शहरं
Join us  
Trending Stories
1
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
2
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
3
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
4
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
5
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
6
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
7
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिला सर्वोच्च सन्मान
8
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
9
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
10
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
11
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
12
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
13
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
14
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
15
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
16
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
17
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
18
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
19
मोठी बातमी! भारत-ओमानमध्ये मुक्त व्यापार करार; देशातील 'या' उद्योगांना थेट फायदा
20
हरियाणामधील भाजपा सरकार संकटात, काँग्रेसने आणला अविश्वास प्रस्ताव, उद्या होणार चर्चा, असं आहे बहुमताचं गणित
Daily Top 2Weekly Top 5

केंद्र सरकारने वटहुकूम काढून ताबडतोब घटनादुरुस्ती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:18 IST

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आता केंद्र सरकारने वटहुकूम काढून ताबडतोब १०२ वी घटनादुरुस्ती करावी. मराठा समाज हा ...

कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आता केंद्र सरकारने वटहुकूम काढून ताबडतोब १०२ वी घटनादुरुस्ती करावी. मराठा समाज हा सामाजिकदृष्ट्या मागास असल्याचेदेखील सरकारला सिद्ध करावे लागेल, असे खासदार संभाजीराजे यांनी गुरुवारी सांगितले.

मराठा आरक्षणाबाबतची केंद्र सरकारची फेरविचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने अमान्य केली. त्याबाबत खासदार संभाजीराजे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. आरक्षणासाठी आता पहिला मार्ग म्हणजे राज्याचे अधिकार अबाधित असल्याचे सिद्ध करण्यासाठी केंद्र सरकारला वटहुकूम काढावा लागेल. त्याद्वारे १०२ वी घटनादुरुस्ती करावी लागणार आहे. त्याबरोबरच समांतरपणे मराठा समाजाला सामाजिक मागासपण हे सिद्ध करावे लागेल, हा दुसरा मार्ग. ३३८ ‘ब’च्या माध्यमातून मागासवर्गीय आयोग तयार करावा लागणार आहे. त्याच्या माध्यमातून राज्यपाल, त्यानंतर केंद्रीय मागासवर्गीय आयोग, राज्य मागासवर्गीय आयोग, राष्ट्रपती, पंतप्रधान आणि मग संसदेत प्रस्ताव जाणे आवश्यक आहे. मराठा समाजावर अन्याय करून चालणार नाही. मागील राहिलेल्या उणिवा दुरुस्त करून कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण कसे देता येईल, यावर विचारविनिमय करून त्वरित मार्ग काढण्याची सर्वस्वी जबाबदारी राज्य आणि केंद्र सरकारची आहे. ही जबाबदारी त्यांना पार पाडावीच लागणार असल्याचे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले.