शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कौशल्यपूर्ण मनुष्यबळ घडविण्याचे आव्हान

By admin | Updated: February 3, 2017 00:44 IST

प्रतापसिंह देसाई : तंत्रशिक्षणात समान अभ्यासक्रमासाठी पाठपुरावा

‘अखिल भारतीय तंत्रशिक्षण संस्था’ (आयएसटीई) ही तंत्रशिक्षण क्षेत्रातील सभासदसंख्येवर आधारित जगातील सर्वांत मोठी संस्था आहे. या संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्राला तीन वर्षे पूर्णवेळ अध्यक्षाची संधी कोल्हापूरचे प्रतापसिंह देसाई यांच्या माध्यमातून मिळाली. देसाई यांच्याद्वारे कोल्हापूरचा तंत्रशिक्षण क्षेत्रात आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय पातळीवर सन्मान झाला आहे. अध्यक्षपदाची दोन वर्षे पूर्ण करणाऱ्या देसाई यांच्याशी ‘आयएसटीई’ची सुरुवात, कामकाज, भविष्यातील उपक्रम, तंत्रशिक्षणाची अवस्था, आव्हाने आदींबाबत साधलेला हा थेट संवाद.प्रश्न : ‘आयएसटीई’ची सुरुवात कशी झाली?उत्तर : सन १९४१ मध्ये ‘आयएसटीई’ची सुरुवात झाली. प्रारंभी ही संस्था देशातील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्यांची संस्था म्हणून कार्यरत होती. सन १९६८ मध्ये इंडियन सोसायटी अ‍ॅक्टनुसार ही संस्था नोंदणीकृत झाली. अभियांत्रिकी, औषध निर्माण शास्त्र, एमबीए, एमसीए या अभ्यासक्रमांच्या नियमनाचे काम या संस्थेद्वारे करण्यात येत होते. केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास विभागाची सल्लागार म्हणून संस्था कार्यरत होती. सन १९९३ मध्ये सरकारने अखिल भारतीय तंत्रशिक्षण संचालनालयाची (एआयसीटी) सुरुवात केली. त्यानंतर ‘आयएसटीई’च्या कामकाजाचे स्वरूप बदलले. सरकारचे तंत्रशिक्षण विषयक प्रकल्प राबविण्याचे काम संस्था करू लागली. अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतनचे १ लाख ४२ हजार प्राध्यापक आणि ८ लाख ५० हजार विद्यार्थी या संस्थेचे सभासद आहेत. देशातील ४७०० पैकी ३५०० अभियांत्रिकी महाविद्यालय आणि ३२०० तंत्रनिकेतनसह आयआयटी, एनआयटीई या संस्था सभासद आहेत. तंत्रशिक्षणातील विद्यार्थी, शिक्षक आणि संस्थांचा सर्वांगीण विकास साधणे, त्यासाठी विविध उपक्रम राबविणे हे आयएसटीईचे उद्दिष्ट आहे. देशभरातील शाखांतून संस्थेवर ७२ प्रतिनिधी निवडून येतात. ते आपल्यातून अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड करतात. संस्थेच्या स्थापनेनंतर सन १९९९ ते २००० या कालावधीत महाराष्ट्राला अध्यक्षपदाची संधी मिळाली होती. त्यानंतर पहिल्यांदाच तीन वर्षांच्या पूर्ण कालावधीसाठी महाराष्ट्रातून मला अध्यक्षपदाची संधी मिळाली आहे.प्रश्न : तंत्रशिक्षणासमोर कोणते आव्हान आहे?उत्तर : तंत्रशिक्षण क्षेत्रात अस्थिर वातावरण आहे. आपला देश वर्षाला १६ लाख अभियंते, तर उर्वरित जग सुमारे १२ लाख अभियंते निर्माण करते. मात्र, आज अशी स्थिती आहे की, अभियंते घडत आहेत, वर्षागणिक त्यांची संख्या वाढत आहे, पण कामाला योग्य असणारी आणि कौशल्यपूर्ण मनुष्यबळ मिळत नसल्याचे वास्तव आहे. कौशल्यपूर्ण मनुष्यबळ घडविण्याचे आव्हान तंत्रशिक्षणासमोर आहे. त्यासह या क्षेत्रातील गुणवत्ता, दर्जा वाढविण्याची गरज आहे. जगाला सन २०२५ पर्यंत १२० कोटी अभियांत्रिकी क्षेत्रात कुशल मनुष्यबळ लागणार आहे. हे मनुष्यबळ पुरविण्याची क्षमता आपल्या देशाकडे आहे. प्रश्न : प्राध्यापकांसाठी संस्था काय करते?