शहरं
Join us  
Trending Stories
1
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
2
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
3
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
4
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
5
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
6
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
7
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
8
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
10
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
11
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
12
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
13
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
14
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
15
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
16
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
17
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
18
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
19
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
20
ओठ फुटलेत-कोरडे झालेत? मॉइश्चरायझर म्हणून लिप बाम चांगला की ऑइल बाम, ‘असं’ ठरवा..

ठरावधारकांच्या मागणीने उमेदवार ‘बेजार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:30 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकूळ’चे राजकारण टिपेला पोहोचले असून दोन्ही आघाड्यांनी आपआपले ठराव अज्ञातस्थळी हलवले आहेत. ...

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकूळ’चे राजकारण टिपेला पोहोचले असून दोन्ही आघाड्यांनी आपआपले ठराव अज्ञातस्थळी हलवले आहेत. या ठरावधारकांच्या मागण्यांनी उमेदवार बेजार झाले असून एरव्ही घरात भाजी-भाकरी खाणाऱ्याला रोज चमचमीत जेवण व तत्पूर्वीची सर्व व्यवस्था पुरवावी लागत आहे. काही ठरावधारक घरापासून आठ -दहा दिवस बाहेर असल्याने त्यांच्यासाठी कर्नाटकातून खास ‘पार्सल’ मागवल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात जोरात आहे.

‘गोकूळ’च्या निवडणूक चांगलीच रंगात आली असून ठरावधारकांची उचलाउचलीसाठी स्पर्धा लागली आहे. जे सोबत येण्यास तयार नाहीत, त्यांच्यावर नजर ठेवली जात आहे. त्याचा कोणाशी संपर्क येतो का, यासाठी स्वतंत्र यंत्रणा असून त्याची घरातच सगळी पूर्तता केली जाते. दोन्ही आघाड्यांकडून इतर कोणाशी संपर्क होणार नाही, अशा अज्ञात ठिकाणी ठरावधारकांना ठेवले आहे. त्यांच्या बडदास्तासाठी खास लोकांची नियुक्ती केली आहे.

सकाळी उठल्यानंतर चहा, कॉफी, नास्ता दिला जातो. त्यानंतर सकाळच्या जेवणाची तयारी सुरू होते. कोणाला काय हवे, त्याची लिस्ट तयार केली जाते. जेवण तयार होईपर्यंत तत्पूर्वी लागणाऱ्या गोष्टीची पूर्तता केली जाते. मग त्यातही ब्रॅण्डच्या आवडीनिवडी सुरू होतात. एरव्ही ‘गावठी’चा आधार असणाऱ्यांचा चांगलाच भाव वधारला आहे. सकाळच्या जेवल्यानंतर विश्रांती घेतल्यानंतर दुपारी ४ वाजता चहा दिला जातो. त्यानंतर सायंकाळच्या जेवणाची तयारी सुरू होते. ६ वाजले की पुन्हा बैठक सुरू होते, ती रात्री १० पर्यंत असते. रात्री जेवताना कधी डोळा लागतो, हेच अनेक जणांना कळत नसल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. रविवारी सकाळी मतदान होईपर्यंत ठरावधारकांना सांभाळावे लागणार असून त्यांच्या आवडी- निवडी पुरवताना उमेदवार बेजार झाले आहेत.

उमेदवारी नको रे बाबा!

‘गोकूळ’च्या आतापर्यंतच्या निवडणूकीत इतकी टोकाची ईर्षा कधीच पाहावयास मिळाली नव्हती. इतर वेळी पॅनेलमध्ये संधी मिळाली की संचालक झालो, अशी परिस्थिती होती. मात्र यावेळची परिस्थिती काहीसी वेगळी आहे. त्यामुळे उमेदवारांच्या भांडवली गुंतवणुकीत तिपटीने वाढ झाली आहे. त्याची पूर्तता करताना उमेदवारांची दमछाक होत आहे. त्यामुळे पुढच्या वेळी उमेदवारी नको रे बाबा, म्हणण्याची वेळ आली आहे.

दोन्ही प्रकारचे आचारी

ठरावधारकांना आवडेल ते देण्यासाठी शाकाहारी व मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे आचारी तिथे आहेत. सकाळी उठल्यानंतर नाष्ट्यापासून आवड-निवड विचारली जाते. सकाळचे जेवणातील मेनू काय हवेत, प्रत्येकाला हवे ते दिले जाते.

सकाळ, संध्याकाळ वेगळे मेनू

सकाळच्या जेवणातील मेनू हा संध्याकाळी असता कामा नये, असा आग्रह काही ठरावधारकांचा आहे. त्यामुळे मांसाहारी जेवणातील सर्व मेनू जवळपास संपले आहेत.