शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायावळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
2
Rinku Singh: क्रिकेटविश्व हादरलं! क्रिकेटपटू रिंकू सिंहला दाऊद गँगची धमकी, १० कोटींची खंडणी मागितली
3
योगेश कदमांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अन्यथा...; उद्धवसेना आक्रमक, अनिल परबांचे गंभीर आरोप
4
कोकणवासीयांच्या मदतीला शरद पवार सरसावले, ३२ ट्रेनची यादीच दिली; म्हणाले, ‘या’ ठिकाणी थांबवा!
5
VIRAL : अरे देवा! पाठदुखी बळावली म्हणून आजीने ८ जिवंत बेडूक गिळले; पुढे जे झालं…
6
AI मुळे आयटी क्षेत्रात मोठी उलथापालथ! TCS, विप्रो, मायक्रोसॉफ्टसह जगभरात हजारो कर्मचाऱ्यांची नोकरकपात
7
अफगाणी परराष्ट्रमंत्री आजपासून 8 दिवसांच्या भारत दौऱ्यावर; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार? जाणून घ्या...
8
Tata Capital IPO Allotment: टाटा कॅपिटलच्या आयपीओचे शेअर्स मिळाले की नाही? कसं चेक कराल स्टेटस, जीएमपीची स्थिती काय? जाणून घ्या
9
"बस्तर बदलतंय... बंदूक, दारुगोळ्याचा धूर नाही तर वाहताहेत विकासाचे आणि विश्वासाचे वारे"
10
अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!
11
रोहित शर्माने विकत घेतली नवीन आलिशान Tesla Model Y कार, त्याची खासियत काय आणि किंमत किती?
12
श्रीमंतांच्या यादीत मोठी उलथापालथ! एअरटेलचे मित्तल यांची मोठी झेप, शिव नादरांची घसरण, पहिलं कोण?
13
Saif Ali Khan : "चाकू हल्ल्यात जेह झालेला जखमी..."; ८ महिन्यांनी सैफने सांगितलं 'त्या' रात्री नेमकं काय घडलं?
14
"अजित आगरकरसाठी शेवट खूप विचित्र असेल", रोहित शर्मा वादावर इंग्लंडच्या माजी खेळाडूचं विधान
15
“योगेश कदमांनी अधिकाराचा गैरवापर करत गुंडाला अभय दिले, राजीनामा द्यावा”; ठाकरे गटाची मागणी
16
“शेतकऱ्यांना भरीव मदतीची दानत नाही, तीन आठवड्यांचे अधिवेशन घ्यावे”; शरद पवार गटाची मागणी
17
या एका कारणामुळे 'कांतारा चॅप्टर १' बनला ब्लॉकबस्टर; ऋषभ शेट्टीने सांगितलं सिनेमाच्या यशामागचं सीक्रेट
18
इराण युद्ध अमेरिकाच नाही, तर 'या' देशानेही इस्रायलला दिला होता मोठा पाठिंबा!४ महिन्यांनंतर झाला खुलासा
19
संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!
20
भारत-तालिबान मैत्रीनं पाकिस्तानचं टेन्शन वाढणार; अफगाणिस्तान भारतासाठी इतकं महत्त्वाचं का?

कुरुंदवाड पालिकेत रंगतोय खुर्चीचा खेळ

By admin | Updated: July 18, 2014 00:51 IST

६३ वर्षांत ६८ नगराध्यक्ष : विकासापेक्षा खुर्चीचे राजकारण

गणपती कोळी - कुरुंदवाडयेथील पालिकेतील नेत्यांचे टोकाचे राजकारण, दल बदलू नगरसेवक, प्रत्येकवेळी त्रिशंकू परिस्थिती, आदी कारणांमुळे या पालिकेला गेल्या ६३ वर्षांत ६८ नगराध्यक्ष लाभले आहेत. ना. बा. गायकवाड, रावसाहेब पाटील, जयराम पाटील वगळता कोणत्याही नगराध्यक्षाला पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करता आलेला नाही. खुर्चीसाठी राजकारण या धोरणामुळे शहराचा म्हणावा तसा विकास झाला नाही.शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड हे निमशहर आहे. २५ हजार लोकवस्ती असलेली ‘क’ दर्जाची नगरपालिका आहे. मात्र, येथील राजकीय नेत्यांची महत्त्वाकांक्षा, ईर्षा आणि सत्तेसाठी वाट्टेल ते अशा भूमिकेमुळे पालिका ‘क’ दर्जाची असली, तरी राजकारण मात्र ‘अ’ दर्जाचेच राहिले आहे. येथील राजकारण अनेकवेळा जिल्हा नव्हे, तर मुंबईच्या नेत्यांचीही डोकेदुखी ठरली आहे.संस्थानकालीन असलेल्या शहरात १९५१ ला नगरपालिका अस्तित्वात आली. मात्र, नेत्यांचे टोकाचे व सोयीचे राजकारण, सत्तेसाठी दल बदलू नगरसेवक व पालिकेत त्रिशंकू परिस्थिती यामुळे पालिकेला ६३ वर्षांत ६८ नगराध्यक्ष लाभले आहेत. त्यापैकी २० वेळा प्रशासक व तहसीलदार यांना कार्यभार सांभाळावा लागला आहे. पहिले नगराध्यक्ष ना. बा. गायकवाड, रावसाहेब पाटील, जयराम पाटील वगळता कोणत्याही नगराध्यक्षांना पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करता आलेला नाही, तर शं. रा. शिंदे, बाबासाहेब देसाई, भा. चि. निटवे यांच्याव्यतिरिक्त इतर नगराध्यक्षांना फार काळ खुर्ची टिकविता आली नाही.शहरात रावसाहेब पाटील, रामचंद्र डांगे व जयराम पाटील हे तीन प्रमुख राजकीय गट असून, प्रत्येक गट आपआपल्या प्रभागात अस्तित्व राखून आहे. त्यामुळे पालिकेच्या बहुतेक निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती निर्माण होते. निवडणुकीनंतर नेत्यांबरोबर नगरसेवकही सोयीचे राजकारण करीत असल्याने पालिकेला वारंवार राजकीय भूकंप बसत असतो. शिवाय अलीकडच्या काळात सत्तेतील सर्वांना पदाची संधी यामुळे नगराध्यक्षपदाची यादी वाढतच आहे. परिणामी, अल्प कालावधी, वारंवार राजकीय सत्तांतर यामुळे शहराच्या विकासाला खीळ बसत आहे.अशी मिळाली संधी-ाालिकेच्या इतिहासात आ. कृ. माने, जयराम पाटील, कविता जोंग यांना दोनवेळा नगराध्यक्षपदाची संधी मिळाली. -जयराम पाटील १९८५ ते १९९१ व २००१ ते २००६ असे दोनवेळा एकूण ११ वर्षे नगराध्यक्ष पदावर राहणारे एकमेव नगराध्यक्ष ठरले आहेत.