शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धन’त्रयोदशीला ग्राहकांचा २४ कॅरेट उत्साह; सोने ३ हजार, तर चांदी ७ हजार रुपयांनी स्वस्त
2
३३ लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात ३,२५८ कोटी; पॅकेज मदतनिधी मंजुरी, आतापर्यंत ७,५०० कोटींची मदत
3
‘कदम यांचे वय ११७ नव्हे ५४ वर्षे’ विरोधकांचे आरोप आयोगाने फेटाळले; आक्षेप-वस्तुस्थिती काय?
4
बिहार निवडणुकीत PM मोदींची तब्बल १२ सभांची तयारी; राहुल गांधींच्या एकाही सभेचे नियोजन नाही
5
महाआघाडी जागा वाटपाचा घोळ मिटेना; अर्ज भरण्याची मुदत संपली, चर्चेचे गुऱ्हाळ अद्याप सुरूच
6
बिहारमध्ये राजदचा पुन्हा ‘जंगलराज’ आणायचा प्रयत्न; अमित शाह यांची टीका, NDA विजयाचा विश्वास
7
‘ब्रह्मोस’ टप्प्यात पाकची इंच इंच भूमी; क्षेपणास्त्राच्या पहिल्या बॅचचे अनावरण, भारताचा इशारा
8
दोन लाखांवर मजुरांची दिवाळी अंधारातच! मनरेगाची १७० कोटी रक्कम चार महिन्यांपासून थकीत
9
बोगस मतदारांसाठी अधिकारीच पैसे घेतात; भाजपा आमदार मंदा म्हात्रेंचा गंभीर आरोप
10
शेतकरी कर्जमाफीची रक्कम ६ आठवड्यांत लाभार्थ्यांना द्या; औरंगाबाद खंडपीठाचे सरकारला निर्देश
11
महामुंबईत दिवाळी उत्सवावर पाणी? राज्यात कुठे सरी बरसणार, तर कुठे मोकळे आकाश
12
लाचखोर पाटोळेंसह तिघांना जामीन; मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय; निलंबन युक्तिवाद ग्राह्य
13
कॉर्पोरेटच्या नादात महायुतीला महापुरुषांचा विसर; काँग्रेसची मेट्रो स्थानक नावांवरून टीका
14
पाकच्या हवाई हल्ल्यांत तीन अफगाण क्रिकेटपटू ठार; युद्धविराम भवितव्यावर पुन्हा प्रश्नचिन्ह
15
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
16
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
17
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
18
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
19
Birhad Morcha: बिर्हाड मोर्चा मुंबईच्या वेशीवर, कसारा घाटात ठिय्या आंदोलन, प्रमुख मागण्यांसाठी एल्गार!
20
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार

वरणगे पाडळीत बुडालेला ऊस लागला कुजायला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:22 IST

वरणगे व पाडळी या गावांमध्ये सुमारे 1000 एकर ऊस शेती पाण्याखाली गेली होती. त्यापैकी वरणगेत 480, तर पाडळीत 520 ...

वरणगे व पाडळी या गावांमध्ये सुमारे 1000 एकर ऊस शेती पाण्याखाली गेली होती. त्यापैकी वरणगेत 480, तर पाडळीत 520 एकर ऊस शेतीला या महापुराचा फटका बसला. सलग तिसऱ्या वर्षी महापुरामुळे ऊसशेती खराब झाल्यामुळे या गावांमधील आर्थिक व्यवहाराचा कणा मोडला आहे. घरांमध्ये पाणी आणि शेतामध्ये ऊस पिकाचे नुकसान अशा दुहेरी संकटात या गावांमधील शेतकरी सापडला आहे. त्यापैकी पाडळी गावातील राजर्षी शाहू विकास संस्थेला सलग ऐंशी वर्षापासून 100 टक्के पीक कर्ज वसूल करण्याची परंपरा आहे. शेतकरीही प्रसंगी पोटाला चिमटा लावून प्रामाणिकपणे पीक कर्ज भरत आहेत. त्यामुळे शासनाने केलेल्या कर्जमाफीचा एकदाही या संस्थेच्या एकाही सभासदाला लाभ झाला नाही. वरणगेतसुद्धा 80 टक्के नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत. थकबाकीदार नसल्यामुळे तेही शासनाच्या कर्जमाफीपासून वंचित राहिले. शासनाने नियमित कर्ज भरणाऱ्या सभासदांसाठी जाहीर केलेली 50 हजार रुपयांची रक्कम अजूनही मिळालेली नाही. त्यातच सलग तीन वर्षे आलेल्या महापुरामुळे या गावांमधील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. घरात शिरलेले पाणी, पडलेली घरे यातून सावरण्याच्या आतच ऊस कुजू लागल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत.

चौकट : वरणगेतील हनुमान सेवा संस्थेच्या खताच्या गोडाऊनमध्ये महापुराचे पाणी शिरल्यामुळे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. पाण्याची पातळी अनपेक्षित वेगाने वाढल्यामुळे खताची पोती इतरत्र हलविण्यासाठी वेळ मिळाला नाही.

कोट : गेली सलग ऐंशी वर्षे आमच्या संस्थेचे 100 टक्के सभासद प्रामाणिकपणे पीक कर्ज वेळेत भरतात; पण सलग तीन वर्षे झालेल्या ऊस शेतीच्या नुकसानीमुळे पीक कर्ज भरण्याची मानसिकता शेतकऱ्यांची नाही. त्यामुळे शासनाने पीक कर्ज माफ करावे. अन्यथा सेवा संस्था मोडीत निघाल्याशिवाय राहणार नाहीत. डी. डी. पाटील, सचिव राजर्षी शाहू सेवा संस्था पाडळी बु.!!