शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
4
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
5
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
6
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
7
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
8
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
9
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
10
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
11
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
12
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
13
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
14
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
15
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
16
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
17
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
18
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
19
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
20
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास

केंद्राकडून डोंगराळ विकास निधी मिळावा : सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 21:39 IST

कोल्हापूर : राज्यातील डोंगराळ भागाचा विकास करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जात होता; पण केंद्राकडून तो बंद झाल्याने डोंगरी भागाचा विकास थांबल्याचे निदर्शनास आणून देत हा निधी पूर्ववत सुरू करण्याची मागणी आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत केली.

ठळक मुद्देबारा जिल्'ांतील ६३ तालुक्यांचे नुकसान होणार सन १९९१-९२ पासून डोंगरी विभाग विकास कार्यक्रम राबविण्यात येत

कोल्हापूर : राज्यातील डोंगराळ भागाचा विकास करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जात होता; पण केंद्राकडून तो बंद झाल्याने डोंगरी भागाचा विकास थांबल्याचे निदर्शनास आणून देत हा निधी पूर्ववत सुरू करण्याची मागणी आमदार सतेज पाटील यांनी विधान परिषदेत केली.

पश्चिम घाट विकास योजनेतून डोंगराळ भागाच्या विकासासाठी राज्य सरकारकडून १० टक्के तर केंद्राकडून ९० टक्के निधी दिला जात होता; पण केंद्र सरकारच्या निती आयोगाने हा निधी पूर्णपणे बंद केल्याने योजना ठप्प झाली आहे. त्यामुळे बारा जिल्'ांतील ६३ तालुक्यांचे नुकसान होणार असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.

यावर केंद्राने सन १९७४-७५ पासून पश्चिम घाट विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला; पण केंद्राने सन २०१५-१६ पासून योजना बंद केली. त्यासाठी राज्य सरकारने पर्यायी योजना केलेली नाही. त्याचबरोबर राज्यात यापूर्वी सन १९९१-९२ पासून डोंगरी विभाग विकास कार्यक्रम राबविण्यात येत असल्याचे वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.‘सहवीज’चा वीज दर पूर्ववत करा : चंद्रदीप नरकेकोल्हापूर : साखर कारखान्यांनी सहवीज प्रकल्पातून तयार केलेल्या विजेचा दर पूर्ववत म्हणजेच प्रतियुनिट ६ रुपये ६५ पैसे करावा, अशी मागणी आमदार चंद्रदीप नरके यांनी विधानसभेत केली. उसाच्या चिपाडापासून सह वीजनिर्मिती प्रकल्पातून तयार होणारी वीज ‘महावितरण’ला विकण्याची परवानगी आहे. सन २०१६-१७ आर्थिक वर्षापासून ‘महावितरण’कडून प्रतियुनिट ६ रुपये ६५ पैसे दर मिळत होता. राज्य विद्युत नियामक मंडळाच्या २८ एप्रिल २०१७ च्या परिपत्रकानुसार सन २०१७-१८ या आर्थिक वर्षासाठी ‘महावितरण’कडून प्रतियुनिट ६ रुपये ३६ पैसे दर मिळणार आहे. या निर्णयामुळे प्रत्येक कारखान्याला सुमारे एक ते दीड कोटी रुपये तोटा सहन करावा लागणार आहे.

या तोट्यामुळे प्रकल्पांचा परतावा कालावधी वाढणार आहे. त्याचा थेट परिणाम ऊस दरावर होणार असल्याने या आर्थिक वर्षात पूर्वीप्रमाणेच वीज दर द्यावा, अशी मागणी नरके यांनी केली. पायाभूत सुविधांसाठी निधी उपलब्ध करून द्यावा. त्याचबरोबर शेतीपंपांची वीज कनेक्शन प्रलंबित असून जोडणीसाठी तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही त्यांनी केली. त्यावर कोल्हापूर जिल्'ात ६ हजार ८९४ शेती पंप पैसे भरून वीज जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. प्रलंबित कामे प्रगतिपथावर असल्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.