शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

हवाई वाहतुकीच्या विस्तारासाठी केंद्र, राज्यांचा समन्वय हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 00:16 IST

बेळगाव : भारतात हवाई वाहतुकीची वाढ झपाट्याने होत असून, परदेशातील अनेक कंपन्या भारतात व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असून, त्यांच्याशी बोलणी सुरू आहे.

ठळक मुद्दे अशोक गजपती राजू : बेळगाव येथे सांबरा विमानतळाचे उद्घाटनभाजप आमदारांचा होर्डिंगवरील फोटो फाडला म्हणून काही भाजप कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कबेळगाव : भारतात हवाई वाहतुकीची वाढ झपाट्याने होत असून, परदेशातील अनेक कंपन्या भारतात व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असून, त्यांच्याशी बोलणी सुरू आहे. हवाई वाहतुकीची वाढ करायची असेल तर राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी समन्वयाने काम केले पाहिजे, असे उद्गार केंद्रीय नागरी विमानोड्डाण खात्याचे मंत्री पी. अशोक गजपती राजू यांनी आधुनिकीकरण केलेल्या सांबरा विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी काढले.सध्या जगात सगळ्यात मोठी एअरलाईन कंपनी म्हणजे सामानाची वाहतूक करणारी कार्गो एअरलाईन आहे. कार्गोमुळे आर्थिक स्तरामध्ये सुधारणा होते. सध्या कर्नाटकात हवाई वाहतूक व्यवस्थेसाठी केंद्र सरकारने ६२७ कोटी रु. मंजूर केले असून, त्याद्वारे राज्यातील विमानतळाच्या आधुनिकीकरणाचे कार्य सुरू असल्याचेही पी. अशोक गजपती राजू यांनी आपल्या भाषणात सांगितले.

यावेळी केंद्रीय रासायनिक खत आणि संसदीय खात्याचे मंत्री अनंतकुमार, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या, कर्नाटकचे उद्योगमंत्री आर. व्ही. देशपांडे, इंधनखात्याचे मंत्री डी. के. शिवकुमार, पालकमंत्री रमेश जारकीहोळी, खासदार सुरेश अंगडी, राज्यसभा सदस्य डॉ . प्रभाकर कोरे, महापौर संज्योत बांदेकर, आमदार संजय पाटील, भारतीय विमानपतन प्राधिकरणाचे अधिकारी रहेजा, आदी उपस्थिती होती. विमानतळासाठी संपादित जमिनींचा मोबदला काही शेतकºयांना मिळाला नसल्यामुळे शेतकºयांनी उद्घाटनप्रसंगी आंदोलन छेडण्याचे ठरविले होते; पण पोलिसांनी त्यांना विमानतळाच्या गेटवरच रोखले. भाजप आमदारांचा होर्डिंगवरील फोटो फाडला म्हणून काही भाजप कार्यकर्त्यांनी हुल्लडबाजी केली. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन नंतर सोडून दिले.सांबरा विमानतळाच्या नूतनीकरणासाठी १४२ कोटी इतका खर्च आला आहे.विमानतळास राणी चन्नमाचे नाव द्याविमानतळास कित्तूर राणी चन्नमाचे नाव द्या, अशी मागणी बेळगावचे खासदार सुरेश अंगडी यांनी यावेळी केली. त्यांची केंद्रीयमंत्री अनंतकुमार यांच्यासह सर्व भाजप लोकप्रतिनिधींनी समर्थन केले. बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी संगोल्ली रायन यांचे नाव बेळगाव रेल्वेस्थानकास द्या, अशी मागणी केली. सध्या बेळगावहून मुंबई-बंगलोर ही विमानसेवा स्पाईस जेटकडून सुरू असून, हीच सेवा चेन्नईपर्यंत वाढविली जाईल, असे स्पाईस जेटने कळविले असून, केंद्रीय एटीसीकडून जेट ऐअरवेज आणि एअर इंडिगो या कंपन्यांनी स्लॉट मागितला आहे, अशी माहिती गजपती राजू यांनी दिली आहे.