शहरं
Join us  
Trending Stories
1
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
2
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
3
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
4
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
5
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
6
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
7
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
8
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
9
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
10
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
11
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
12
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
13
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
14
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला १ रुपयांचा शिक्का करेल कमाल, नशीब उजळेल, व्हाल मालामाल 
16
धक्कादायक घटना ; 'कफ सिरप' घेतल्याने आठ बालकांचा मृत्यू ! जीव जाण्याला काय ठरले कारणीभूत ?
17
हृदयद्रावक! बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; ढसाढसा रडत नवऱ्याने ४ मुलांसह नदीत मारली उडी
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माला ठेंगा! शुबमन गिल वनडेचा नवा कॅप्टन
19
"हात पाय सलामत ठेवायचे असतील तर…", आमदार संतोष बांगर यांची अधिकाऱ्यांना धमकी, कॉल रेकॉर्डिंग व्हायरल
20
IND vs WI: मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजाची कमाल; सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास!

कॅप्टन शरद पवार जहाज पैलतीराला नेतील : हसन मुश्रीफ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 14:29 IST

प्रचंड वादळ वाऱ्यात आणि खवळलेल्या समुद्रातही कॅप्टन शरद पवार हे राष्ट्रवादीचे जहाज पैलतीराला नेऊन लावतील. जहाज बुडतंय अस समजून पळून गेलेल्या उंदरांची अवस्था मात्र त्यावेळी बघण्यासारखी होईल, असा टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी लगावला.

ठळक मुद्देकॅप्टन शरद पवार जहाज पैलतीराला नेतील : हसन मुश्रीफराष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता राज्यात येणार

कसबा सांगाव : प्रचंड वादळ वाऱ्यात आणि खवळलेल्या समुद्रातही कॅप्टन शरद पवार हे राष्ट्रवादीचे जहाज पैलतीराला नेऊन लावतील. जहाज बुडतंय अस समजून पळून गेलेल्या उंदरांची अवस्था मात्र त्यावेळी बघण्यासारखी होईल, असा टोला आमदार हसन मुश्रीफ यांनी लगावला.

येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यात राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सत्ता येणार असा विश्वासही आमदार मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केला. मौजे सांगाव ता कागल येथे घेण्यात आलेल्या माऊली विकास संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या महिला मेळाव्यात आमदार मुश्रीफ बोलत होते. अध्यक्षस्थानी सुमन युवराज पाटील होत्या.मुश्रीफ म्हणाले, पाच वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या भाजप-शिवसेनेच्या सरकारने राज्यातील जनतेची घोर फसवणूक केली आहे. बंद पडलेल्या कंपन्या आणि उद्योगधंद्यांमुळे बेरोजगारीने तर कळसच गाठला आहे. त्यामुळे अपयश पदरी आलेले सरकारमधील हे पक्ष कितीही आमदार विकत घेऊ देत,आमदारांवर कितीही दबाव टाकू देत.

येत्या विधानसभा निवडणुकीत जनताच त्यांना धुळीस मिळवेल.राष्ट्रवादी पक्ष सोडून पळून जाणा?्यांवर टीकास्त्र सोडताना आमदार मुश्रीफ म्हणाले, शरद पवारांनी अनेकांना मंत्री केले , सत्ता दिल्या , मोठमोठी पदे दिली आणि त्यांची भरभराटही झाली. आज मात्र पवारसाहेबांचा वृद्धापकाळ असताना ते त्यांना सोडून जात आहेत , ही बाब लाजिरवाणी आहे. कुणी काहीही करो , मी मात्र खंबीरपणे घट्ट पाय रोवून पवारसाहेबांसोबत त्यांच्या पाठीशी उभा आहे.स्वागत बाजार समितीचे माजी अध्यक्ष कृष्णात पाटील यांनी केले. जिल्हा परिषद सदस्य युवराज पाटील यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन के आर पाटील यांनी केले. सरपंच सौ स्वाती नंदकुमार पाटील यांनी आभार मानले. यावेळी व्यासपीठावर कागलच्या नगराध्यक्ष माणिक माळी, सबीना मुश्रीफ,अमरीन मुश्रीफ, वंदना पाटील, आदी प्रमुख उपस्थित होते. भोग सरलं, सुख येईल........मुश्रीफ म्हणाले, राज्यातील आजघडीचे सत्ताकारण कितीही अस्थीर असो. परंतु मला मात्र ठाम विश्वास आहे , दिस जातीलं, दिस येतील ! भोग सरलं, सुख येईल.... 

 

टॅग्स :Hassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफkolhapurकोल्हापूर