शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

कोल्हापूर शहराचे रखडलेले प्रकल्प पूर्णत्वास नेण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 12:01 IST

सुमारे ४८५ कोटींची ही महापालिकेच्या इतिहासातील सर्वांत मोठी योजना पूर्ण करण्याचे उत्तरदायित्व महापालिकेचेच होते; परंतु काही महत्त्वाच्या गोष्टीत राज्य सरकार

ठळक मुद्दे रखडलेल्या कामांना गती देण्याचे काम नव्या सरकारला करावे लागणार आहे.

कोल्हापूर : राज्यात भाजपची, तर महानगरपालिकेत कॉँग्रेस आघाडीची सत्ता राहिल्यामुळे गेल्या पाच वर्षांत कोल्हापूरचे अनेक प्रकल्प रखडले. शहर विकासापासून वंचित राहिले; मात्र आता नव्या सरकारसमोर शहरवासीयांच्या जिव्हाळ्याचे प्रकल्प पूर्ण करण्याचे एक आव्हान असणार आहे.

कोल्हापूर शहराला काळम्मावाडी धरणातून थेट पाईपलाईन टाकून पाणी पुरवठा करण्याची योजना २०१४ मध्ये कॉँग्रेस आघाडी सरकारने मंजूर केली. सुमारे ४८५ कोटींची ही महापालिकेच्या इतिहासातील सर्वांत मोठी योजना पूर्ण करण्याचे उत्तरदायित्व महापालिकेचेच होते; परंतु काही महत्त्वाच्या गोष्टीत राज्य सरकार अथवा पालकमंत्री यांचे सहकार्य अपेक्षित होते ते मिळाले नाही; त्यामुळे हा प्रकल्प रखडला आहे.

पाच कोटी खर्चाचा सेफ सिटी प्रकल्प - दुसरा टप्पा, सात कोटींचे बहुमजली वाहनतळ, १४ कोटींचा केशवराव भोसले नाट्यगृह व खासबाग मैदान सुशोभीकरण - दुसरा टप्पा, ८० कोटींचा अंबाबाई मंदिर विकास आराखडा, १७० कोटींचा अमृत योजना प्रकल्प, नर्सरी बागेतील छत्रपती शाहू समाधिस्थळ, दुसरा टप्पा, १० कोटींचा नगरोत्थान योजनेतील रस्ते यासह अन्य काही महत्त्वाची विकास कामे रखडलेली आहेत. रखडलेल्या कामांना गती देण्याचे काम नव्या सरकारला करावे लागणार आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिकाGovernmentसरकार