शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

‘महाआघाडी’समोर स्वकीयांचेच आव्हान?

By admin | Updated: January 9, 2017 23:35 IST

सेना सावध : भाजप बाहेरून पाठिंबा, देसाई, होलम यांची बैठकीकडे पाठ

ज्योतीप्रसाद सावंत --आजरा साखर कारखाना निवडणुकीत अंतर्गत मतभेद विसरून सत्तेवर आलेल्या महाआघाडीत पहिल्याच बैठकीत कुरबुरी सुरू झाल्याने होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकींत सोयीच्या भूमिकेला प्राधान्य दिले जाण्याची शक्यता बळावली आहे. महाआघाडीतून कारखाना निवडणुकीत उमेदवारी घेतलेले राजू होलम पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत, तर महाआघाडीतील ज्येष्ठ नेते श्रीपतराव देसाई यांनी बैठकीकडे पाठ फिरविल्याने जि .प., पं. स. निवडणुकीत स्वकीयांचेच आव्हान उभे राहण्याची चर्चा जोर धरत आहे.आजरा साखर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीने राष्ट्रीय काँगे्रसवर राजकीय मात करीत अशोक चराटी, रवींद्र आपटे, विष्णुपंत केसरकर, शिवसेना-भाजप व स्वाभिमानी यांनी काठावरचे बहुमत मिळविले; परंतु गेल्या सात महिन्यांत पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. सहदेव नेवगे, श्रीपतराव देसाई, बापूसाहेब देसाई, राजू होलम हे स्वीकृत संचालकपदी इच्छुक आहेत; परंतु विश्वनाथअण्णा करंबळी यांना संधी दिल्यानंतर स्वीकृत सदस्यपदाच्या दुसऱ्या जागेबाबत चर्चाही नाही, अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे ही मंडळी सद्य:स्थितीत नाराजच आहेत. अशी परिस्थिती असताना ज्येष्ठ संचालक विष्णुपंत केसरकर व रमेश रेडेकर यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. तर स्वीकृत संचाकलपदी आपणाला संधी दिली जात नाही, या नाराजीतून तालुका संघाचे माजी उपाध्यक्ष राजू होलम यांनी थेट राष्ट्रवादीची वाट धरली आहे.महाआघाडीचे ताराराणी आघाडीत विलीनीकरण हे अशोकअण्णा व ‘गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे यांच्यादृष्टीने अवघड जागेचे दुखणे बनले आहे. शिवसेना तालुकाप्रमुख राजू सावंत यांनी ‘ताराराणी’त महाआघाडीच्या विलीनीकरणास थेट विरोध दर्शविला आहे तर भाजपचे तालुकाध्यक्ष देसाई यांनी असा निर्णय झालाच तर ताराराणीत भाजप असणार नाही. परंतु, बाहेरून पाठिंबा राहील, असे स्पष्ट केले.एककीडे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सल्ल्यानुसार आपण सदर निर्णय घेतल्याचे चराटी जाहीर करीत असतानाच भाजप तालुकाप्रमुखांचे विधान बऱ्याच गोष्टी सांगून जाते. चंद्रकांतदादा व अशोकअण्णांची वाढलेली सलगी चराटी यांना भाजप प्रवेशासाठी सुरू असलेला दबाव व यामुळे भाजपच्या कारभाऱ्यांचे तालुक्यात होणारे ‘कथित’ अवमूल्यन हे भाजप कार्यकर्त्यांचे दुखणे आहे.उमेदवाऱ्या जसजशा जाहीर होतील, तसे महाआघाडीतील मतभेद वाढण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपकडे उमेदवार असूनही उमेदवारी मिळण्याची शक्यता दिसत नाही, तर शिवसेनेने सर्वत्र स्वतंत्र उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू केली आहे.आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी हे आघाडीतून ताकदीने उमेदवार निवडून आणण्यासाठी एकीकडे धडपडत असताना दुसरीकडे मात्र आघाडीतील कुरबुरी वाढू लागल्या आहेत, हे नाकारता येत नाही.‘भाजप’मध्ये या लाल दिवा घ्या..अशोक चराटी यांचा अण्णा-भाऊ संस्था समूहाचे जाळे लक्षात घेऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अशोकअण्णांना थेट भाजप प्रवेशाचे आवतन दिले असल्याची चर्चा आहे, तर काही मंडळी अशोकअण्णांनी तालुका भाजप हायजॅक केल्याचा आरोपही करीत आहेत. मात्र, भाजपच्या वरिष्ठांनी अण्णांची ‘पॉवर’ चांगलीच ओळखली आहे, हे मात्र निश्चित.