शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

२९ कोटी कर वसुलीचे आव्हान

By admin | Updated: February 7, 2017 23:14 IST

इचलकरंजी नगरपालिका : वस्त्रोद्योगातील मंदी; निवडणूक, नोटाबंदीचा परिणाम

इचलकरंजी : वस्त्रोद्योगातील मंदी, नगरपालिका निवडणूक, नोटाबंदी अशा समस्यांचा परिणाम येथील घरफाळा व पाणीपट्टी वसुलीवर झाला आहे. वसुलीची रक्कम ४४.६० कोटी रुपये असताना अद्यापपर्यंत १५ कोटी २ लाख रुपये इतकीच वसुली झाली आहे. परिणामी, अवघ्या पावणे दोन महिन्यात ९० टक्क्यांहून अधिक वसुलीचे आव्हान नगरपालिकेसमोर उभे आहे.नगरपालिकेच्या हद्दीतील असलेल्या मालमत्तांकडे घरफाळा आणि पाणीपट्टी यांची ३० कोटी ७७ लाख रुपयांची मागणी आहे. तर मागील १५ कोटी २३ लाख रुपयांची थकीत वसुली आहे. त्यापैकी १ कोटी ४० लाख रुपये नगरपालिकेच्या शाळा आणि पाणीपट्टीची पोकळ वसुली आहे. सदरची १ कोटी ४० लाख रुपयांची रक्कम थकबाकीतून रद्द करावी, अशा आशयाचा प्रस्ताव नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेसमोर ठेवण्यात येणार असल्याची माहिती अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. पवन म्हेत्रे यांनी दिली. त्यामुळे ४४ लाख ६० हजार रुपये इतके वसूल करण्याचे आव्हान नगरपालिकेकडील कर वसुली खात्याकडे आहे.वस्त्रोद्योगात असलेल्या मंदीचा परिणाम कर वसुलीत झाला असताना नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका व त्यानंतर आलेली नोटाबंदी याचाही अनिष्ट परिणाम कर वसुलीवर होत आहे. त्यामुळे डिसेंबरअखेर ३९ टक्के इतकीच म्हणजे १३ कोटी ४९ लाख रुपये वसुली झाली होती. त्यानंतर आता नगरपालिकेने कर वसुलीकडे लक्ष दिले असून, जानेवारीअखेर ही वसुली १५ कोटी २ लाख रुपये एवढी वसुली झाली आहे. अशा स्थितीमध्ये यंदा चतुर्थ वार्षिक कर आकारणी करण्यात आली असून, घरफाळ्याच्या आकारणीमध्ये वीस टक्क्यांनी वाढ झाली आहे. अशा प्रकारच्या घरफाळ्यामध्ये झालेल्या वाढीबाबत नगरपालिकेने हरकती व सूचना मागविल्या आहेत. या हरकती व सूचना अपिलीय समितीसमोर ठेवून त्याची निर्गत करणे आवश्यक आहे. (प्रतिनिधी)कर वसुलीसाठी तीन पथकेघरफाळा व पाणीपट्टी वसुली वेगाने करण्यासाठी कर वसुली खात्याकडे तीन पथके निर्माण केली आहेत. सुरूवातीच्या टप्प्यात ज्या मालमत्ताधारकांकडे एक लाखाहून अधिक रकमेची थकबाकी आहे, त्यांच्याकडे जाऊन वसुली करणे असे ध्येय ठेवण्यात आले आहे. मालमत्ताधारकांकडे गेल्यानंतर त्यांच्या शंकांचे निरसन करून थकीत रकमेची वसुली केली जात आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी नाईलाजास्तव पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई सुद्धा सुरू केले असल्याचे अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. म्हेत्रे यांनी स्पष्ट केले.प्रांताधिकाऱ्यांना वेळ नसल्याने वसुलीत घट१ घरफाळ्याच्या वाढीबाबत मागविण्यात आलेल्या हरकती व सूचनांविषयीची सुनावणी अपिलीय समितीसमोर होते. अपिलीय समितीचे अध्यक्ष प्रांताधिकारी असून, समितीचे सदस्य नगराध्यक्ष, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती, विरोधी पक्षनेता व नगररचना सहायक संचालक असतात. या समितीचे सचिव मुख्याधिकारी असतात. २ सध्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका सुरू असून, प्रांताधिकारी समीर शिंगटे निवडणुकीकडे कार्यरत आहेत. त्यामुळे अपिलीय समिती स्थापित झालेली नाही. आणि अपिलीय समितीच्या सुनावणीमध्ये वाढलेला घरफाळा कमी होणार असल्याच्या अपेक्षेमुळे मालमत्ताधारकांकडून घरफाळा भरला जात नाही. ३प्रांताधिकाऱ्यांकडे निवडणुकीतून अपिलीय समितीकडे लक्ष देण्यास वेळ नाही, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाल्याने घरफाळ्याची वसुली होत नाही, असे त्रांगडे निर्माण झाले आहे.