शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘महाआघाडी’समोर स्वकीयांचेच आव्हान?

By admin | Updated: January 9, 2017 23:35 IST

सेना सावध : भाजप बाहेरून पाठिंबा, देसाई, होलम यांची बैठकीकडे पाठ

ज्योतीप्रसाद सावंत --आजरा साखर कारखाना निवडणुकीत अंतर्गत मतभेद विसरून सत्तेवर आलेल्या महाआघाडीत पहिल्याच बैठकीत कुरबुरी सुरू झाल्याने होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकींत सोयीच्या भूमिकेला प्राधान्य दिले जाण्याची शक्यता बळावली आहे. महाआघाडीतून कारखाना निवडणुकीत उमेदवारी घेतलेले राजू होलम पुन्हा राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत, तर महाआघाडीतील ज्येष्ठ नेते श्रीपतराव देसाई यांनी बैठकीकडे पाठ फिरविल्याने जि .प., पं. स. निवडणुकीत स्वकीयांचेच आव्हान उभे राहण्याची चर्चा जोर धरत आहे.आजरा साखर कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादीने राष्ट्रीय काँगे्रसवर राजकीय मात करीत अशोक चराटी, रवींद्र आपटे, विष्णुपंत केसरकर, शिवसेना-भाजप व स्वाभिमानी यांनी काठावरचे बहुमत मिळविले; परंतु गेल्या सात महिन्यांत पुलाखालून बरेच पाणी गेले आहे. सहदेव नेवगे, श्रीपतराव देसाई, बापूसाहेब देसाई, राजू होलम हे स्वीकृत संचालकपदी इच्छुक आहेत; परंतु विश्वनाथअण्णा करंबळी यांना संधी दिल्यानंतर स्वीकृत सदस्यपदाच्या दुसऱ्या जागेबाबत चर्चाही नाही, अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे ही मंडळी सद्य:स्थितीत नाराजच आहेत. अशी परिस्थिती असताना ज्येष्ठ संचालक विष्णुपंत केसरकर व रमेश रेडेकर यांच्यात दुरावा निर्माण झाला आहे. तर स्वीकृत संचाकलपदी आपणाला संधी दिली जात नाही, या नाराजीतून तालुका संघाचे माजी उपाध्यक्ष राजू होलम यांनी थेट राष्ट्रवादीची वाट धरली आहे.महाआघाडीचे ताराराणी आघाडीत विलीनीकरण हे अशोकअण्णा व ‘गोकुळ’चे संचालक रवींद्र आपटे यांच्यादृष्टीने अवघड जागेचे दुखणे बनले आहे. शिवसेना तालुकाप्रमुख राजू सावंत यांनी ‘ताराराणी’त महाआघाडीच्या विलीनीकरणास थेट विरोध दर्शविला आहे तर भाजपचे तालुकाध्यक्ष देसाई यांनी असा निर्णय झालाच तर ताराराणीत भाजप असणार नाही. परंतु, बाहेरून पाठिंबा राहील, असे स्पष्ट केले.एककीडे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या सल्ल्यानुसार आपण सदर निर्णय घेतल्याचे चराटी जाहीर करीत असतानाच भाजप तालुकाप्रमुखांचे विधान बऱ्याच गोष्टी सांगून जाते. चंद्रकांतदादा व अशोकअण्णांची वाढलेली सलगी चराटी यांना भाजप प्रवेशासाठी सुरू असलेला दबाव व यामुळे भाजपच्या कारभाऱ्यांचे तालुक्यात होणारे ‘कथित’ अवमूल्यन हे भाजप कार्यकर्त्यांचे दुखणे आहे.उमेदवाऱ्या जसजशा जाहीर होतील, तसे महाआघाडीतील मतभेद वाढण्याचे संकेत मिळत आहेत. भाजपकडे उमेदवार असूनही उमेदवारी मिळण्याची शक्यता दिसत नाही, तर शिवसेनेने सर्वत्र स्वतंत्र उमेदवार उभे करण्याची तयारी सुरू केली आहे.आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष अशोक चराटी हे आघाडीतून ताकदीने उमेदवार निवडून आणण्यासाठी एकीकडे धडपडत असताना दुसरीकडे मात्र आघाडीतील कुरबुरी वाढू लागल्या आहेत, हे नाकारता येत नाही.‘भाजप’मध्ये या लाल दिवा घ्या..अशोक चराटी यांचा अण्णा-भाऊ संस्था समूहाचे जाळे लक्षात घेऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अशोकअण्णांना थेट भाजप प्रवेशाचे आवतन दिले असल्याची चर्चा आहे, तर काही मंडळी अशोकअण्णांनी तालुका भाजप हायजॅक केल्याचा आरोपही करीत आहेत. मात्र, भाजपच्या वरिष्ठांनी अण्णांची ‘पॉवर’ चांगलीच ओळखली आहे, हे मात्र निश्चित.