उत्तर : प्राध्यापक दर्जेदार असतील, तर विद्यार्थी दर्जेदार घडतील. अभियांत्रिकी शिक्षण क्षेत्रात प्राध्यापक होण्यासाठी फारशी मोठी पात्रता असण्याची अट नाही. बी. ई., एम. ई. झाले की, प्राध्यापक म्हणून काम करता येते. या क्षेत्रात पाच टक्के लोक शिक्षक म्हणून करिअरची निवड करतात. त्याचा विपरीत परिणाम एकूणच या क्षेत्रातील अध्यापनावर होत आहे. तंत्रज्ञान हे नेहमी बदलत असते. त्यामुळे अभियंते घडविणाऱ्या प्राध्यापकांना अद्ययावत ठेवण्यासाठी आयएसटीई प्रशिक्षण देते. यासाठी नॅसकॉम, एआयसीटीसह जगातील तंत्रज्ञांची मदत घेतली जाते. क्लाऊड कॉम्प्युटिंग, डाटा अ‍ॅनेलेसिस आदींबाबत त्यांना मार्गदर्शन केले जाते. यासाठी संस्थेची प्रत्येक राज्य, जिल्ह्यात एकूण २८०० केंद्रे कार्यरत आहेत.प्रश्न : विद्यार्थ्यांकरिता कोणते उपक्रम राबविले जातात?उत्तर : स्टुडंटस् पार्टिस्पिकेशन इंजिनिअरिंग एज्युकेशन अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट (स्पीड) या संस्थेच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना बदलत्या तंत्रज्ञानाची माहिती दिली जाते. त्यात आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांशी संवाद, गटचर्चा, काही स्पर्धा घेतल्या जातात. त्यातून विद्यार्थ्यांची विषय सादरीकरणाची क्षमता वाढते. ज्ञानाची देवाण-घेवाण, सामूहिकपणे काम करण्याचे प्रशिक्षण दिले जाते. ‘जीएसएफ’या परिषदेसाठी दरवर्षी १० विद्यार्थ्यांना पाठविले जाते. यावर्षी संबंधित परिषद मलेशियाला होणार आहे. राज्यपातळीवर संस्था दरवर्षी विद्यार्थी कौशल्य विकासासाठीचे विविध स्वरूपांतील ७० उपक्रम राबविते. समस्येचे गणितीकरण केल्याशिवाय संशोधन आणि शोध होणार नाही. ते लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना विविध पद्धतीने विचार करायला प्रवृत्त करण्यासाठी केंद्र सरकारच्या सहकार्याने स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धा राबविली जात आहे. प्रश्न : गुणवत्तावाढीसाठी संस्था काय करणार आहे?उत्तर : सध्याची अभ्यासक्रमाबाबतची विद्यापीठ पातळीवरील पद्धती तंत्रशिक्षणाला अडचणीची ठरत आहे. गरजेप्रमाणे अभ्यासक्रम बदलला पाहिजे. त्यादृष्टीने सरकार, विद्यापीठ आणि एआयसीटीच्या एकत्रिकरणातून समान अभ्यासक्रम करणे गरजेचे आहे. वैद्यकीय क्षेत्रातील ‘नीट’च्या धर्तीवर अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने आयएसटीईद्वारे प्रयत्न सुरू आहेत. गुणवत्तेबाबत संस्था पातळीवरील निकष अधिक काटेकोर केले पाहिजेत. अभियंता हा एकप्रकारे रोजगार निर्माता असतो. त्यामुळे शासनाच्या मदतीने अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास उपक्रम राबविण्यात येईल. कॉम्प्युटर शाखेकडील विद्यार्थ्यांचा कल गेल्या दोन-अडीच वर्षांपासून पुन्हा वाढला आहे. राज्यातील अभियांत्रिकी महाविद्यालय, तंत्रनिकेतनमधील गुणवत्ता वाढीसाठी तंत्रशिक्षणाचे स्वतंत्र विद्यापीठ स्थापनेबाबत सरकारकडे आयएसटीईचा पाठपुरावा सुरू आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या वापरात अग्रस्थानी असलेल्या काही उद्योगांशी संस्थेने सामंजस्य करार केला आहे. त्याचा उपयोग कौशल्य विकास उपक्रम राबविण्यासाठी केला जाईल. विद्यार्थी, शिक्षकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या विकासासाठी योजना राबविण्याचा मानस आहे. - संतोष मिठारी