शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

चाचणी लेखापरीक्षण रद्दचा पतसंस्थांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2019 11:48 IST

सहकारी पतसंस्थांचे चाचणी लेखापरीक्षण रद्द करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने घेतल्याने पतसंस्थांना दिलासा मिळाला आहे. ९७ व्या घटनादुरुस्तीनंतर संस्थांना लेखापरीक्षक नेमणुकीस स्वायत्तता दिली होती. त्यामुळे संस्थांवरील सरकारचा अंकुश कमी झाल्याने हा निर्णय घेतला होता; पण अडचणीतील संस्थांऐवजी चांगल्या संस्थांचे लेखापरीक्षण करून त्रास दिला जायचा, अशा तक्रारी होत्या.

ठळक मुद्देचाचणी लेखापरीक्षण रद्दचा पतसंस्थांना दिलासालेखापरीक्षणाच्या नावाखाली बडदास्तच अधिक

कोल्हापूर : सहकारी पतसंस्थांचे चाचणी लेखापरीक्षण रद्द करण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने घेतल्याने पतसंस्थांना दिलासा मिळाला आहे. ९७ व्या घटनादुरुस्तीनंतर संस्थांना लेखापरीक्षक नेमणुकीस स्वायत्तता दिली होती. त्यामुळे संस्थांवरील सरकारचा अंकुश कमी झाल्याने हा निर्णय घेतला होता; पण अडचणीतील संस्थांऐवजी चांगल्या संस्थांचे लेखापरीक्षण करून त्रास दिला जायचा, अशा तक्रारी होत्या.केंद्र सरकारने सहकारी संस्थांच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी ९७ वी घटनादुरुस्ती केली. यामुळे संस्थांच्या कामकाजाच्या पद्धतीच बदलत गेल्या. यामध्ये सरकारचा हस्तक्षेप कमी झाल्याने काही सरकारी यंत्रणेला अडचणी निर्माण झाल्या होत्या. म्हणून राज्य सरकारने १५ सप्टेंबर २०१७ रोजी परिपत्रक काढून चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश सहकार व लेखापरीक्षण विभागाला दिले. त्यानुसार एकूण संस्थांपैकी २० टक्के संस्था रॅँडम पद्धतीने घेऊन त्यांचे फेरलेखापरीक्षण केले जायचे.

वास्तविक समस्याप्रधान संस्थांचे चाचणी लेखापरीक्षण करून त्यातील त्रुटी दूर कराव्यात, हा सरकारचा हेतू होता. लेखापरीक्षण थकले, ठेवीवाटप प्रलंबित आहे, शासकीय भाग भांडवल व सरकारी पॅकेजची वसुली, आदी बाबी ज्या संस्थेत आहेत, त्यांचे चाचणी लेखापरीक्षण करून संस्था मार्गी लावण्याची जबाबदारी लेखापरीक्षकांची असते.

पण तसे न होता, सक्षम संस्थांचेच लेखापरीक्षण करून त्यांना त्रास देण्याचे प्रकारही झाले आहेत. याविरोधात महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर सुनावणी होऊन चाचणी लेखापरीक्षणाचे परिपत्रक रद्द करण्याचे आदेश दिले. या निर्णयामुळे पतसंस्था चालकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.विशेष लेखापरीक्षण करता येणारकामकाजात अनियमितता आढळली. त्याचबरोबर पतसंस्थेने सादर केलेला लेखापरीक्षण अहवाल अयोग्य वाटल्यास सहकार आयुक्तांना संबंधित संस्थेचे विशेष लेखापरीक्षण करता येऊ शकते, असेही न्यायालयाने सांगितले आहे.

उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. या निर्णयाने पतसंस्था चालकांना दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यातील पतसंस्थांची स्थिती भक्कम असून दोन हजारांपैकी १६५० पतसंस्था सुस्थितीत आहेत.- शंकर पाटील, अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा पतसंस्था फेडरेशन

 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूर