शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

कॅन्सर लवकर शोधणाऱ्या सेन्सरचे संशोधन : कोल्हापुरातील दोन प्राध्यापकांचे प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 00:21 IST

विश्वास पाटील ।कोल्हापूर : माणसाच्या शरीरातील ग्लुकोज लेव्हल जशी रक्ताच्या एका ड्रॉपची तपासणी करून समजू शकते तसे रुग्णाला कॅन्सर झाला आहे की नाही हे ओळखणे कसे शक्य होईल यासंबंधीचे संशोधन येथील न्यू कॉलेजमधील दोन प्राध्यापकांनी सुरू केले आहे.त्यांच्या या संशोधन प्रकल्पाचे महत्त्व ओळखून केंद्र शासनाच्या डिपार्टमेंट आॅफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ...

विश्वास पाटील ।कोल्हापूर : माणसाच्या शरीरातील ग्लुकोज लेव्हल जशी रक्ताच्या एका ड्रॉपची तपासणी करून समजू शकते तसे रुग्णाला कॅन्सर झाला आहे की नाही हे ओळखणे कसे शक्य होईल यासंबंधीचे संशोधन येथील न्यू कॉलेजमधील दोन प्राध्यापकांनी सुरू केले आहे.त्यांच्या या संशोधन प्रकल्पाचे महत्त्व ओळखून केंद्र शासनाच्या डिपार्टमेंट आॅफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागाने त्यांना तीन वर्षांच्या प्रकल्पासाठी ३० लाख रुपयांची संशोधनवृत्ती मंजूर केली आहे. कॅन्सरचे निदान लवकर झाल्यास अनेकांचा जीव वाचविणे शक्य होणार आहे.

मुरगूडचे डॉ. अशोक चौगले व कणेरीमठ (ता. करवीर) येथील डॉ. प्रशांत पाटील अशी या प्राध्यापकांची नावे आहेत. चौगले हे बायोकेमिस्ट्रीमध्ये पीएच.डी आहेत. पाटील यांनी फिजिक्समध्ये सॉलिड स्टेटमध्ये संशोधन केले आहे. संशोधनात अनेक वर्षे काम केलेल्या वरिष्ठ प्राध्यापकांना व त्यातही विद्यापीठाच्या स्तरांवर काम करणाºयाला एक्स्ट्रा म्युरल रिसर्च (ईएमआर) करण्याची संधी मिळते, परंतु चौगले व पाटील यांना हा संशोधन प्रकल्प कॉलेजस्तरांवरच मिळाला आहे.कॅन्सरचे निदान सुरुवातीच्या टप्प्यातच झाल्यास रुग्णाचा तो अवयव काढून टाकल्यास त्याचा जीव वाचविणे शक्य होते.

त्यासाठीच निदान लवकर होणे आवश्यक असते. आता शरीरातील ग्लुकोज लेव्हल इतक्या सुलभ व सहजपणे तपासणारी यंत्रणा उपलब्ध झाली आहे, तशीच यंत्रणा किंवासेन्सर तयार करण्याचा या प्राध्यापकांचा प्रयत्न आहे. या संशोधनात नॅनो पार्टिकल्स व स्पेसिफिक अ‍ॅन्टी बॉडीजचा वापर करण्यात येणार आहे.त्याची सेन्सिटीव्हीटी जास्त असेल, त्यामुळे एखाद्या व्यक्तीला अत्यंत सूक्ष्म पातळीवरही कॅन्सरची लागण झालेली असेल तरी ते यामध्ये ओळखले जाईल. देशात कॅन्सरच्या विविध प्रकारांचे वाढते रुग्ण, त्याचा उपचाराचा होणारा प्रचंड खर्चआणि मृत्यूचे प्रमाण याचाविचार करता या आजाराचे निदान लवकर होणे किती महत्त्वाचे आहे हे अधोरेखित होते. त्यादृष्टीनेया संशोधनाला देशपातळीवर आणि मानवी संपत्तीच्या दृष्टीनेही फारच महत्त्व येणार आहे. 

कॅन्सरचे प्राथमिक निदान लवकर झाल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होण्याची संधी असते; परंतु आता आमच्याकडे उपचारासाठी येणाºया एकूण रुग्णांपैकी ६५ टक्के रुग्ण त्यांचा कॅन्सर तिसºया स्टेजला असताना डॉक्टरकडे येतात. फक्त २० टक्केच रुग्ण सुरुवातीच्या टप्प्यात आजार असताना डॉक्टरपर्यंत येतात. या आजारात निदान लवकर होणे हे अत्यंंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी काही संशोधन होत असेल तर ते उपयुक्तच ठरू शकेल.- डॉ. सूरज पवार, प्र्रख्यात कॅन्सर तज्ज्ञ