शहरं
Join us  
Trending Stories
1
सोन्या-चांदीचे दर कोसळले! सोनं 2,000, तर चांदी 4,000 रुपये स्वस्त; कारण काय..?
2
"कोणत्याही देशाच्या दबावाखाली व्यापार करार करणार नाही", पीयूष गोयल यांचे अमेरिकेला खडेबोल
3
दहावी पास झालेल्यांसाठी सरकारी नोकरीची संधी! ३९१ कॉन्स्टेबल जीडी पदांची भरती निघाली
4
‘मोबाईल सर्व्हेलन्स’च्या मुद्द्यावरून बावनकुळेंची सारवासारव, व्हॉट्सअप ग्रुप्सबाबत बोलल्याचा दावा
5
१ लाख व्हॉट्सअप ग्रुप, भाजपाची 'वॉर रूम'; कशी चालते यंत्रणा? बावनकुळेंनी सगळेच सांगितले
6
धडाकेबाज PSI 'बदने'वर बलात्काराचा आरोप! तस्करांना पकडणारा अधिकारी महिला डॉक्टरच्या मृत्यूनंतर फरार
7
डॉक्टर अवघड शस्त्रक्रिया करत होते. ती ऑपरेशन टेबलवर सनई वाजवत होती, व्हिडीओ व्हायरल
8
"मला न्याय हवाय, पती-मुलाला लोखंडी रॉडने मारहाण..."; भाजपा महिला नेत्याचा रस्त्यावर ठिय्या
9
'All is not well with the UN', संयुक्त राष्ट्र संघाबाबत जयशंकर यांचे मोठे वक्तव्य...
10
Crocodile Torture: वसाहतीत घुसलेल्या मगरीसोबत तरुणांचं अमानुष कृत्य, आरोपींचा शोध सुरू!
11
Asia Cup Trophy Hidden Place In Abu Dhabi : पाकची नवी नौटंकी! आशिया कप ट्रॉफी अबुधाबीत लपवली?
12
भारतीय पुरुषांच्या 'स्पर्म क्वालिटी'ने अभ्यासक अवाक्; रिपोर्टमधून 'जगावेगळं'च चित्र समोर
13
आशियाई हवाई हद्दीत अचानक उडताना दिसली रशियाची आण्विक फायटर जेट्स, नेमकं प्रकरण काय?
14
काही सेकंदात होतात जळून खाक, खाजगी बसला आग लागल्यावर प्रवाशांचं वाचणं का होतं कठीण?
15
अरे बापरे! कर्मचाऱ्याच्या प्रेमात वेडी झाली मालकीण; लग्नानंतर 'त्याने'च लावला कोट्यवधींचा चुना
16
मॅडॉक फिल्म्सच्या 'चामुंडा'मध्ये आलिया भटची एन्ट्री कन्फर्म? दिग्दर्शक अमर कौशिक म्हणाले...
17
इराणमध्ये महागाईचा कहर! हप्त्यांवर कबरीच्या दगडांची खरेदी; कारण जाणून घ्या
18
VIDEO: विराट कोहलीचा 'माईंड गेम'! आधी ट्रेव्हिस हेडशी गप्पा अन् मग पुढच्याच चेंडूवर विकेट
19
Honda vs Suzuki: होन्डा अ‍ॅक्टिव्हा आणि सुझुकी अ‍ॅक्सेसमध्ये चुरस; कोण आहे 'स्मार्ट फीचर्स'चा खरा किंग? वाचा
20
खळबळजनक दावा! सत्ताधारी २१ आमदारांना 'दिवाळी गिफ्ट'; एकाच ठेकेदारानं दिल्या आलिशान डिफेंडर कार?

अजितदादांना आव्हान, मृतांना अपघात विम्याचा लाभ द्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:24 IST

विश्वास पाटील - लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महापुरामध्ये मृत्यू पावलेल्या व जखमी झालेल्या लोकांना गोपीनाथ ...

