शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

बालेकिल्ला टिकविण्याचे कॉँग्रेससमोर आव्हान

By admin | Updated: June 14, 2014 01:25 IST

महायुतीमुळे ‘स्वाभिमानी’चे बळ वाढले : विधानसभेला तालुक्याच्या राजकारणाची दिशा बदलणार

संदीप बावचे, शिरोळ : शिरोळ मतदारसंघ कॉँग्रेसचा बालेकिल्ला असला तरी लोकसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेले मताधिक्य यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीला महायुतीचे कडवे आव्हान पेलावे लागणार आहे. कॉँग्रेसकडून आमदार सा. रे. पाटील निवडणुकीत उतरणार का? हा महत्त्वाचा मुद्दा असून, विधानसभेची ही निवडणूक निश्चितच तालुक्यातील राजकीय दिशा बदलणारी ठरणार आहे. या मतदारसंघात आठ जिल्हा परिषद, तर सोळा पंचायत समितीचे मतदारसंघ आहेत. ५३ गावे व दोन शहरांचा तालुक्यात समावेश असून, राजकीयदृष्ट्या संवेदनशील म्हणून जिल्ह्यात तालुक्याची ओळख आहे. गेल्या निवडणुकीत कॉँग्रेसचे आमदार सा. रे. पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उल्हास पाटील व शिवसेनेचे राजू कुरडे रिंगणात होते, पण खरी लढत स्वाभिमानी व कॉँग्रेस पक्षातच झाली. यापूर्वी दोनवेळा आमदार म्हणून निवडून आलेले ज्येष्ठ नेते सा. रे. पाटील १६ हजार ४४६ मतांनी विजयी झाले. यात त्यांना राष्ट्रवादी, जनसुराज्य व मित्रपक्षांचा पाठिंबा महत्त्वाचा ठरला. गेल्या पाच वर्षांत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकींमध्ये स्वाभिमानी संघटनेने यश मिळविले. पंचायत समितीवर स्वाभिमानीने सत्ता मिळविली, तर जयसिंगपूर बाजार समिती व जयसिंगपूर, कुरुंदवाड नगरपालिकेच्या निवडणुकीत स्वाभिमानीला खाते उघडता आले नाही. ऊस आंदोलनाच्या माध्यमातून स्वाभिमानीने आपली चळवळ कायम ठेवली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी मोठ्या मताधिक्याने विजयी झाले. तालुक्यातील मताधिक्यातही वाढ झाल्याने विधानसभा निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या उमेदवाराला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. येणारी विधानसभा निवडणूक महायुतीच्या छताखाली लढविल्या जाणार असल्याने ‘स्वाभिमानी’चे बळ आणखीन वाढणार आहे. गेल्या निवडणुकीत सेनेच्या उमेदवाराने २८ हजार ८४ मते घेतली होती, ही मते घेणारे कुरडे यांनी शिवसेनेला रामराम ठोकून राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तालुक्यातून २३ हजारांचे मताधिक्य शेट्टी यांना मिळाल्यामुळे तगडा उमेदवार महायुतीच्या उमेदवाराविरोधात कॉँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला उभा करावा लागणार आहे. स्वाभिमानीकडून जिल्हा उपाध्यक्ष उल्हास पाटील, जि. प.चे बांधकाम सभापती सावकर मादनाईक यांची नावे चर्चेत आहेत. कॉँग्रेस व राष्ट्रवादीने स्वबळावर निवडणुका लढल्यास राष्ट्रवादीकडून राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचे नाव घोषित होऊ शकते. राष्ट्रवादीकडून विठ्ठलराव नाईक निंबाळकर, दलितमित्र अशोकराव माने दोघे इच्छुक आहेत. कॉँग्रेस व राष्ट्रवादीतील गटबाजीचा फायदा आजपर्यंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने उठविला आहे. लोकसभा निवडणुकीत मात्र हे सर्वजण एकत्र आले होते. ही गटबाजी संपुष्टात येणार की पुन्हा विधानसभेला गटबाजीचे दर्शन घडणार यावरही बरेच काही अवलंबून आहे. पक्षापेक्षा गटातटाचे राजकारण तालुक्यात आतापर्यंत दिसून आले आहे. लोकसभा निकालानंतरही कॉँग्रेस-राष्ट्रवादी अद्याप झोपलेली असल्यासारखे दिसत आहे. लोकसभेतील मताधिक्यामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. विधानसभेतही महायुती भक्कमपणे निवडणूक रिंगणात उतरली तर विजय अवघड नाही; परंतु जातीय समीकरणावरच ही निवडणूक होईल, असेच संकेत आहेत.