शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
“रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
3
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हण्याल्या...
4
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
5
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
6
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
7
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
8
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
9
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
10
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
11
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
12
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
13
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
14
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
15
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
16
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
17
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
18
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
19
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
20
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
Daily Top 2Weekly Top 5

श्रेयवादातून भडगावच्या स्मशानशेड कामाला ‘खो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2016 01:02 IST

अंत्यसंस्काराला जागाच नाही : रस्त्यावरच द्यावा लागतो अग्नी

मुरगूड : कागल तालुक्यातील भडगाव मध्ये ६० वर्षांपासून प्रलंबित असलेला स्मशानशेडचा प्रश्न आजही आहे त्या अवस्थेतच आहे. ग्रामपंचायतीने मिळालेल्या निधीतून स्मशानशेड बांधण्यास सुरुवात केली; पण जागेच्या वादातून हा प्रश्न न्यायालयात गेला आहे. कामास परवानगी मिळते तर कधी स्थगिती, त्यामुळे स्मशानशेडचा प्रश्न अधांतरी राहिला आहे. त्यामुळे सध्यातरी गावातील मृत लोकांवर रस्त्याकडेला किंवा शेतजमिनीत अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. मुरगूडपासून तीन किलोमीटर अंतरावर असणारे भडगाव हे प्रगतशील गाव आहे. राजकीय, शैक्षणिक, क्रीडा, सामाजिक क्षेत्रांत गावाचा लौकिक आहे. अगदी राज्यपातळीपर्यंतची अधिवेशने, कबड्डी सामने या गावात अत्यंत उत्साहात पार पडले आहेत; परंतु, ‘गाव तसं चांगलं, पण वेशीला टांगलं’ अशीच काहीशी गावची अवस्था झाली आहे. काही दिवसांपूर्वी येथील एका भूमिहीन महिलेवर मुख्य रस्त्याच्या कडेला अंत्यसंस्कार करण्यात आले, तर विजेच्या धक्क्याने मृत झालेल्या दुर्दैवी बापलेकांवर त्यांच्या नातलगांच्या शेतात चिखलात सरन रचून ऐन पावसामध्ये अंत्यसंस्कार करावे लागले. याला स्मशानशेडच्या श्रेयवादाचे राजकारण कारणीभूत ठरत आहे. या घटनेची चर्चा गावासह मुरगूड परिसरात होत आहे.गावातीलच एका भूमिहीन महिलेचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला. गावात स्मशानशेड नाही, स्वत:ची शेती किंवा रिकामी जागाही नाही, त्यामुळे नेमके कुठे अंत्यसंस्कार करायचे? असा प्रश्न निर्माण झाला. अखेर कागल-मुरगूड रस्त्यावरील रिकाम्या जागेत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय झाला. परंतु, त्या ठिकाणीही काही नागरिकांनी विरोध केला. अखेर मुख्य रस्त्याकडेलाच अंत्यसंस्कार करण्यात आले. कागल-मुरगूड रस्त्याकडेला सरन रचून अंत्यसंस्कार करण्याची वेळ त्यांच्या नातेवाइकांवर आली. त्यालाही आमच्या शेतीसमोर नको,म्हणून विरोध होत असताना संतप्त नातेवाइकांकडून पोलिसांत तोंडी तक्रार देण्यात आली. अखेर ग्रामपंचायत सदस्य आणि प्रतिष्ठित मंडळींनी पुढाकार घेऊन अंत्यसंस्कार पार पडले. या निमित्ताने पुन्हा एकदा स्मशानशेडचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून स्मशानशेडचा प्रश्न त्वरित मार्गी लावावा, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.येथील स्मशानशेडचे जागेअभावी काम रखडले होते. गतसाली सरपंच कल्पना पाटील व ग्रामपंचायतीने गावातील जाणकारांच्या मदतीने जागेचा प्रश्न मिटवला होता. त्यासाठी जिल्हा परिषद फंडातून निधी मंजूर होऊन बांधकामास प्रारंभही करण्यात आला होता. काम अंतिम टप्प्यात असतानाच पुन्हा जागेचा प्रश्न उफाळून आला आणि प्रकरण न्यायालयात गेले. पहिला निकाल ग्रामपंचायतीच्या बाजूने लागला आणि स्मशानशेडचे काम अंतिम टप्यात असतानाच न्यापालयाने स्थगिती दिली आहे. (वार्ताहर)जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवाज्याची स्वत:ची शेती, मोकळी जमीन आहे, त्यांच्या नातेवाइकाचा मृत्यू झाल्यास ते आपआपल्या शेतात अंत्यसंस्कार करतात. परंतु जे गरीब आहेत, भूमिहीन आहेत, ज्यांची काहीच जमीन नाही, त्यांनी कुठे जायचे? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सुजलाम् सुफलाम् असणाऱ्या गावात राजकारणातून व श्रेयवादातून स्मशानशेडच्या बांधकामाला ‘खो’ ंबसणे दुर्दैवी आहे. ऐन पावसाळ्यामध्ये उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत आहेत. गावातील सर्व गटा-तटांच्या लोकांनी मोठ्या मनाने मानसिकता दाखवून हा जिव्हाळ्याचा प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा ग्रामस्थांसह परिसरातून होत आहे.