शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

श्रेयवादातून भडगावच्या स्मशानशेड कामाला ‘खो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2016 01:02 IST

अंत्यसंस्काराला जागाच नाही : रस्त्यावरच द्यावा लागतो अग्नी

मुरगूड : कागल तालुक्यातील भडगाव मध्ये ६० वर्षांपासून प्रलंबित असलेला स्मशानशेडचा प्रश्न आजही आहे त्या अवस्थेतच आहे. ग्रामपंचायतीने मिळालेल्या निधीतून स्मशानशेड बांधण्यास सुरुवात केली; पण जागेच्या वादातून हा प्रश्न न्यायालयात गेला आहे. कामास परवानगी मिळते तर कधी स्थगिती, त्यामुळे स्मशानशेडचा प्रश्न अधांतरी राहिला आहे. त्यामुळे सध्यातरी गावातील मृत लोकांवर रस्त्याकडेला किंवा शेतजमिनीत अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. मुरगूडपासून तीन किलोमीटर अंतरावर असणारे भडगाव हे प्रगतशील गाव आहे. राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक क्षेत्रांत गावाचा लौकिक आहे. अगदी राज्यपातळीपर्यंतची अधिवेशने, कबड्डी सामने या गावात अत्यंत उत्साहात पार पडले आहेत; परंतु, ‘गाव तसं चांगलं, पण वेशीला टांगलं’ अशीच काहीशी गावची अवस्था झाली आहे. काही दिवसांपूर्वी येथील एका भूमिहीन महिलेवर मुख्य रस्त्याच्या कडेला अंत्यसंस्कार करण्यात आले, तर विजेच्या धक्क्याने मृत झालेल्या दुर्दैवी बापलेकांवर त्यांच्या नातलगांच्या शेतात चिखलात सरन रचून ऐन पावसामध्ये अंत्यसंस्कार करावे लागले. याला स्मशानशेडच्या श्रेयवादाचे राजकारण कारणीभूत ठरत आहे. या घटनेची चर्चा गावासह मुरगूड परिसरात होत आहे.गावातीलच एका भूमिहीन महिलेचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. गावात स्मशानशेड नाही, स्वत:ची शेती किंवा रिकामी जागाही नाही, त्यामुळे नेमके कुठे अंत्यसंस्कार करायचे? असा प्रश्न निर्माण झाला. अखेर कागल-मुरगूड रस्त्यावरील रिकाम्या जागेत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय झाला. परंतु, त्या ठिकाणीही काही नागरिकांनी विरोध केला. अखेर मुख्य रस्त्याकडेलाच अंत्यसंस्कार करण्यात आले. कागल-मुरगूड रस्त्याकडेला सरन रचून अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्यांच्या नातेवाइकांवर आली. त्यालाही आमच्या शेतीसमोर नको,म्हणून विरोध होत असताना संतप्त नातेवाइकांकडून पोलिसांत तोंडी तक्रार देण्यात आली. अखेर ग्रामपंचायत सदस्य आणि प्रतिष्ठित मंडळींनी पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार पार पडले. या निमित्ताने पुन्हा एकदा स्मशानशेडचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून स्मशानशेडचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.येथील स्मशानशेडचे जागेअभावी काम रखडले होते. गतसाली सरपंच कल्पना पाटील व ग्रामपंचायतीने गावातील जाणकारांच्या मदतीने जागेचा प्रश्न मिटवला होता. त्यासाठी जिल्हा परिषद फंडातून निधी मंजूर होऊन बांधकामास प्रारंभही करण्यात आला होता. काम अंतिम टप्प्यात असतानाच पुन्हा जागेचा प्रश्न उफाळून आला आणि प्रकरण न्यायालयात गेले. पहिला निकाल ग्रामपंचायतीच्या बाजूने लागला आणि स्मशानशेडचे काम अंतिम टप्यात असतानाच न्यापालयाने स्थगिती दिली आहे. (वार्ताहर)जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवाज्याची स्वत:ची शेती, मोकळी जमीन आहे, त्यांच्या नातेवाइकाचा मृत्यू झाल्यास ते आपआपल्या शेतात अंत्यसंस्कार करतात. परंतु जे गरीब आहेत, भूमिहीन आहेत, ज्यांची काहीच जमीन नाही, त्यांनी कुठे जायचे? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सुजलाम् सुफलाम् असणाऱ्या गावात राजकारणातून व श्रेयवादातून स्मशानशेडच्या बांधकामाला ‘खो’ ंबसणे दुर्दैवी आहे. ऐन पावसाळ्यामध्ये उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. गावातील सर्व गटा-तटांच्या लोकांनी मोठ्या मनाने मानसिकता दाखवून हा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांसह परिसरातून होत आहे.