शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई, ठाण्यात जुळली...! पण अखेरच्या दिवशी पुणे, नाशिकसह या महापालिकांत भाजप-शिवसेनेने युती तोडली...
2
PMC Election 2026: पुण्यात भाजप - शिवसेना युती तुटली; समाधानकारक जागा न मिळाल्याने नाराज शिंदेसेना स्वबळावर लढणार
3
ठाकरे बंधूंमध्ये कोण किती जागांवर लढणार? उद्धवसेना आणि मनसेतीला जागावाटपाची आकडेवारी अखेर समोर 
4
२ महिन्यांपूर्वी लग्न, श्रीलंकेत हनिमून अन् कपलने संपवलं आयुष्य; का झाला सुखी संसाराचा करुण अंत?
5
"संभाजीनगरात भाजपच्या अहंकारामुळे युती तुटली!" संजय शिरसाटांचा घणाघाती आरोप
6
३२ वर्ष निष्ठेने काम केले अन् पक्षानं दुर्लक्ष केले; मुलुंडमधील BJP पदाधिकाऱ्याचं खुलं पत्र
7
Vastu Shastra: सावधान! घरामध्ये 'या' चुका होत असतील तर पैसा टिकणार नाही आणि नात्यातही येईल कटुता!
8
उत्तराखंडमध्ये भीषण अपघात! प्रवाशांनी भरलेली बस खोल दरीत कोसळली; ६ जणांचा जागीच मृत्यू, अनेक जण जखमी
9
भाजपा-शिंदे गटाचे अखेर मुंबईत ठरले, CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
ब्रह्मोस एरोस्पेसच्या CEO ची नियुक्ती रद्द! 'कॅट'चा ऐतिहासिक निकाल; डॉ. जयतीर्थ जोशींना पदावरून हटवण्याचे आदेश
11
Sunny Leone : सनी लिओनीला 'नो एन्ट्री'! मथुरेत नवं वर्षाच्या कार्यक्रमावरुन साधू-संत आक्रमक; आंदोलनाचा इशारा
12
'धुरंधर' पाहून मला माझ्याच क्षमतांवर प्रश्न पडलेत..., आदित्य धरबद्दल करण जोहरची प्रतिक्रिया
13
Shyam Dhani Industries IPO Listing: ९०% प्रीमिअमवर लिस्टिंग, नंतर रॉकेट बनला शेअर; पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट
14
७ वेळा अटक, पण इरादे बुलंद! बांगलादेशच्या पहिल्या महिला पंतप्रधान खालिदा जिया यांचे भारताशी होते कनेक्शन 
15
ATM कमी झाले, बँकेच्या शाखा वाढल्या; बचत खात्यांमध्ये मोठी वाढ, जमा रक्कम ३.३ लाख कोटींच्या पार
16
मृत्यूशय्येवर होत्या, तरीही कालच दाखल केला उमेदवारी अर्ज! खालिदा झियांच्या मृत्यूने बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीचे मनसुबे धुळीस मिळाले
17
Video : मुंबईतील बस अपघाताचा व्हिडीओ आला समोर; भांडुपमध्ये रस्त्यावर उभ्या असलेल्या लोकांना बसने चिरडले
18
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थकाला 'बांगलादेशी' सोडून घेऊन गेले, आसाम पोलिसांवर हल्ला; १० जणांना अटक
19
मनसे सोडल्यावर प्रकाश महाजन पहिल्यांदाच राज ठाकरेंवर थेट बोलले; म्हणाले, “विठ्ठलानेच...”
20
"मला तो सीन करायचा नव्हता पण, रणवीरने...", 'धुरंधर'मधल्या 'त्या' कामुक सीनबाबत अभिनेत्याचा मोठा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा कार्यालयाच्या गलथान कारभार खेळाडूंचे करीयर धोक्यात

By admin | Updated: May 26, 2017 18:53 IST

राज्यातील सर्वच क्रीडा कार्यालयाकडून ज्या अत्यधुनिक संगणक पद्धतिचा वापर करावयास पाहिजे तो केला जात नाही.तर आजही पोस्टमनची वाट बघितली जाते

