शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

शिवसेनेकडून ‘कोल्हापूर’ची ‘नियोजन’वर बोळवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 01:07 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात कोल्हापूरला ठेंगाच मिळाला आहे. राजेश क्षीरसागर यांना राज्य ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात कोल्हापूरला ठेंगाच मिळाला आहे. राजेश क्षीरसागर यांना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्षपद देऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘दुधाची तहान ताकावर भागवली’ आहे. दोन खासदार आणि सहा आमदार दिले, अजून कोल्हापूरने काय केले पाहिजे? तेव्हा पक्षात सन्मान मिळू शकेल, अशी विचारणा ठाकरे यांच्याकडे शिवसैनिकांमधून केली जात आहे.कोल्हापूर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. कोल्हापूर शहरात सातत्याने शिवसेनेला यश मिळाले असले तरी सहकाराचे जाळे असलेल्या ग्रामीण भागात मात्र शिवसेनेला लोकांनी स्वीकारले नव्हते. पण सन २००९ ला ‘करवीर’मधून चंद्रदीप नरके आणि ‘हातकणंगले’मधून डॉ. सुजित मिणचेकर यांनी काँग्रेसच्या बड्या नेत्यांना पराभूत करत विधानसभेत प्रवेश केला तर शहरातून काँग्रेसचे मालोजीराजे यांचा राजेश क्षीरसागर यांनी पराभव केला. त्यानंतर सन २०१४ निवडणुकीत स्वतंत्र लढूनही सेनेचे दहापैकी सहा आमदार विजयी झाले. त्यामुळे कोल्हापूरला एक मंत्रिपद मिळणार, याची खात्री होती. मंत्रीपदासाठी सुजित मिणचेकर, चंद्रदीप नरके व राजेश क्षीरसागर यांनी फिल्डिंग लावली होती. पण २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांच्या पराभवाचे उद्धव ठाकरे यांच्या मनातील शल्यच मंत्रिपदाच्या आड येत असल्याचे शिवसेना नेते खासगीत सांगत होते. त्यामुळे सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेच्या आमदारांसह जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव यांच्या टीमने आक्रमक प्रचार यंत्रणा राबवत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार केले. संजय मंडलिक व धैर्यशील माने यांच्या रूपाने शिवसेनेला दोन खासदार मिळाले. त्यामुळे या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसैनिकांच्या आशा वाढल्या होत्या. रविवारी विस्तारात मात्र कोल्हापूरकरांना उद्धव ठाकरे यांनी ‘कात्रजचा घाट’ दाखविल्याने नाराजी व्यक्त होत आहे.राजेश क्षीरसागर यांना जरी कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असला तरी प्रत्यक्ष मंत्री आणि दर्जा असणे वेगळे आहे. यापूर्वी कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात सन २००९ मध्ये राष्टÑवादीचे दिवंगत नेते बाबासाहेब कुपेकर यांना नियोजन आयोगाचे कार्यकारी अध्यक्षपद देत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी कुपेकर यांचे बंड थंड केले होते.ठाकरेंचे विधान परिषदेवरचे प्रेम कायमसत्ता स्थापन करताना शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या बारा मंत्र्यांपैकी निम्म्या जागांवर विधान परिषदेच्या सदस्यांना संधी दिल्याने लोकांमधून निवडून गेलेल्या प्रतिनिधींमध्ये असंतोष होता. आताही एक पद राष्टÑवादीतून आलेले जयदत्त क्षीरसागर यांना, तर दुसरे यवतमाळमधून विधान परिषदेवर गेलेले तानाजी सावंत यांना देऊन ठाकरे यांनी विधान परिषदेवरचे प्रेम कायम राखल्याची चर्चा आहे.विभागनिहाय बजेटचे नियोजन करणेअर्थमंत्री प्रत्येक विभागाला बजेट देतात, त्याच्या नियोजनाची जबाबदारी या ‘नियोजन’ मंडळावर असते. क्षीरसागर कार्याध्यक्ष म्हणून जादा बजेट आणू शकतात.शिवसेनेकडून आतापर्यंत कोल्हापूरला ही पदे मिळालीसंजय पवार, उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा)- आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळ.वैशाली क्षीरसागर, कोषाध्यक्ष - पश्चिम महाराष्टÑ देवस्थान समितीविजय देवणे, संचालक - उर्वरितविकास महामंडळशिवाजी जाधव, सदस्य - पश्चिम महाराष्टÑ देवस्थान समिती.सुनील शिंत्रे, सदस्य - खनिकर्म महामंडळमुरलीधर जाधव, सदस्य - हातमाग महामंडळ