शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
3
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
4
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
5
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
6
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
8
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
9
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
10
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
11
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
12
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!
13
निर्दयी बाप! गावातील तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय; पोटच्या मुलीला दिली भयंकर शिक्षा
14
आसिम मुनीरची आणखी एक चाल, गाझा प्लॅनवर घेतली पलटी; पाकिस्तानची अमेरिकेला मोठी 'ऑफर'
15
वाहनधारकांसाठी आनंदाची बातमी! FASTag नसला तरी दंडापासून सवलत, UPI द्वारे भरावा लागणार फक्त एवढा दंड
16
Video: बाळासाहेब ठाकरे यांच्या 'हाताचे मोल्ड' कुठे होते?; अनिल परबांचा मोठा खुलासा, फोटोच दाखवला
17
१२ वर्षांनी हंस महापुरुष-रुचक योग: ७ राशींचे मंगलच होणार, सुबत्ता-कल्याण; पद-पैसा-प्रतिष्ठा!
18
टूर ठरली शेवटची! नागपूरचे हॉटेल व्यावसायिक आणि त्यांच्या पत्नीचा इटलीतील अपघातात मृत्यू
19
Lenskart च्या IPO ला सेबीची मंजुरी; केव्हा होणार लिस्टिंग, पाहा संपूर्ण डिटेल्स
20
Rohit Pawar : "गुंडांना पाठीशी घालून, निरपराधांना गुन्ह्यात गोवून..."; रोहित पवारांचा चंद्रकांत पाटलांना खोचक सवाल

केंद्र सरकारने वटहुकूम काढून ताबडतोब घटनादुरुस्ती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:18 IST

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आता केंद्र सरकारने वटहुकूम काढून ताबडतोब १०२ वी घटनादुरुस्ती करावी. मराठा समाज हा ...

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आता केंद्र सरकारने वटहुकूम काढून ताबडतोब १०२ वी घटनादुरुस्ती करावी. मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचेदेखील सरकारला सिद्ध करावे लागेल, असे खासदार संभाजीराजे यांनी गुरुवारी सांगितले.

मराठा आरक्षणाबाबतची केंद्र सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केली. त्याबाबत खासदार संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आरक्षणासाठी आता पहिला मार्ग म्हणजे राज्याचे अधिकार अबाधित असल्याचे सिद्ध करण्यासाठी केंद्र सरकारला वटहुकूम काढावा लागेल. त्याद्वारे १०२ वी घटनादुरुस्ती करावी लागणार आहे. त्याबरोबरच समांतरपणे मराठा समाजाला सामाजिक मागासपण हे सिद्ध करावे लागेल, हा दुसरा मार्ग. ३३८ ‘ब’च्या माध्यमातून मागासवर्गीय आयोग तयार करावा लागणार आहे. त्याच्या माध्यमातून राज्यपाल, त्यानंतर केंद्रीय मागासवर्गीय आयोग, राज्य मागासवर्गीय आयोग, राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मग संसदेत प्रस्ताव जाणे आवश्यक आहे. मराठा समाजावर अन्याय करून चालणार नाही. मागील राहिलेल्या उणिवा दुरुस्त करून कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण कसे देता येईल, यावर विचारविनिमय करून त्वरित मार्ग काढण्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची आहे. ही जबाबदारी त्यांना पार पाडावीच लागणार असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.