शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

चाचणी लेखापरीक्षण रद्दचा पतसंस्थांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 11:48 IST

सहकारी पतसंस्थांचे चाचणी लेखापरीक्षण रद्द करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने घेतल्याने पतसंस्थांना दिलासा मिळाला आहे. ९७ व्या घटनादुरुस्तीनंतर संस्थांना लेखापरीक्षक नेमणुकीस स्वायत्तता दिली होती. त्यामुळे संस्थांवरील सरकारचा अंकुश कमी झाल्याने हा निर्णय घेतला होता; पण अडचणीतील संस्थांऐवजी चांगल्या संस्थांचे लेखापरीक्षण करून त्रास दिला जायचा, अशा तक्रारी होत्या.

ठळक मुद्देचाचणी लेखापरीक्षण रद्दचा पतसंस्थांना दिलासालेखापरीक्षणाच्या नावाखाली बडदास्तच अधिक

कोल्हापूर : सहकारी पतसंस्थांचे चाचणी लेखापरीक्षण रद्द करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने घेतल्याने पतसंस्थांना दिलासा मिळाला आहे. ९७ व्या घटनादुरुस्तीनंतर संस्थांना लेखापरीक्षक नेमणुकीस स्वायत्तता दिली होती. त्यामुळे संस्थांवरील सरकारचा अंकुश कमी झाल्याने हा निर्णय घेतला होता; पण अडचणीतील संस्थांऐवजी चांगल्या संस्थांचे लेखापरीक्षण करून त्रास दिला जायचा, अशा तक्रारी होत्या.केंद्र सरकारने सहकारी संस्थांच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी ९७ वी घटनादुरुस्ती केली. यामुळे संस्थांच्या कामकाजाच्या पद्धतीच बदलत गेल्या. यामध्ये सरकारचा हस्तक्षेप कमी झाल्याने काही सरकारी यंत्रणेला अडचणी निर्माण झाल्या होत्या. म्हणून राज्य सरकारने १५ सप्टेंबर २०१७ रोजी परिपत्रक काढून चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश सहकार व लेखापरीक्षण विभागाला दिले. त्यानुसार एकूण संस्थांपैकी २० टक्के संस्था रॅँडम पद्धतीने घेऊन त्यांचे फेरलेखापरीक्षण केले जायचे.

वास्तविक समस्याप्रधान संस्थांचे चाचणी लेखापरीक्षण करून त्यातील त्रुटी दूर कराव्यात, हा सरकारचा हेतू होता. लेखापरीक्षण थकले, ठेवीवाटप प्रलंबित आहे, शासकीय भाग भांडवल व सरकारी पॅकेजची वसुली, आदी बाबी ज्या संस्थेत आहेत, त्यांचे चाचणी लेखापरीक्षण करून संस्था मार्गी लावण्याची जबाबदारी लेखापरीक्षकांची असते.

पण तसे न होता, सक्षम संस्थांचेच लेखापरीक्षण करून त्यांना त्रास देण्याचे प्रकारही झाले आहेत. याविरोधात महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन चाचणी लेखापरीक्षणाचे परिपत्रक रद्द करण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे पतसंस्था चालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.विशेष लेखापरीक्षण करता येणारकामकाजात अनियमितता आढळली. त्याचबरोबर पतसंस्थेने सादर केलेला लेखापरीक्षण अहवाल अयोग्य वाटल्यास सहकार आयुक्तांना संबंधित संस्थेचे विशेष लेखापरीक्षण करता येऊ शकते, असेही न्यायालयाने सांगितले आहे.

उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. या निर्णयाने पतसंस्था चालकांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील पतसंस्थांची स्थिती भक्कम असून दोन हजारांपैकी १६५० पतसंस्था सुस्थितीत आहेत.- शंकर पाटील, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशन

 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूर