शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

जातीचे राजकारण रंग दाखवणार

By admin | Updated: October 2, 2014 00:18 IST

नाराजांकडे लक्ष : काँग्रेस, राष्ट्रवादीसमोर शिवसेना, स्वाभिमानीचे आव्हान

संदीप बावचे-- शिरोळ--विधानसभा मतदारसंघासाठी चौरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले असले तरी कॉँग्रेस, राष्ट्रवादीसमोर शिवसेना व स्वाभिमानीचे कडवे आव्हान उभे राहिले आहे. बंडखोरी टाळण्यात राष्ट्रवादी व कॉँग्रेसला यश आले आहे. मात्र, या दोन्ही पक्षांतील नाराज गटाने शिवसेनेचे उमेदवार उल्हास पाटील यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याने पहिल्या टप्प्यातच विधानसभा निवडणुकीत रंगत आली आहे. येथे जातीचे राजकारण रंग दाखवणार, अशी चिन्हे आहेत. मतदारसंघात जैन, लिंगायत विरुद्ध मराठा अशा जातीच्या राजकारणाने या निवडणुकीत एकदम उसळी घेतली आहे..काँग्रेसचे आमदार सा. रे. पाटील, सेनेचे उल्हास पाटील, भाजप-स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सावकर मादनाईक आणि राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील-यड्रावकर हे रिंगणातील प्रमुख उमेदवार आहेत, तर राष्ट्रवादीचे धैर्यशील माने, विठ्ठलराव नाईक निंबाळकर, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल यादव व ‘गोकुळ’चे अध्यक्ष दिलीप पाटील या मातब्बरांनी माघार घेतली. त्यांनी माघार घेऊन मराठा समाजाचा उमेदवार म्हणून शिवसेनेच्या उल्हास पाटील यांना पाठिंबा दिला. महायुती व आघाडीत घटस्फोट झाल्यानंतर शिरोळ तालुक्यातीलही अनेक राजकीय संदर्भ बदलले. पक्षाकडून उमेदवारी कोणाला मिळणार, याबाबत उत्सुकता रंगली. कॉँग्रेसकडून विद्यमान आमदार सा. रे. पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कॉँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल यादव, ‘गोकुळ’चे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर राष्ट्रवादीकडून पक्षाचा अधिकृत उमेदवार कोण? यावरून राजेंद्र पाटील-यड्रावकर व जिल्हा परिषद सदस्य धैर्यशील माने यांच्यात चांगलीच चुरस निर्माण झाली. अखेर यड्रावकर यांनी राष्ट्रवादीची उमेदवारी घेऊन बाजी मारली. दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेपुढे म्हणजेच पर्यायाने खासदार राजू शेट्टी यांच्यापुढे उल्हास पाटील की सावकर मादनाईक या दोघांपैकी कोणाला उमेदवारी द्यायचा, हा पेचप्रसंग निर्माण झाला होता. या दोघांनीही जोरदार तयारी केली होती. मात्र, स्वाभिमानीने उमेदवारी डावलल्यामुळे उल्हास पाटील यांनी शिवसेनेची उमेदवारी घेतली. यामुळे स्वाभिमानी पक्षात चांगलाच राजकीय भूकंप झाला. पाच वर्षांपूर्वीच सावकर मादनाईक यांना २०१४ ची उमेदवारी देण्याचा पक्षातील कोअर समितीच्या बैठकीत निर्णय झाल्याचे खासदार शेट्टी यांनी सांगितले. प्रचार कार्यक्रमात शिवसेनेचे उमेदवार उल्हास पाटील यांनी आंदोलनाच्या माध्यमातून तालुक्यात चांगले काम केले असताना स्वाभिमानीने विश्वासघात केल्याचा आरोप त्यांनी केला. गेली दहा वर्षे आघाडी म्हणून शिरोळ तालुक्यात विद्यमान आमदार डॉ. सा. रे. पाटील व राष्ट्रवादीचे राजेंद्र पाटील-यड्रावकर या गुरू-शिष्याने एकत्रित काम केले आहे. मात्र, विधानसभेच्या या निवडणुकीत दोघेही आता एकमेकांविरुद्ध दोन हात करण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरले आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर स्वाभिमानीचे बळ वाढले, असे चित्र असताना महायुतीतील घटस्फोटामुळे शिवसेना स्वाभिमानीपासून वेगळी झाल्यामुळे मतविभागणी होणार का? शिवाय उल्हास पाटील यांच्या उमेदवारीमुळे स्वाभिमानीतील मतांचीही विभागणी होणार का? हा प्रश्न सध्या चर्चेत असला तरी मतविभागणीचा फायदा कोणाला मिळणार आणि शिरोळचा ‘गड’ कोण जिंकणार, याचीच उत्सुकता लागून राहिली आहे.