शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
7
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
8
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
9
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
10
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
11
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
12
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
13
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
14
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
15
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
16
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
17
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
18
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
19
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
20
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
Daily Top 2Weekly Top 5

आदिनाथांच्या बृहन्मूर्तीचा महामस्तकाभिषेक लक्ष्मीसेन जैन मठातील सोहळा : क्षेत्रपाल ब्रह्मदेव मूर्तीची झाली प्रतिष्ठापना

By admin | Updated: May 19, 2014 00:42 IST

कोल्हापूर : शुक्रवार पेठ येथील स्वस्तिश्री महास्वामी लक्ष्मीसेन जैन मठामध्ये १९६२ मध्ये प्रतिष्ठापित झालेल्या जैन धर्मियांच्या तीर्थंकर

 कोल्हापूर : शुक्रवार पेठ येथील स्वस्तिश्री महास्वामी लक्ष्मीसेन जैन मठामध्ये १९६२ मध्ये प्रतिष्ठापित झालेल्या जैन धर्मियांच्या तीर्थंकर मालिकेतील प्रथम तीर्थंकर भगवान आदिनाथ तीर्थंकरांच्या २८ फूट उंच अमृतशीलेतील नयनमनोहर, बृहन्मूर्तीचा ५३ वा महामस्तकाभिषेक महोत्सव अत्यंत मांगल्यपूर्ण विधिवत मोठ्या श्रद्धेने-भक्तिभावनेने आज, रविवारी संपन्न झाला. या महोत्सवाचे अधिनेतृत्व स्वस्तिश्री लक्ष्मीसेन महास्वामीजी यांनी केले. याच महोत्सवासाठी जिनकंची धर्मपीठाचे (तमिळनाडू) परमपूज्य लक्ष्मीसेन महाराज आणि साध्वी आर्यिका सुधर्ममती माताजी यांची पावन उपस्थिती लाभली. सकाळी सहा वाजता जैन मठामध्ये मंगलवाद्य घोषणांनी महोत्सवास आरंभ झाला. सात वाजता ध्वजारोहण झाल्यानंतर भ. चंद्रप्रभ व भ. पार्श्वनाथांचा पंचामृताभिषेक झाला. महाशांतीमंत्र पठणानंतर मठस्थित नवीन मंदिरामध्ये क्षेत्रपाल ब्रह्मदेव मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. तसेच ९६ बीजाक्षरांतून क्षेत्रपाल विधान धर्मकार्य संपन्न झाले. या मूर्तीप्रतिष्ठा रायबाग निवासी पद्मश्री व अनंतनाथ शांतीनाथ शेट्टी यांनी केली. याचे प्रतिष्ठाचार्य अजित उपाध्ये (कोथळी), तर सहप्रतिष्ठाचार्य जिनदत्त उपाध्ये (शिरटी) यांनी केले. सायंकाळी पाच वाजता भ. १००८ श्री आदिनाथ तीर्थंकर पंचामृत मस्तकाभिषेक संपन्न झाला. सुरुवातीस भगवान आदिनाथ सुवर्णकलश ११ श्रावकांनी ढाळले. त्यानंतर १०८ कलश ढाळण्यात आल्यानंतर पंचामृत अभिषेकास आरंभ झाला. यामध्ये भगवंतांच्या चरणाजवळून पूजा साहित्याची पाद्यपूजा करण्यात आली. खोबर्‍याचा खिस, हरभरा डाळ, साखर, गूळ-तूप, दही व आमरसांनी भगवंतांची पाद्यपूजा विधिवत झाली. यावेळी महापौर सुनीता राऊत, आमदार राजेश क्षीरसागर, शरद इन्स्टिट्यूटचे अनिल बामणे, अजित आजरी, संजय गोपालकर, आदी तसेच शहरातील सर्वच मंदिराचे विश्वस्त तसेच श्रावक-श्राविका उपस्थित होते. त्यानंतर भगवंतांचा महामस्तकाभिषेक धर्ममंत्रोचारांत संगीत-वाद्यांच्या मंगलसुरांत सुवाद्य संपन्न झाला. यामध्ये दुग्धाभिषेक, इक्षु (उसाचा रस), अभिषेक, कलकचूर्ण, कुंकुमाभिषेक, हळद अभिषेक, अष्टगंध, पुष्पवृष्टी झाली. नंतर महाशांतीकलश ढाळून संगीत मंगल आरती झाल्यानंतर महाशांतीकलश ढाळून संगीत मंगल आरती होऊन सांगता झाली. या महोत्सवासाठी प. पू. लक्ष्मीसेन महास्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली धन्यकुमार जैन, पद्माकर कापसे, राजू उपाध्ये, अभय भिवटे, वसंत आडके, अजित सांगावे, आदींनी संयोजन केले, तर पद्माकर उपाध्ये, सुरेश उपाध्ये, प्रशांत उपाध्ये, प्रमोद उपाध्ये, शशिकांत उपाध्ये, आदी शहरातील पंडितांनी कार्य केले. (प्रतिनिधी)