शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

सेवा संस्थांतील दप्तर पध्दत होणार बंद, संगणकीकरण प्रकल्पास मान्यता

By समीर देशपांडे | Updated: July 14, 2022 18:56 IST

आर्थिक गैरव्यवहाराला पाठबळ देणारी पारंपरिक दप्तर पध्दत लवकरच बंद होणार

समीर देशपांडेकोल्हापूर : राज्यभरातील विकास संस्थाच्या संगणकीकरणासाठी केंद्र शासनाने २९ जून २०२२ रोजी मान्यता दिली आहे. त्यामुळे आता यासाठी राज्य आणि जिल्हा पातळीवर समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहाराला पाठबळ देणारी पारंपरिक दप्तर पध्दत लवकरच बंद होणार आहे.

शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करण्यासाठी राज्य बॅंक, जिल्हा बॅंक आणि गावपातळीवर विकास सेवा संस्था अशी त्रिस्तरीय रचना गेली अनेक वर्षे कार्यरत आहे. राज्यातील अनेक संस्थांना १०० वर्षे पूर्ण झाली आहेत. गावातील राजकारणावर पकड ठेवण्यासाठी, जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीमध्येही या संस्थाप्रमुखांची भूमिका महत्त्वाची असते. त्यामुळेच अनेकदा अशा संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरकारभार झाल्याचीही उदाहरणे आहेत. मोठी उलाढाल असलेल्या संस्थांमध्ये तर कोटी कोटींचा भ्रष्टाचार झाल्याच्या तक्रारी आहेत.राज्य पातळीवरील समितीअप्पर मुख्य सचिव, सहकार.. अध्यक्षप्रधान सचिव, वित्त.. सदस्यमुख्य महाप्रबंधक, नाबार्ड, पुणे सदस्यतीन जिल्हा बॅंकांचे मुख्य कार्यकारी अधिकारी.. सदस्यकार्यकारी संचालक, राज्य सह. बॅंक. सदस्य सचिव

जिल्हास्तरावरील समिती, मुंबई व मुंबई उपनगरे वगळूनजिल्हाधिकारी.. अध्यक्षजिल्हा विकास व्यवस्थापक, नाबार्ड.. सदस्यजिल्हा बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी.. सदस्यनिवडक विकास संस्थांचे प्रतिनिधी.. सदस्यजिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था.. सदस्य सचिवराज्यातील जिल्हा बँका ३१राज्यातील विकास सेवा संस्था.. २० हजार ९८६

सर्वच जिल्हा बँकांचे कामकाज आता संगणकीकृत झाले आहे. अशावेळी विकास संस्था मात्र तालुका पातळीवर माहिती पाठवताना पारंपरिक पध्दतीनेच देत आहेत. अशा परिस्थितीमध्ये विकास संस्थांचेही कामकाज संगणकावर येणार असल्याने कामकाज गतिमान होईल. - आमदार हसन मुश्रीफ - अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक

टॅग्स :kolhapurकोल्हापूर