शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

चंदगडला कोरोनाचा काजू उद्योगाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:23 IST

नंदकुमार ढेरे । चंदगड कोट्यवधी रूपयांची उलाढाल होणाऱ्या चंदगड तालुक्यातील काजू उद्योगाला कोरोना महामारीचा सलग दुसऱ्या वर्षीही फटका बसला ...

नंदकुमार ढेरे ।

चंदगड

कोट्यवधी रूपयांची उलाढाल होणाऱ्या चंदगड तालुक्यातील काजू उद्योगाला कोरोना महामारीचा सलग दुसऱ्या वर्षीही फटका बसला आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सतत बदलणारे हवामान, दाट धुक्यामुळे काजू उत्पादनात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे शेतकरी व काजू कारखानदार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. तसेच या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या कामगारांवर ही बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

दोन वर्षांपूर्वी व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात काजूचा साठा होता. दरवर्षीच्या जमा-खर्चाचा ताळमेळ घालून शेतकऱ्यांनी काजू उत्पादन चांगले होईल या आशेने मुलांची लग्ने जमवली आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी तसेच काजू-खरेदी व्यापारी व कारखानदारांनीही बँकांकडून लाखो रुपयांची कर्जे उचलली आहेत.

काजू बागामध्ये दिवसभर फिरून २ किलो काजू जमा होत नसल्याने मजुरीही मिळेनाशी झाली आहे. काजू देतो असे सांगून व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांनी काजू पोटी काही रक्कम घेतली आहे. त्याची परतफेड कशी करावी या विवंचनेत शेतकरी आहे.

गतवर्षी काजूलाही प्रति किलो ७० ते ९० रुपये दर होता. आणि काजू उत्पन्नही चांगले होते. यावर्षी काजू उत्पन्न कमी असल्यामुळे प्रति किलो ९० ते ११० रूपयांपर्यंत दर मिळत आहे.

-

-----------------------

काेट...

* काजू उत्पादन घटल्याने काजू कारखानदारी अडचणीत आली आहेत. छोटे कारखानदार कारखाने बंद करण्याच्या मार्गावर आहेत. आर्थिक मंदी जून अखेरपर्यंत राहिली तर मोठ्या कारखानदारांना याचा सामना करावा लागणार आहे. याचा फटका कारखान्यात काम करणाऱ्या महिला कामगारांना बसणार आहे. एकंदरीत कारखानदार, व्यापारी, शेतकरी मजूर अडचणीत येणार आहेत.

- शामराव बेनके, काजू कारखानदार, माणगाव.

-----------------

केळी, द्राक्ष, कापूस आदी पिकांची निसर्गाने हाल झाले तर शासन नुकसान भरपाई देते. मात्र, राज्याच्या कोकण पट्ट्यातील काजू उत्पादकांना भरपाई मिळत नाही. गेल्यावर्षी कोकणातील काजू उत्पादकांना शासनाने नुकसान भरपाई दिली होती. त्याचप्रमाणे कोकणाशी संलग्न असणाऱ्या चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी.

- नितीन पाटील, बळीराजा, शेतकरी संघटना

------------------------

* चंदगडला मद्यार्क निर्मितीच्या कारखान्यांची गरज

तालुक्यात सरासरी १० हजार टन काजू बिचे तर ४२ हजार टन काजू बोंडाचे (मुरटा) उत्पादन होते. काजू बोंडांची गोव्याचे कारखानदार कवडीमोल दराने खरेदी करतात. यामध्ये दलाल, व्यापारी आणि मद्यार्क निर्मिती कारखानदार आजपर्यंत मालामाल झालेत. काजू पिकवणारा शेतकरी मात्र कंगालच राहिला आहे. गोवा राज्याप्रमाणेच महाराष्ट्र शासनाकडून काजूच्या फळावर योग्य प्रक्रिया करण्यास परवानगी मिळत नाही. त्यामुळे चंदगड तालुक्यातील सुमारे ४२ हजार टन काजू बोंड (मुरटा) जातो. विक्रमी उत्पादन लक्षात घेता राज्य सरकारने चंदगडला मद्यार्क निर्मितीच्या कारखान्यांना परवानगी द्यावी.

- उदयकुमार देशपांडे, माजी अध्यक्ष, गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समिती.