राजेंद्र पाटील /भोगावती : पोटाला चिमटा देऊन करिअरच्या हव्यासापोटी खेळात प्राविण्य मिळवणाऱ्या खेळाडूंचे क्रीडा कार्यालयाच्या गलथान कारभारामुळे करीयर धोक्यात आले आहे. जिल्हा क्रीडा उपसंचालक कार्यालयातील दप्तर दिरंगाईचा फटका या खेळाडूना बसत आहे.या बाबत कोणतीही संघटना किंवा लोकप्रतिनिधी आवाज उठवायला तयार नाही.तर मुग गिळून गप्प आहेत. देशाचे पंतप्रधान डिजिटल इंडियाची भाषा करत असताना क्रीडा कार्यालय मात्र अजूनही पोस्टमनची वाट पहात बसत आहे. क्रीडा कार्यालयाची अशीच अवस्था राहिली तर खेळाडूना खेळ सोडून लवकरच टाळ घ्यावे लागणार आहेत. क्रीडा उपसंचालक कार्यालयाचा उकिरडा करण्यात शासनाची भूमिका महत्वाची राहिली आहे.ज्या खेळाडूच्या मुळे या कार्यालयांना जळाळी प्राप्त झाली आहे त्याच्या भविष्याचा विसर पडला आहे.जे खेळाडू राज्य,राष्ट्रीय पातळीवर आपली गुणवत्ता सिद्ध करतात त्यांना मिळालेल्या प्रमाणपत्रांचे पडताळणी करून योग्य दाखला देण्याचे काम या कार्यालयाकडून केले जाते.शासकीय नोकर भरतीत ही पडताळणी सक्तीची आहे. त्यामुळे प्रतेक खेळाडूला या कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात.कोल्हापूर क्रीडा उपसंचालक कार्यालयात पडताळणीसाठी केलेल्या अर्जाची सात-सात महिने शहानिशा होत नाही.तोपर्यंत या कार्यालयाकडे हेलापडे मारण्याचे काम करावे लागते.ज्या ठिकाणी स्पर्धा होतात त्या कार्यालयाकडून माहिती वेळेत दिली जात नाही हे कारण पुढे केले जाते. राज्यातील सर्वच क्रीडा कार्यालयाकडून ज्या अत्यधुनिक संगणक पद्धतिचा वापर करावयास पाहिजे तो केला जात नाही.तर आजही पोस्टमनची वाट बघितली जाते. कोल्हापूर विभागीय क्रीडा उपसंचालक कार्यलयाच्या अंतर्गत कोल्हापूर,सांगली,सातारा,सिंधुदुर्ग, रत्नागिरी या पाच जिल्ह्याचा समावेश होतो.राज्यात असे कोल्हापूर, लातू१र औरंगाबाद पुणे,अमरावती,नाशिक,नागपूर असे आठ विभागिय कार्यालय आहेत.कोल्हापूर कार्यालयाकडे वरिष्ठ अधिका?्यासह एकूण बारा कमर्चारी नोंद आहेत, बारा पैकी आठ जण येथे कार्यान्वित दिसतात मात्र कार्यलयात हजर तीनच असतात, क्रीडा उपसंचालक हे महत्वाचे पद देखील प्रभारी चालवण्यात आले आहे. सांगलीचे क्रीडा अधिकारी अनिल चोरमले यांच्याकडे चार्ज देण्यात आला आहे. मुख्य लिपिकाची येथून बदली केली आहे.वरिष्ठ लिपिक एकच येथे काम करतात त्याच्या सोबत दोन शिपाई आहेत. लिपिक आठवड्यातून चार दिवस कामासाठी बाहेर असतात.त्यामुळे येथे काम कोणी करायचे हा प्रश्न उरतो. क्रीडा कार्यालयातील हा गलथान कारभार फक्त कोल्हापूरातच नाही तर राज्यातील सर्वच क्रीडा कार्यालयात आहे.यावरून खेळाडूंच्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक आहे. चौकट १ खेळाडू हे काय एका दिवसात तयार होत नाहीत,वर्षानुवर्षे ते आपल्या परिस्थितीवर मात करून स्वत:ला घडवण्याचा प्रयत्न करतात व शासकीय नौकरी साठी धडपडत असतात,त्यांच्या करियरला चालना कशी दिली जाईल हे काम क्रीडा कार्यालया कडून होणे आवश्यक आहे. मात्र येथे तर त्यांच्या क्रतुत्वाची चेष्टाच क्रीडा कार्यालयाकडून होत असेल तर खेळाडूंचा अपमान मी सहन करणार नाही,त्याबाबत योग्य ठिकाणी आवाज उठवून खेळाडूना न्याय देण्यासाठी प्रयत्न करू तसेच क्रीडा मंत्र्यांशी बोलून या प्रश्नना बाबत आवाज उठवीन असा ठाम विश्वास आम.प्रकाश अबिटकर यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केला. चौकट २ क्रीडा कार्यालयाकडून खेळाडूच्या साठी कधीच सहकार्याची भूमिका घेतली जात नाही.उलटा त्यांना मानसिक त्रास अधिक दिला जातो.सर्व पातळीवर मात करत खेळाडू ध्येया कडे वाटचाल करत आसतो,खेळाडूना जेवढे सामाजिक स्थान असते तेवढे क्रीडा खात्याकडून महत्व दिले जात नाही.याबाबत लोकप्रतिनिधी नी आवाज उठवण्याची गरज निर्माण झाली आहे.असे मत राष्ट्रीय अंपग जलतरण खेळाडू संभाजी पाटील याने व्यक्त केले आहे. चौकट ३ सध्या एका कोल्हापूर क्रीडा कार्यालयात ५०० प्रस्ताव धूळ खात पडले आहेत. एकीकडे राज्य शासनाची विविध खात्याची भरती सुरु असून या भरतीत उतरलेल्या असख्य खेळाडूना प्रमाणपत्र पडताळणी नसल्याकारणानी घरचा रस्ता बघावा लागला आहे.कोल्हापूरसह राज्यातील हजारो खेळाडूना आपल्या करीयर वर पाणी सोडण्याची वेळ येऊ शकते.यासाठी वेळीच दखल घेऊन कायर्वाही होणे आवश्यक आहे.