शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

ठरावधारकांच्या मागणीने उमेदवार ‘बेजार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:30 IST

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकूळ’चे राजकारण टिपेला पोहोचले असून दोन्ही आघाड्यांनी आपआपले ठराव अज्ञातस्थळी हलवले आहेत. ...

राजाराम लोंढे, लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकूळ’चे राजकारण टिपेला पोहोचले असून दोन्ही आघाड्यांनी आपआपले ठराव अज्ञातस्थळी हलवले आहेत. या ठरावधारकांच्या मागण्यांनी उमेदवार बेजार झाले असून एरव्ही घरात भाजी-भाकरी खाणाऱ्याला रोज चमचमीत जेवण व तत्पूर्वीची सर्व व्यवस्था पुरवावी लागत आहे. काही ठरावधारक घरापासून आठ -दहा दिवस बाहेर असल्याने त्यांच्यासाठी कर्नाटकातून खास ‘पार्सल’ मागवल्याची चर्चा सध्या जिल्ह्यात जोरात आहे.

‘गोकूळ’च्या निवडणूक चांगलीच रंगात आली असून ठरावधारकांची उचलाउचलीसाठी स्पर्धा लागली आहे. जे सोबत येण्यास तयार नाहीत, त्यांच्यावर नजर ठेवली जात आहे. त्याचा कोणाशी संपर्क येतो का, यासाठी स्वतंत्र यंत्रणा असून त्याची घरातच सगळी पूर्तता केली जाते. दोन्ही आघाड्यांकडून इतर कोणाशी संपर्क होणार नाही, अशा अज्ञात ठिकाणी ठरावधारकांना ठेवले आहे. त्यांच्या बडदास्तासाठी खास लोकांची नियुक्ती केली आहे.

सकाळी उठल्यानंतर चहा, कॉफी, नास्ता दिला जातो. त्यानंतर सकाळच्या जेवणाची तयारी सुरू होते. कोणाला काय हवे, त्याची लिस्ट तयार केली जाते. जेवण तयार होईपर्यंत तत्पूर्वी लागणाऱ्या गोष्टीची पूर्तता केली जाते. मग त्यातही ब्रॅण्डच्या आवडीनिवडी सुरू होतात. एरव्ही ‘गावठी’चा आधार असणाऱ्यांचा चांगलाच भाव वधारला आहे. सकाळच्या जेवल्यानंतर विश्रांती घेतल्यानंतर दुपारी ४ वाजता चहा दिला जातो. त्यानंतर सायंकाळच्या जेवणाची तयारी सुरू होते. ६ वाजले की पुन्हा बैठक सुरू होते, ती रात्री १० पर्यंत असते. रात्री जेवताना कधी डोळा लागतो, हेच अनेक जणांना कळत नसल्याचे चित्र सध्या पाहावयास मिळत आहे. रविवारी सकाळी मतदान होईपर्यंत ठरावधारकांना सांभाळावे लागणार असून त्यांच्या आवडी- निवडी पुरवताना उमेदवार बेजार झाले आहेत.

उमेदवारी नको रे बाबा!

‘गोकूळ’च्या आतापर्यंतच्या निवडणूकीत इतकी टोकाची ईर्षा कधीच पाहावयास मिळाली नव्हती. इतर वेळी पॅनेलमध्ये संधी मिळाली की संचालक झालो, अशी परिस्थिती होती. मात्र यावेळची परिस्थिती काहीसी वेगळी आहे. त्यामुळे उमेदवारांच्या भांडवली गुंतवणुकीत तिपटीने वाढ झाली आहे. त्याची पूर्तता करताना उमेदवारांची दमछाक होत आहे. त्यामुळे पुढच्या वेळी उमेदवारी नको रे बाबा, म्हणण्याची वेळ आली आहे.

दोन्ही प्रकारचे आचारी

ठरावधारकांना आवडेल ते देण्यासाठी शाकाहारी व मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे आचारी तिथे आहेत. सकाळी उठल्यानंतर नाष्ट्यापासून आवड-निवड विचारली जाते. सकाळचे जेवणातील मेनू काय हवेत, प्रत्येकाला हवे ते दिले जाते.

सकाळ, संध्याकाळ वेगळे मेनू

सकाळच्या जेवणातील मेनू हा संध्याकाळी असता कामा नये, असा आग्रह काही ठरावधारकांचा आहे. त्यामुळे मांसाहारी जेवणातील सर्व मेनू जवळपास संपले आहेत.