शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
3
अर्चना तिवारी चतुर निघाली! ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
4
१ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू
5
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
6
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
7
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
8
फैजल खानचं आमिरला DNA चाचणी करण्याचं आव्हान, म्हणाला, "रीनाशी लग्न केलं तेव्हाच..."
9
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
10
नोकरीची उत्तम संधी! एलआयसीमध्ये विविध पदांची भरती, पगार एक लाखापेक्षा अधिक
11
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
12
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
13
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
14
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
17
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
18
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
19
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
20
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!

खरेदीदारांकडूनच अडत घेण्याचे आदेश

By admin | Updated: December 21, 2014 00:12 IST

शेतकऱ्यांना दिलासा : पणन संचालकांचा नवा आदेश लागू

प्रकाश पाटील / कोपार्डे गुळासाठी तीन टक्के, कांद्यासाठी अडते अथवा दलालांना द्यावी लागणारी अडत आता खरेदीदाराकडून वसूल करण्याचा आदेश पणन संचालकांकडून बाजार समितीला प्राप्त झाला आहे. यामुळे गूळ उत्पादक शेतकऱ्यांचे १० ते १२ कोटी, तर कांदा उत्पादकांचे १८ ते २० कोटी वार्षिक वाचणार आहेत. बाजार समितीमध्ये शेतकरी आपला शेतीमाल विकण्यासाठी घेऊन जातो, तेव्हा तो सरळ ग्राहकांना अथवा व्यापाऱ्यांना विकत नसे, तर दलालामार्फत अथवा अडत्याकरवी त्याची विक्री व्यापाऱ्यांना होत असे. त्या बदल्यात त्या मालाच्या पैशाची हमी अडत्यावर असे. मात्र, गूळ व काही शेतीमालावरील नियमन रद्द करत अडतही रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने शेतकऱ्यांना पैशाची हमी व गूळ व कांद्यासारख्या नाशवंत मालासाठी गोदाम मिळत नसल्याने अडचणीत आला होता. अलीकडेच शासनाने नियमन पुन्हा सुरू केले आहे. तसेच आजच अडत व दलाली-बाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन गूळ उत्पादक व शेतकऱ्यांना दिलासा आहे. पणन संचालकांचा बाजार समितीला सायंकाळी सहा वाजता गूळ व कांद्याबद्दल शेतकऱ्यांकडून आकारण्यात येणारी अडत अथवा दलाली शेतकऱ्यांकडून न घेता ती खरेदीदारांकडून म्हणजे व्यापाऱ्यांकडून वसूल करावी, अशा आदेशाचा मेलच बाजार समितीला प्राप्त झाला आहे. शेतकऱ्यांचे १० ते १२ कोटी रुपये वाचणार दरवर्षी बाजार समितीमध्ये गुळाची ३०० कोटींची उलाढाल होते. गुळासाठी अडते किंवा दलाल तीन टक्केप्रमाणे अडत अथवा दलाली घेतात. याचा विचार केल्यास किमान १० ते १२ कोटी रुपये शेतकऱ्यांचे गुळासाठी वाचणार आहेत, तर कांद्याची उलाढाल ४०० कोटींची होत असल्याने यामध्ये सहा टक्केप्रमाणे किमान १८ ते २० कोटी अडत अथव दलाली शेतकऱ्यांची वाचणार आहे. शासनाने प्रथम नियमन कायम करून विक्री झालेल्या शेतमालाच्या पैशाला हमी तर अडत व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याच्या आदेशाने गूळ दर घसरणीच्या काळात मोठा दिलासा मिळाला आहे.