुक्यातील सुमारे ४२ हजार टन काजू बोंड (मुरटा) जातो. विक्रमी उत्पादन लक्षात घेता राज्य सरकारने चंदगडला मद्यार्क निर्मितीच्या कारखान्यांना परवानगी द्यावी.

- उदयकुमार देशपांडे, माजी अध्यक्ष, गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समिती.