शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

वरणगे पाडळीत बुडालेला ऊस लागला कुजायला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:22 IST

वरणगे व पाडळी या गावांमध्ये सुमारे 1000 एकर ऊस शेती पाण्याखाली गेली होती. त्यापैकी वरणगेत 480, तर पाडळीत 520 ...

वरणगे व पाडळी या गावांमध्ये सुमारे 1000 एकर ऊस शेती पाण्याखाली गेली होती. त्यापैकी वरणगेत 480, तर पाडळीत 520 एकर ऊस शेतीला या महापुराचा फटका बसला. सलग तिसऱ्या वर्षी महापुरामुळे ऊसशेती खराब झाल्यामुळे या गावांमधील आर्थिक व्यवहाराचा कणा मोडला आहे. घरांमध्ये पाणी आणि शेतामध्ये ऊस पिकाचे नुकसान अशा दुहेरी संकटात या गावांमधील शेतकरी सापडला आहे. त्यापैकी पाडळी गावातील राजर्षी शाहू विकास संस्थेला सलग ऐंशी वर्षापासून 100 टक्के पीक कर्ज वसूल करण्याची परंपरा आहे. शेतकरीही प्रसंगी पोटाला चिमटा लावून प्रामाणिकपणे पीक कर्ज भरत आहेत. त्यामुळे शासनाने केलेल्या कर्जमाफीचा एकदाही या संस्थेच्या एकाही सभासदाला लाभ झाला नाही. वरणगेतसुद्धा 80 टक्के नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत. थकबाकीदार नसल्यामुळे तेही शासनाच्या कर्जमाफीपासून वंचित राहिले. शासनाने नियमित कर्ज भरणाऱ्या सभासदांसाठी जाहीर केलेली 50 हजार रुपयांची रक्कम अजूनही मिळालेली नाही. त्यातच सलग तीन वर्षे आलेल्या महापुरामुळे या गावांमधील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. घरात शिरलेले पाणी, पडलेली घरे यातून सावरण्याच्या आतच ऊस कुजू लागल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत.

चौकट : वरणगेतील हनुमान सेवा संस्थेच्या खताच्या गोडाऊनमध्ये महापुराचे पाणी शिरल्यामुळे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. पाण्याची पातळी अनपेक्षित वेगाने वाढल्यामुळे खताची पोती इतरत्र हलविण्यासाठी वेळ मिळाला नाही.

कोट : गेली सलग ऐंशी वर्षे आमच्या संस्थेचे 100 टक्के सभासद प्रामाणिकपणे पीक कर्ज वेळेत भरतात; पण सलग तीन वर्षे झालेल्या ऊस शेतीच्या नुकसानीमुळे पीक कर्ज भरण्याची मानसिकता शेतकऱ्यांची नाही. त्यामुळे शासनाने पीक कर्ज माफ करावे. अन्यथा सेवा संस्था मोडीत निघाल्याशिवाय राहणार नाहीत. डी. डी. पाटील, सचिव राजर्षी शाहू सेवा संस्था पाडळी बु.!!