शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
SMAT Final 2025 : पुण्याच्या मैदानात ईशान किशनचा शानदार शो! BCCI निवडकर्त्यांसोर षटकार चौकारांचा पाऊस
4
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
5
भारताकडे BRICS चे अध्यक्षपद; जागतिक भू-राजकीय तणावात महत्वाची भूमिका बजावणार
6
३१ डिसेंबरसाठी गोव्यात जाताय? कोकण रेल्वेवर विशेष सेवा; पाहा, वेळा, थांबे अन् वेळापत्रक
7
जबरदस्त फिचर्ससह OnePlus 15R भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स!
8
रुपया ९१ च्या पार! स्वयंपाकघर ते परदेशी शिक्षणासह 'या' गोष्टी महाग होणार; 'हे' कधी थांबणार?
9
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
10
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
11
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
12
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
13
Video - लेकीच्या जन्मानंतर बाबांचा आनंद गगनात मावेना; ‘धुरंधर’ स्टाईलमध्ये केला भन्नाट डान्स
14
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
15
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
16
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
17
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
18
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
19
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
20
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
Daily Top 2Weekly Top 5

सेन्सॉर बोर्डाचे काम आता आॅनलाईन

By admin | Updated: October 9, 2015 01:12 IST

अरूण नलावडे : महाराष्ट्र शासन रंगभूमी परिनिरीक्षक मंडळाची सभा

रत्नागिरी : नाटक लिहिल्यानंतर रंगभूमी परिनिरीक्षक मंडळाकडे तपासणी व मान्यतेसाठी पाठवले जाते. परिनिरीक्षणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करुन लेखकाचा येण्या-जाण्याचा खर्च वाचावा व कोणाचीही अडवणूक होऊ नये याकरिता लवकरच महाराष्ट्र शासन रंगभूमी परिनिरीक्षक मंडळाचे कामकाज आता आॅनलाईन सुरु करण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष अरुण नलावडे यांनी सांगितले.महाराष्ट्र शासन रंगभूमी परिनिरीक्षक मंडळाची मासिक सभा बुधवारी रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली होती. सभेनंतर जिल्ह्यातील रंगकर्मी, नाट्यसंस्था, लेखक, दिग्दर्शक, माध्यमांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी नलावडे बोलत होते. यावेळी भद्रकाली प्रॉडक्शन व ‘समुद्र’चे निर्माता प्रसाद कांबळी, ज्येष्ठ रंगकर्मी व लेखक, दिग्दर्शक अशोक समेळ उपस्थित होते.परिनिरीक्षक मंडळाकडे नाटकाची संहिता पाठवल्यानंतर ती दोन सदस्यांकडे वाचण्यासाठी दिली जाते. त्यानंतर मंडळाच्या बैठकीमध्ये सदस्य संहितेबद्दलचे आक्षेप नोंदवतात. त्यानंतर त्यावर चर्चा केली जाते. नंतर लेखकाला याबद्दल कळवले जाते. शिवाय संहितेबद्दल लेखकाला काही सांगायचे असेल तर त्यासाठी बोलावलेदेखील जाते. एकूणच खेळीमेळीच्या वातावरणात व चर्चेतून मार्ग काढला जातो अशी मंडळाच्या कामाची पद्धत नलावडे यांनी स्पष्ट केली. नवनवीन नाटके यावीत यासाठी मंडळ प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.नाटकाची संहिता परिनिरीक्षणासाठी पाठवल्यानंतर सहा महिने का लागतात? यावर नलावडे यांनी सांगितले की, मंडळ कोणाचीही अडवणूक होऊ नये यासाठी प्रयत्नशील आहे. नाटक लिहिल्यानंतर लेखकाने तातडीने सेन्सॉर करुन घेणे गरजेचे आहे. त्यानंतरच ते प्रयोगासाठी पाठवावे. एकांकिका किंवा नाट्य महोत्सवासाठी तातडीने संहिता द्यायची असेल तर तसे कळवावे. महिन्याभरात ते सेन्सॉर करुन पाठवले जाईल, असे सांगितले. जुने नाटक सादर करणाऱ्या संस्थेला नाटक सादर करण्यासाठी सेन्सॉरची परवानगी घ्यावीच लागेल.प्रत्यक्ष संहितेमध्ये लेखक वेगळे लिहितो. परंतु, कलाकारांकडून काही वेळा आक्षेपार्ह सादर केले जाते. काहीवेळा अश्लिल संवादही होत असतात. त्यावेळी लेखकाने किंवा निर्मात्याने नाटक सादर करत असतानाच नियम घालणे गरजेचे आहे. जेणेकरुन पाच ते १२ वर्षाखालील मुलांना नाटकाला प्रवेश नाकारले जाऊ नये. सेन्सॉर बोर्ड लेखकावर बंधन टाकू शकते कलाकारावर नाही.संगीत नाटकांसाठी साडेतीन तासांपेक्षा कमी कालावधी करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचलनालय नियम घालू पाहत आहे. यासाठी मंडळाला संस्थांनी पत्र पाठवून विनंती करावी. परंतु, जर नियम स्पर्धेसाठी लागू केला असेल तर कमी वेळेत नाटक सादरीकरण हे दिग्दर्शकाचे कौशल्य असेल असे विवेक आपटे म्हणाले. स्पर्धांसाठी येणाऱ्या संहिता मंडळाकडे येण्याचा ओघ वाढला आहे. अधिकाधिक लोकांकडे वाचायला देऊन प्रमाणपत्र देण्यासाठी सेन्सॉर बोर्ड प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यावेळी अ‍ॅड. संजय देशपांडे, माधव टिकेकर, दाक्षायणी बोपर्डीकर व अन्य सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)रत्नागिरीत प्रथमच झाली परिनिरीक्षक मंडळाची बैठक.नाट्यलेखकांचा येण्या - जाण्याचा खर्च वाचणार.नवनवीन नाटके येण्यासाठी मंडळ प्रयत्नशील.जुने नाटक सादरीकरणासाठी सेन्सॉरची परवानगी आवश्यक.स्पर्धांसाठी येणाऱ्या संहितांचा ओघ वाढला.