शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

खरेदीदारांकडूनच अडत घेण्याचे आदेश

By admin | Updated: December 21, 2014 00:12 IST

शेतकऱ्यांना दिलासा : पणन संचालकांचा नवा आदेश लागू

प्रकाश पाटील / कोपार्डे गुळासाठी तीन टक्के, कांद्यासाठी अडते अथवा दलालांना द्यावी लागणारी अडत आता खरेदीदाराकडून वसूल करण्याचा आदेश पणन संचालकांकडून बाजार समितीला प्राप्त झाला आहे. यामुळे गूळ उत्पादक शेतकऱ्यांचे १० ते १२ कोटी, तर कांदा उत्पादकांचे १८ ते २० कोटी वार्षिक वाचणार आहेत. बाजार समितीमध्ये शेतकरी आपला शेतीमाल विकण्यासाठी घेऊन जातो, तेव्हा तो सरळ ग्राहकांना अथवा व्यापाऱ्यांना विकत नसे, तर दलालामार्फत अथवा अडत्याकरवी त्याची विक्री व्यापाऱ्यांना होत असे. त्या बदल्यात त्या मालाच्या पैशाची हमी अडत्यावर असे. मात्र, गूळ व काही शेतीमालावरील नियमन रद्द करत अडतही रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतल्याने शेतकऱ्यांना पैशाची हमी व गूळ व कांद्यासारख्या नाशवंत मालासाठी गोदाम मिळत नसल्याने अडचणीत आला होता. अलीकडेच शासनाने नियमन पुन्हा सुरू केले आहे. तसेच आजच अडत व दलाली-बाबतचा महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन गूळ उत्पादक व शेतकऱ्यांना दिलासा आहे. पणन संचालकांचा बाजार समितीला सायंकाळी सहा वाजता गूळ व कांद्याबद्दल शेतकऱ्यांकडून आकारण्यात येणारी अडत अथवा दलाली शेतकऱ्यांकडून न घेता ती खरेदीदारांकडून म्हणजे व्यापाऱ्यांकडून वसूल करावी, अशा आदेशाचा मेलच बाजार समितीला प्राप्त झाला आहे. शेतकऱ्यांचे १० ते १२ कोटी रुपये वाचणार दरवर्षी बाजार समितीमध्ये गुळाची ३०० कोटींची उलाढाल होते. गुळासाठी अडते किंवा दलाल तीन टक्केप्रमाणे अडत अथवा दलाली घेतात. याचा विचार केल्यास किमान १० ते १२ कोटी रुपये शेतकऱ्यांचे गुळासाठी वाचणार आहेत, तर कांद्याची उलाढाल ४०० कोटींची होत असल्याने यामध्ये सहा टक्केप्रमाणे किमान १८ ते २० कोटी अडत अथव दलाली शेतकऱ्यांची वाचणार आहे. शासनाने प्रथम नियमन कायम करून विक्री झालेल्या शेतमालाच्या पैशाला हमी तर अडत व्यापाऱ्यांकडून वसूल करण्याच्या आदेशाने गूळ दर घसरणीच्या काळात मोठा दिलासा मिळाला आहे.