शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

corona virus -सोशल मीडियावर मेसेजचा धुरळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 16:09 IST

तिरडी स्मशानात घेऊन जाताना ‘येतोस का डबल सीट?’ अशी चेष्टा करण्यात माहीर असलेल्या कोल्हापूरकरांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या कर्फ्यूलाही सोडले नाही. ‘आलाय कोरोना तर घरात बसा ना!’ असा संदेश सर्वत्र धुमाकूळ घालत असताना कोल्हापूरकरांनी मात्र सुट्टी आणि सुग्रास भोजनाचा आनंद घेत मोबाईलवरील संदेशांतून धुरळा उडवून दिला.

ठळक मुद्देसोशल मीडियावर मेसेजचा धुरळा‘आलाय कोरोना तर घरात बसा ना!’

कोल्हापूर : तिरडी स्मशानात घेऊन जाताना ‘येतोस का डबल सीट?’ अशी चेष्टा करण्यात माहीर असलेल्या कोल्हापूरकरांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या कर्फ्यूलाही सोडले नाही. ‘आलाय कोरोना तर घरात बसा ना!’ असा संदेश सर्वत्र धुमाकूळ घालत असताना कोल्हापूरकरांनी मात्र सुट्टी आणि सुग्रास भोजनाचा आनंद घेत मोबाईलवरील संदेशांतून धुरळा उडवून दिला.

‘एक दिवस घरात बसा; नाहीतर पुढचे तेरा दिवस भावकीच घरात बसायला येईल,’ असे मेसेज पाठवून कोल्हापूरकरांच्या चेष्टेचा नाद करायचा नाही, हेच दाखवून दिले.रविवारी देशभर कर्फ्यू असल्याने नागरिकांना सक्तीने घरात बसावे लागले. पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्त ठेवल्याने उंबऱ्याबाहेर कुणालाच पडता आले नाही. बाहेर काय चाललंय हे एक तर टीव्ही आणि हातातील मोबाईलवरील सोशल मीडियावरून कळत होते. फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अ‍ॅपच्या माध्यमातून लोकांनी संदेशांची देवाणघेवाण केली.

कोरोनाची धास्ती मनात आहेच; पण तिलाही चेष्टेचा सूर लावण्याचा कल प्रत्येक संदेशातून दिसत होता. मानवी स्वभावातील व्यंगांवर अचूक बोट ठेवणारे, कोरोनापासून सावध करणाºया मेसेजबरोबरच गमतीशीर संदेशांनी चेहऱ्यावर हास्य फुलविले.घरातच बसावे लागल्याने अनेकांनी ‘घरात बसून आहे तर ‘बिग बॉस’मध्ये असल्यासारखे वाटायला लागलंय. नुसती भांडणं आणि टोमणे सुरू आहेत घरात,’ अशी मिश्किल टिप्पणी केली. टाळ्या वाजविण्याच्या पंतप्रधानांच्या आवाहनावर ‘एक टाळी तिच्यासाठीपण वाजवा, जी सकाळी उठल्यापासून तुमच्यासाठी गॅसजवळ उभी आहे,’ असे सांगून महिलांची कदर करण्याचा सल्लाही दिला.

‘कोणी गेल्यावर गाव बंद ठेवलेले अनेकदा पाहिलंय; पण कोणी जाऊ नये म्हणून गाव बंद झालेले आज पहिल्यांदा पाहिलंय,’ असे सांगत यामागची दाहकताही समोर आणली. ‘ही जीवनातील अशी पहिली शर्यत आहे, जिथे थांबणारा जिंकणार आहे,’ असे सांगून वेळ आणि काळ आल्यावर कसे बदलते, यावर अचूक भाष्य केले. ‘जनता कर्फ्यू रात्री नऊ वाजेपर्यंत आहे, त्यानंतर भारत वर्ल्ड कप जिंकल्यासारखं बाहेर नका पडू नका,’ असे सांगत कोल्हापूरकरांना गमतीतूनच टोमणेही मारले.)

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkolhapurकोल्हापूर