शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

ट्रेलरसाठी हायड्रोलिक ब्रेकचा कायदा रद्द : केंद्राचा अध्यादेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 01:17 IST

शिरोली : ट्रेलरला हायड्रोलिक ब्रेक यंत्रणा बसवावी यासाठी केंद्र शासनाने २००८ साली ९७/३ हा कायदा करून ट्रेलरचे पासिंग बंद केले होते. हा कायदा तब्बल ९ वर्षांनी केंद्र शासनानेच रद्द केला

ठळक मुद्देपासिंगचा मार्ग मोकळा; उद्योजकांच्या पाठपुराव्याला मोठे यशखासदार धनंजय महाडिक यांना कायदा रद्द करण्याबाबत विनंती

सतीश पाटील ।शिरोली : ट्रेलरला हायड्रोलिक ब्रेक यंत्रणा बसवावी यासाठी केंद्र शासनाने २००८ साली ९७/३ हा कायदा करून ट्रेलरचे पासिंग बंद केले होते. हा कायदा तब्बल ९ वर्षांनी केंद्र शासनानेच रद्द केला असून तसा रद्द केल्याच अध्यादेशही काढला आहे. यामुळे ट्रेलर पासिंगचा मार्ग मोकळा झाला आहे. कायदा रद्द करण्यासाठी कोल्हापूरच्या ट्रेलर उद्योजकांचे मोठे योगदान आहे.

ट्रेलरमधून शेतमालाची वाहतूक करताना अपघात होतात म्हणून २००८ साली ट्रेलरला ब्रेक यंत्रणा पाहिजे, असा अध्यादेश केंद्र शासनाने काढला होता आणि देशातील ट्रेलरचे पासिंग बंद झाले.ट्रेलरचे पासिंग पूर्ववत सुरू व्हावे यासाठी ट्रेलर उद्योजकांनी तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार यांची भेट घेतली. त्यावेळी तात्पुरते पासिंग सुरू झाले. नंतर ट्रॅक्टर कंपन्यांचे अधिकारी, ट्रेलर उद्योजक, केंद्रीय वाहतूक सचिव यांची दिल्लीत बैठक झाली. यामध्ये ट्रॅक्टरला ब्रेक सप्लाय पॉर्इंट काढण्याचे ठरले, पण दोन वर्षानंतरही ट्रॅक्टरला ब्रेक सप्लाय पॉर्इंट काढला गेला नाही.

अखेर ट्रेलर उद्योजकांनी केंद्रीय अवजड वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केल्याने पुन्हा तात्पुरते पासिंग सुरू झाले. तरीही उद्योजकांनी गडकरी यांना ट्रेलरला ब्रेक यंत्रणा बनवणे ही बाबच किचकट, चुकीची व खर्चिक कशी आहे, हे सांगितले. तर खासदार धनंजय महाडिक यांना कायदा रद्द करण्याबाबत विनंती केली.

मंत्री नितीन गडकरी, खासदार महाडिकांनी लोकसभेत ट्रेलरला ब्रेक यंत्रणा बनवण्याचा कायदा रद्द करण्याची विनंती केली. त्यानुसार २० सप्टेंबरला लोकसभेत हा कायदा रद्द करण्याबाबत देशातून हरकती मागविल्या. त्यानुसार २० नोव्हेंबर रोजी ९७/३ हा कायदा रद्द करण्यात आला. याचा अध्यादेश नुकताच केंद्र शासनाने काढला आहे. त्यामुळे देशातील ट्रेलर उद्योजकांचा आणि शेतकºयांचा ट्रेलर पासिंगचा प्रश्न मार्गी लागला आहे. 

गेली नऊ वर्षे ट्रेलरचे पासिंग पूर्ववत सुरू व्हावे यासाठी आम्ही कोल्हापूर ते दिल्ली वारंवार वाºया केल्या. मंत्री नितीन गडकरी, तत्कालीन कृषिमंत्री शरद पवार, खासदार धनंजय महाडिक यांच्यामुळे आणि कोल्हापूरच्या ट्रेलर उद्योजकांच्यामुळे हे शक्य झाले आहे.- युवराज चौगुले, संपर्कप्रमुख आयमाट्रेलर पासिंगसाठी कोल्हापूरचे उद्योजक झटत होतो. या लढ्याला अखेर यश आले आहे. सर्वच लोकप्रतिनिधींनी सहकार्य केले. यामुळे शेतकºयांचा मोठा फायदा झाला आहे. आता लवकरच पासिंग पूर्ववत सुरू होईल.- बाबूराव हजारे, ज्येष्ठ उद्योजक, विवेक इंजिनिअरिंगपासिंग पूर्ववत सुरू करावे यासाठी अ‍ॅग्रिकल्चरल इम्प्लिमेंट असोसिएशन (आयमा) आणि ट्रेलर उद्योजक यांचे मोठे योगदान आहे. आमच्या लढ्याला यश आले.- कृष्णात पाटील, माजी अध्यक्ष आयमा