शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

चंदगडला कोरोनाचा काजू उद्योगाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:23 IST

नंदकुमार ढेरे । चंदगड कोट्यवधी रूपयांची उलाढाल होणाऱ्या चंदगड तालुक्यातील काजू उद्योगाला कोरोना महामारीचा सलग दुसऱ्या वर्षीही फटका बसला ...

नंदकुमार ढेरे ।

चंदगड

कोट्यवधी रूपयांची उलाढाल होणाऱ्या चंदगड तालुक्यातील काजू उद्योगाला कोरोना महामारीचा सलग दुसऱ्या वर्षीही फटका बसला आहे. काजू उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. सतत बदलणारे हवामान, दाट धुक्यामुळे काजू उत्पादनात कमालीची घट झाली आहे. त्यामुळे शेतकरी व काजू कारखानदार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. तसेच या उद्योगावर अवलंबून असणाऱ्या कामगारांवर ही बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे.

दोन वर्षांपूर्वी व्यापाऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात काजूचा साठा होता. दरवर्षीच्या जमा-खर्चाचा ताळमेळ घालून शेतकऱ्यांनी काजू उत्पादन चांगले होईल या आशेने मुलांची लग्ने जमवली आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी तसेच काजू-खरेदी व्यापारी व कारखानदारांनीही बँकांकडून लाखो रुपयांची कर्जे उचलली आहेत.

काजू बागामध्ये दिवसभर फिरून २ किलो काजू जमा होत नसल्याने मजुरीही मिळेनाशी झाली आहे. काजू देतो असे सांगून व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांनी काजू पोटी काही रक्कम घेतली आहे. त्याची परतफेड कशी करावी या विवंचनेत शेतकरी आहे.

गतवर्षी काजूलाही प्रति किलो ७० ते ९० रुपये दर होता. आणि काजू उत्पन्नही चांगले होते. यावर्षी काजू उत्पन्न कमी असल्यामुळे प्रति किलो ९० ते ११० रूपयांपर्यंत दर मिळत आहे.

-

-----------------------

काेट...

* काजू उत्पादन घटल्याने काजू कारखानदारी अडचणीत आली आहेत. छोटे कारखानदार कारखाने बंद करण्याच्या मार्गावर आहेत. आर्थिक मंदी जून अखेरपर्यंत राहिली तर मोठ्या कारखानदारांना याचा सामना करावा लागणार आहे. याचा फटका कारखान्यात काम करणाऱ्या महिला कामगारांना बसणार आहे. एकंदरीत कारखानदार, व्यापारी, शेतकरी मजूर अडचणीत येणार आहेत.

- शामराव बेनके, काजू कारखानदार, माणगाव.

-----------------

केळी, द्राक्ष, कापूस आदी पिकांची निसर्गाने हाल झाले तर शासन नुकसान भरपाई देते. मात्र, राज्याच्या कोकण पट्ट्यातील काजू उत्पादकांना भरपाई मिळत नाही. गेल्यावर्षी कोकणातील काजू उत्पादकांना शासनाने नुकसान भरपाई दिली होती. त्याचप्रमाणे कोकणाशी संलग्न असणाऱ्या चंदगड, आजरा, गडहिंग्लज तालुक्यातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी.

- नितीन पाटील, बळीराजा, शेतकरी संघटना

------------------------

* चंदगडला मद्यार्क निर्मितीच्या कारखान्यांची गरज

तालुक्यात सरासरी १० हजार टन काजू बिचे तर ४२ हजार टन काजू बोंडाचे (मुरटा) उत्पादन होते. काजू बोंडांची गोव्याचे कारखानदार कवडीमोल दराने खरेदी करतात. यामध्ये दलाल, व्यापारी आणि मद्यार्क निर्मिती कारखानदार आजपर्यंत मालामाल झालेत. काजू पिकवणारा शेतकरी मात्र कंगालच राहिला आहे. गोवा राज्याप्रमाणेच महाराष्ट्र शासनाकडून काजूच्या फळावर योग्य प्रक्रिया करण्यास परवानगी मिळत नाही. त्यामुळे चंदगड तालुक्यातील सुमारे ४२ हजार टन काजू बोंड (मुरटा) जातो. विक्रमी उत्पादन लक्षात घेता राज्य सरकारने चंदगडला मद्यार्क निर्मितीच्या कारखान्यांना परवानगी द्यावी.

- उदयकुमार देशपांडे, माजी अध्यक्ष, गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समिती.