शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘४० घड्याळी तासांचे’ परिपत्रक रद्द करा

By admin | Updated: February 10, 2015 00:31 IST

‘सुटा’ची मागणी : शिक्षण सहसंचालक कार्यालयावर ‘सुटा’चा मोर्चा; गुरुवारी करणार चर्चा

कोल्हापूर : ‘शासन आदेशाची पायमल्ली करणाऱ्या शिक्षण सहसंचालकांचा धिक्कार असो’, ‘वुई वाँट जस्टिस’ अशा घोषणा देत ४० घड्याळी तास उपस्थित राहण्याबाबतचे अधिकारबाह्य परिपत्रक रद्द करण्यासह अन्य मागण्यांसाठी शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघाने (सुटा) विभागीय उच्चशिक्षण सहसंचालक कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला. यावेळी मुंबईत असलेल्या शिक्षण सहसंचालकांनी गुरुवारी (दि. १२) या परिपत्रकाबाबत चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाला दिले.शिक्षण संचालक (पुणे) आणि शिक्षण सहसंचालक (कोल्हापूर) यांनी प्राध्यापकांच्या एकूण कार्यभारासंबंधी विद्यापीठ अनुदान मंडळाच्या (युजीसी) नियमांचा चुकीचा व मनमानी अर्थ लावला आहे. त्याद्वारे त्यांनी प्राध्यापकांनी महाविद्यालयांमध्ये ४० घड्याळी तास उपस्थित राहावे, असे परिपत्रक काढले आहे. त्याच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला. राजारामपुरीतील जनता बझार येथून दुपारी साडेतीनच्या सुमारास मोर्चा सुरू झाला. राजारामपुरी मुख्य मार्ग, सायबर चौकामार्गे शिक्षण सहसंचालक कार्यालयाच्या आवारात आला. कार्यालयाच्या प्रवेशद्वारांनी आंदोलनकर्त्या प्राध्यापकांना पोलिसांनी रोखले. याठिकाणी ‘४० घड्याळी तासांचे परिपत्रक रद्द झालेच पाहिजे’, ‘बेकायदा परिपत्रक लादणाऱ्या प्राचार्यांचा धिक्कार असो’, अशा घोषणा देत अर्ध्या तासांहून अधिक वेळ ठिय्या मारला. आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने शिक्षण सहसंचालक कार्यालयातील साहाय्यक लेखाधिकारी गोपाळ निगवेकर यांना निवेदन दिले. आंदोलनात ‘सुटा’चे अध्यक्ष प्रा. एन. के. मुल्ला, कार्यालय कार्यवाह प्रा. एस. ए. बोजगर, प्रमुख कार्यवाह आर. एच. पाटील, सुधाकर मानकर, यू. ए. वाघमारे,टी. व्ही. स्वामी, आर. जी. पाटील आदींसह कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील सुमारे आठशे प्राध्यापक सहभागी झाले होते. दरम्यान, परिपत्रक रद्द होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे उपाध्यक्ष आर. डी. धमकले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)‘सुटा’च्या अन्य मागण्याशासन आदेश, युजीसी अधिसूचनेतील तरतुदी, विद्यापीठ कायदा व विद्यापीठाचे आदेश धाब्यावर बसवून मनमानी व बेजबाबदार कारभार करणाऱ्या नूतन शिक्षण संचालक डॉ. डी. आर. माने यांची या प्रकरणी चौकशी करावी. या दरम्यान डॉ. माने यांना निलंबित करावे.विद्यापीठाच्या स्वायतत्तेस सुरूंग लावणाऱ्या व विद्यापीठाच्या आदेशांची उघडपणे अवहेलना करणाऱ्या विद्यापीठ अधिकार मंडळांवरील प्राचार्यांनी आपल्या सर्व पदांचे राजीनामे द्यावेत.