शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अजितदादांना आव्हान, मृतांना अपघात विम्याचा लाभ द्याच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:24 IST

विश्वास पाटील - लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : महापुरामध्ये मृत्यू पावलेल्या व जखमी झालेल्या लोकांना गोपीनाथ ...

विश्वास पाटील - लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : महापुरामध्ये मृत्यू पावलेल्या व जखमी झालेल्या लोकांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा लाभ मिळणे अवघड असल्याचे वास्तव आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (दि. २७) कोल्हापुरात पत्रकार परिषदेत या मृतांना दोन लाख रुपयांची मदत या विमा योजनेतून देण्याची घोषणा केली आहे. या वर्षीच्या महापुरात राज्यात एकूण २०९ लोकांचा मृत्यू झाला. त्यांतील २१ लोक मुंबई-पुणे, ठाणे शहरांतील आहेत. ५२ लोक जखमी असून आठजण बेपत्ता आहेत. म्हणजे उपमुख्यमंत्री पवार यांनी मनावर घेतले आणि अपघात विमा योजनेचे निकष सौम्य केले तर २४८ लोकांना लाभ होऊ शकतो. मृत्यू पावलेली व्यक्ती पैसे देऊन परत येत नाही, हे खरे असले तरी कुटुंबीयांचा संकटातील भार थोडा नक्कीच हलका होऊ शकतो.

पवार यांनी घोषणा केल्यानंतर हा लाभ मिळणे कितपत शक्य आहे, याचा शोध ‘लोकमत’ने घेतला. सध्या राज्यात युनिव्हर्सल सोम्पो या कंपनीतर्फे ही विमा योजना राबविली जाते. ७ एप्रिल २०२१ ते ६ एप्रिल २०२२ असा या योजनेचा कालावधी आहे. १० ते ७५ वर्षांच्या व्यक्तीस अपघाती मृत्यू आल्यास किंवा दोन्ही अवयव गेल्यास प्रत्येकी दोन लाख व एका अवयवाचे अपंगत्व आल्यास एक लाख रुपये मिळतात. या योजनेचा लाभ मिळण्यात दोन मुख्य अडथळे आहेत. त्यांतील एक म्हणजे व्यक्ती मृत झाल्याचा पोलीस ठाण्यातील प्रथम खबर अहवाल (एफआरआय) बंधनकारक असतो. ज्या तारखेला ही योजना सुरू झाली, त्या तारखेला (म्हणजे ७ एप्रिल २०२१) संबंधित व्यक्ती शेतकरी हवी. म्हणजे त्या व्यक्तीचे नाव सातबारा जमीन मालकीपत्रकी नोंद असले पाहिजे. आतापर्यंतचे ५० टक्के प्रस्ताव या दोन अटींमध्येच अडकून नामंजूर होत असल्याचा अनुभव आहे. महापुरात मृत्यू झाला तरी त्याला मृत घोषित करण्याची प्रक्रिया फार क्लिष्ट आहे. आपल्याकडे कुटुंबातील प्रमुखाचे नावच जमीनमालक म्हणून नोंद असते. कुटुंबातील इतर त्या शेतीचे मालक असूनही सातबारा पत्रकी त्यांचे नाव नोंद नसल्याने योजनेचा लाभच मिळत नाही. त्यामुळे राज्य सरकार हे निकष कसे शिथिल करणार, त्यावरच योजनेचा लाभ पूरग्रस्तांना मिळणार का हे ठरणार आहे.

माझ्या पतीचा गतवर्षी २५ एप्रिलला विहिरीत बुडून मृत्यू झाला; परंतु ते मृत झाल्याचे येरवडा कारागृहाने अद्याप राजपत्र प्रसिद्ध न केल्याने मला अपघात विमा योजनेचा लाभ मिळालेला नाही. तो कधी मिळणार आहे?

आनंदी बळिराम नाळे (रा. सांगरूळ, ता. करवीर)

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे २८ जुलै अखेरचे राज्यातील चित्र

वर्ष : २०१९-२०

एकूण प्रस्ताव सादर : ५७२३

प्रत्यक्ष लाभ मिळाला : ३०००

आता प्रकरणे सादर : १३००

मंजुरीच्या टप्प्यात : ५१०

प्रस्ताव नामंजूर : ९०३

(या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यात ७ एप्रिलपासून फक्त १३ प्रस्ताव दाखल झाले आहेत.)