विश्वास पाटील - लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महापुरामध्ये मृत्यू पावलेल्या व जखमी झालेल्या लोकांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळणे अवघड असल्याचे वास्तव आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (दि. २७) कोल्हापुरात पत्रकार परिषदेत या मृतांना दोन लाख रुपयांची मदत या विमा योजनेतून देण्याची घोषणा केली आहे. या वर्षीच्या महापुरात राज्यात एकूण २०९ लोकांचा मृत्यू झाला. त्यांतील २१ लोक मुंबई-पुणे, ठाणे शहरांतील आहेत. ५२ लोक जखमी असून आठजण बेपत्ता आहेत. म्हणजे उपमुख्यमंत्री पवार यांनी मनावर घेतले आणि अपघात विमा योजनेचे निकष सौम्य केले तर २४८ लोकांना लाभ होऊ शकतो. मृत्यू पावलेली व्यक्ती पैसे देऊन परत येत नाही, हे खरे असले तरी कुटुंबीयांचा संकटातील भार थोडा नक्कीच हलका होऊ शकतो.

पवार यांनी घोषणा केल्यानंतर हा लाभ मिळणे कितपत शक्य आहे, याचा शोध ‘लोकमत’ने घेतला. सध्या राज्यात युनिव्हर्सल सोम्पो या कंपनीतर्फे ही विमा योजना राबविली जाते. ७ एप्रिल २०२१ ते ६ एप्रिल २०२२ असा या योजनेचा कालावधी आहे. १० ते ७५ वर्षांच्या व्यक्तीस अपघाती मृत्यू आल्यास किंवा दोन्ही अवयव गेल्यास प्रत्येकी दोन लाख व एका अवयवाचे अपंगत्व आल्यास एक लाख रुपये मिळतात. या योजनेचा लाभ मिळण्यात दोन मुख्य अडथळे आहेत. त्यांतील एक म्हणजे व्यक्ती मृत झाल्याचा पोलीस ठाण्यातील प्रथम खबर अहवाल (एफआरआय) बंधनकारक असतो. ज्या तारखेला ही योजना सुरू झाली, त्या तारखेला (म्हणजे ७ एप्रिल २०२१) संबंधित व्यक्ती शेतकरी हवी. म्हणजे त्या व्यक्तीचे नाव सातबारा जमीन मालकीपत्रकी नोंद असले पाहिजे. आतापर्यंतचे ५० टक्के प्रस्ताव या दोन अटींमध्येच अडकून नामंजूर होत असल्याचा अनुभव आहे. महापुरात मृत्यू झाला तरी त्याला मृत घोषित करण्याची प्रक्रिया फार क्लिष्ट आहे. आपल्याकडे कुटुंबातील प्रमुखाचे नावच जमीनमालक म्हणून नोंद असते. कुटुंबातील इतर त्या शेतीचे मालक असूनही सातबारा पत्रकी त्यांचे नाव नोंद नसल्याने योजनेचा लाभच मिळत नाही. त्यामुळे राज्य सरकार हे निकष कसे शिथिल करणार, त्यावरच योजनेचा लाभ पूरग्रस्तांना मिळणार का हे ठरणार आहे.

माझ्या पतीचा गतवर्षी २५ एप्रिलला विहिरीत बुडून मृत्यू झाला; परंतु ते मृत झाल्याचे येरवडा कारागृहाने अद्याप राजपत्र प्रसिद्ध न केल्याने मला अपघात विमा योजनेचा लाभ मिळालेला नाही. तो कधी मिळणार आहे?

आनंदी बळिराम नाळे (रा. सांगरूळ, ता. करवीर)

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे २८ जुलै अखेरचे राज्यातील चित्र

वर्ष : २०१९-२०

एकूण प्रस्ताव सादर : ५७२३

प्रत्यक्ष लाभ मिळाला : ३०००

आता प्रकरणे सादर : १३००

मंजुरीच्या टप्प्यात : ५१०

प्रस्ताव नामंजूर : ९०३

(या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यात ७ एप्रिलपासून फक्त १३ प्रस्ताव दाखल झाले आहेत.)