शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

वरणगे पाडळीत बुडालेला ऊस लागला कुजायला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:22 IST

वरणगे व पाडळी या गावांमध्ये सुमारे 1000 एकर ऊस शेती पाण्याखाली गेली होती. त्यापैकी वरणगेत 480, तर पाडळीत 520 ...

वरणगे व पाडळी या गावांमध्ये सुमारे 1000 एकर ऊस शेती पाण्याखाली गेली होती. त्यापैकी वरणगेत 480, तर पाडळीत 520 एकर ऊस शेतीला या महापुराचा फटका बसला. सलग तिसऱ्या वर्षी महापुरामुळे ऊसशेती खराब झाल्यामुळे या गावांमधील आर्थिक व्यवहाराचा कणा मोडला आहे. घरांमध्ये पाणी आणि शेतामध्ये ऊस पिकाचे नुकसान अशा दुहेरी संकटात या गावांमधील शेतकरी सापडला आहे. त्यापैकी पाडळी गावातील राजर्षी शाहू विकास संस्थेला सलग ऐंशी वर्षापासून 100 टक्के पीक कर्ज वसूल करण्याची परंपरा आहे. शेतकरीही प्रसंगी पोटाला चिमटा लावून प्रामाणिकपणे पीक कर्ज भरत आहेत. त्यामुळे शासनाने केलेल्या कर्जमाफीचा एकदाही या संस्थेच्या एकाही सभासदाला लाभ झाला नाही. वरणगेतसुद्धा 80 टक्के नियमित कर्ज भरणारे शेतकरी आहेत. थकबाकीदार नसल्यामुळे तेही शासनाच्या कर्जमाफीपासून वंचित राहिले. शासनाने नियमित कर्ज भरणाऱ्या सभासदांसाठी जाहीर केलेली 50 हजार रुपयांची रक्कम अजूनही मिळालेली नाही. त्यातच सलग तीन वर्षे आलेल्या महापुरामुळे या गावांमधील अर्थव्यवस्था कोलमडली आहे. घरात शिरलेले पाणी, पडलेली घरे यातून सावरण्याच्या आतच ऊस कुजू लागल्याने शेतकरी चिंतेत सापडले आहेत.

चौकट : वरणगेतील हनुमान सेवा संस्थेच्या खताच्या गोडाऊनमध्ये महापुराचे पाणी शिरल्यामुळे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले. पाण्याची पातळी अनपेक्षित वेगाने वाढल्यामुळे खताची पोती इतरत्र हलविण्यासाठी वेळ मिळाला नाही.

कोट : गेली सलग ऐंशी वर्षे आमच्या संस्थेचे 100 टक्के सभासद प्रामाणिकपणे पीक कर्ज वेळेत भरतात; पण सलग तीन वर्षे झालेल्या ऊस शेतीच्या नुकसानीमुळे पीक कर्ज भरण्याची मानसिकता शेतकऱ्यांची नाही. त्यामुळे शासनाने पीक कर्ज माफ करावे. अन्यथा सेवा संस्था मोडीत निघाल्याशिवाय राहणार नाहीत. डी. डी. पाटील, सचिव राजर्षी शाहू सेवा संस्था पाडळी बु.!!