शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

केंद्राकडून डोंगराळ विकास निधी मिळावा : सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 21:39 IST

कोल्हापूर : राज्यातील डोंगराळ भागाचा विकास करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जात होता; पण केंद्राकडून तो बंद झाल्याने डोंगरी भागाचा विकास थांबल्याचे निदर्शनास आणून देत हा निधी पूर्ववत सुरू करण्याची मागणी आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत केली.

ठळक मुद्देबारा जिल्'ांतील ६३ तालुक्यांचे नुकसान होणार सन १९९१-९२ पासून डोंगरी विभाग विकास कार्यक्रम राबविण्यात येत

कोल्हापूर : राज्यातील डोंगराळ भागाचा विकास करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जात होता; पण केंद्राकडून तो बंद झाल्याने डोंगरी भागाचा विकास थांबल्याचे निदर्शनास आणून देत हा निधी पूर्ववत सुरू करण्याची मागणी आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत केली.

पश्चिम घाट विकास योजनेतून डोंगराळ भागाच्या विकासासाठी राज्य सरकारकडून १० टक्के तर केंद्राकडून ९० टक्के निधी दिला जात होता; पण केंद्र सरकारच्या निती आयोगाने हा निधी पूर्णपणे बंद केल्याने योजना ठप्प झाली आहे. त्यामुळे बारा जिल्'ांतील ६३ तालुक्यांचे नुकसान होणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

यावर केंद्राने सन १९७४-७५ पासून पश्चिम घाट विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला; पण केंद्राने सन २०१५-१६ पासून योजना बंद केली. त्यासाठी राज्य सरकारने पर्यायी योजना केलेली नाही. त्याचबरोबर राज्यात यापूर्वी सन १९९१-९२ पासून डोंगरी विभाग विकास कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.‘सहवीज’चा वीज दर पूर्ववत करा : चंद्रदीप नरकेकोल्हापूर : साखर कारखान्यांनी सहवीज प्रकल्पातून तयार केलेल्या विजेचा दर पूर्ववत म्हणजेच प्रतियुनिट ६ रुपये ६५ पैसे करावा, अशी मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी विधानसभेत केली. उसाच्या चिपाडापासून सह वीजनिर्मिती प्रकल्पातून तयार होणारी वीज ‘महावितरण’ला विकण्याची परवानगी आहे. सन २०१६-१७ आर्थिक वर्षापासून ‘महावितरण’कडून प्रतियुनिट ६ रुपये ६५ पैसे दर मिळत होता. राज्य विद्युत नियामक मंडळाच्या २८ एप्रिल २०१७ च्या परिपत्रकानुसार सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी ‘महावितरण’कडून प्रतियुनिट ६ रुपये ३६ पैसे दर मिळणार आहे. या निर्णयामुळे प्रत्येक कारखान्याला सुमारे एक ते दीड कोटी रुपये तोटा सहन करावा लागणार आहे.

या तोट्यामुळे प्रकल्पांचा परतावा कालावधी वाढणार आहे. त्याचा थेट परिणाम ऊस दरावर होणार असल्याने या आर्थिक वर्षात पूर्वीप्रमाणेच वीज दर द्यावा, अशी मागणी नरके यांनी केली. पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. त्याचबरोबर शेतीपंपांची वीज कनेक्शन प्रलंबित असून जोडणीसाठी तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. त्यावर कोल्हापूर जिल्'ात ६ हजार ८९४ शेती पंप पैसे भरून वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. प्रलंबित कामे प्रगतिपथावर असल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.