शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
3
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
4
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
5
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
6
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
7
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
8
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
9
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
10
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
11
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
12
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
13
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
14
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
15
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
16
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
17
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
18
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
19
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
20
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."

सेन्सॉर बोर्डाचे काम आता आॅनलाईन

By admin | Updated: October 9, 2015 01:12 IST

अरूण नलावडे : महाराष्ट्र शासन रंगभूमी परिनिरीक्षक मंडळाची सभा

रत्नागिरी : नाटक लिहिल्यानंतर रंगभूमी परिनिरीक्षक मंडळाकडे तपासणी व मान्यतेसाठी पाठवले जाते. परिनिरीक्षणाचे काम लवकरात लवकर पूर्ण करुन लेखकाचा येण्या-जाण्याचा खर्च वाचावा व कोणाचीही अडवणूक होऊ नये याकरिता लवकरच महाराष्ट्र शासन रंगभूमी परिनिरीक्षक मंडळाचे कामकाज आता आॅनलाईन सुरु करण्यात येणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष अरुण नलावडे यांनी सांगितले.महाराष्ट्र शासन रंगभूमी परिनिरीक्षक मंडळाची मासिक सभा बुधवारी रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आली होती. सभेनंतर जिल्ह्यातील रंगकर्मी, नाट्यसंस्था, लेखक, दिग्दर्शक, माध्यमांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी नलावडे बोलत होते. यावेळी भद्रकाली प्रॉडक्शन व ‘समुद्र’चे निर्माता प्रसाद कांबळी, ज्येष्ठ रंगकर्मी व लेखक, दिग्दर्शक अशोक समेळ उपस्थित होते.परिनिरीक्षक मंडळाकडे नाटकाची संहिता पाठवल्यानंतर ती दोन सदस्यांकडे वाचण्यासाठी दिली जाते. त्यानंतर मंडळाच्या बैठकीमध्ये सदस्य संहितेबद्दलचे आक्षेप नोंदवतात. त्यानंतर त्यावर चर्चा केली जाते. नंतर लेखकाला याबद्दल कळवले जाते. शिवाय संहितेबद्दल लेखकाला काही सांगायचे असेल तर त्यासाठी बोलावलेदेखील जाते. एकूणच खेळीमेळीच्या वातावरणात व चर्चेतून मार्ग काढला जातो अशी मंडळाच्या कामाची पद्धत नलावडे यांनी स्पष्ट केली. नवनवीन नाटके यावीत यासाठी मंडळ प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.नाटकाची संहिता परिनिरीक्षणासाठी पाठवल्यानंतर सहा महिने का लागतात? यावर नलावडे यांनी सांगितले की, मंडळ कोणाचीही अडवणूक होऊ नये यासाठी प्रयत्नशील आहे. नाटक लिहिल्यानंतर लेखकाने तातडीने सेन्सॉर करुन घेणे गरजेचे आहे. त्यानंतरच ते प्रयोगासाठी पाठवावे. एकांकिका किंवा नाट्य महोत्सवासाठी तातडीने संहिता द्यायची असेल तर तसे कळवावे. महिन्याभरात ते सेन्सॉर करुन पाठवले जाईल, असे सांगितले. जुने नाटक सादर करणाऱ्या संस्थेला नाटक सादर करण्यासाठी सेन्सॉरची परवानगी घ्यावीच लागेल.प्रत्यक्ष संहितेमध्ये लेखक वेगळे लिहितो. परंतु, कलाकारांकडून काही वेळा आक्षेपार्ह सादर केले जाते. काहीवेळा अश्लिल संवादही होत असतात. त्यावेळी लेखकाने किंवा निर्मात्याने नाटक सादर करत असतानाच नियम घालणे गरजेचे आहे. जेणेकरुन पाच ते १२ वर्षाखालील मुलांना नाटकाला प्रवेश नाकारले जाऊ नये. सेन्सॉर बोर्ड लेखकावर बंधन टाकू शकते कलाकारावर नाही.संगीत नाटकांसाठी साडेतीन तासांपेक्षा कमी कालावधी करण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचलनालय नियम घालू पाहत आहे. यासाठी मंडळाला संस्थांनी पत्र पाठवून विनंती करावी. परंतु, जर नियम स्पर्धेसाठी लागू केला असेल तर कमी वेळेत नाटक सादरीकरण हे दिग्दर्शकाचे कौशल्य असेल असे विवेक आपटे म्हणाले. स्पर्धांसाठी येणाऱ्या संहिता मंडळाकडे येण्याचा ओघ वाढला आहे. अधिकाधिक लोकांकडे वाचायला देऊन प्रमाणपत्र देण्यासाठी सेन्सॉर बोर्ड प्रयत्नशील असल्याचे सांगितले. यावेळी अ‍ॅड. संजय देशपांडे, माधव टिकेकर, दाक्षायणी बोपर्डीकर व अन्य सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)रत्नागिरीत प्रथमच झाली परिनिरीक्षक मंडळाची बैठक.नाट्यलेखकांचा येण्या - जाण्याचा खर्च वाचणार.नवनवीन नाटके येण्यासाठी मंडळ प्रयत्नशील.जुने नाटक सादरीकरणासाठी सेन्सॉरची परवानगी आवश्यक.स्पर्धांसाठी येणाऱ्या संहितांचा ओघ वाढला.