शहरं
Join us  
Trending Stories
1
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
2
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
3
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
6
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
7
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
8
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
9
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
10
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
11
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
12
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
13
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
14
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
15
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
16
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
17
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
18
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
19
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
20
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     

परीक्षा विभागावर दोन लाख विद्यार्थ्यांचा भार

By admin | Updated: August 10, 2016 01:09 IST

शिवाजी विद्यापीठ : यंत्रणा उभारण्यास कमी अवधी; संगणक प्रणाली सुधारावी लागणार

कोल्हापूर : अतिरिक्त सुमारे दोन लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचा भार पेलण्याचे आव्हान आता शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागासमोर उभारले आहे. ‘एमकेसीएल’ने विद्यापीठासमवेत काम करणे थांबविल्यामुळे परीक्षा विभागावर संबंधित विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्याची जबाबदारी पडली आहे.दरवर्षी विद्यापीठाकडून विविध १२२ अभ्यासक्रमांच्या सुमारे साडेतीन लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतल्या जातात. त्यांतील अभियांत्रिकी, विधि (लॉ), विज्ञान, आदींसह काही कमी कालावधीच्या शंभर अभ्यासक्रमांच्या दीड लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा या विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून घेण्यात येत होत्या. यासाठी विद्यापीठाच्या संगणक प्रणालीचा वापर केला जात होता. उर्वरित बी. ए., बी. कॉम., बी. एस्सी., बीबीए, बीसीए, आदी विविध २२ अभ्यासक्रमांच्या तृतीय वर्षांतील दोन लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा ‘एमकेसीएल’च्या संगणक प्रणालीच्या माध्यमातून घेण्यात येत होत्या. मात्र, ३१ जुलैपासून ‘एमकेसीएल’ने विद्यापीठासमवेत काम करणे थांबविले आहे. त्यामुळे संबंधित दोन लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचा भार विद्यापीठाच्या परीक्षा विभागावर पडला आहे. या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे आव्हान पेलण्यासाठी विद्यापीठाला संगणक प्रणालीपासून माहिती व तंत्रज्ञानाचा अद्ययावत कक्ष कार्यान्वित करण्याची यंत्रणा उभारावी लागणार आहे. विद्यापीठाच्या पहिल्या सत्रातील परीक्षा आॅक्टोबरपासून सुरू होतात. त्यामुळे संबंधित परीक्षा घेण्याची यंत्रणा विद्यापीठाला कमी कालावधीत उभारावी लागणार आहे. एमकेसीएल आणि विद्यापीठ एकत्रितपणे परीक्षा घेऊनही काही वेळा प्रवेशपत्र न मिळणे, चुकीच्या प्रश्नपत्रिकांचे वितरण होणे, आदी स्वरूपातील प्रकार घडले आहेत.हे प्रकार टाळण्याच्या दृष्टीने विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला काम करावे लागणार आहे. त्यासाठी विद्यापीठाच्या प्रशासनासह विविध घटकांनी परीक्षा विभागाला आवश्यक त्या स्वरूपातील मदतीचा हात देणे महत्त्वाचे ठरणार आहे. (प्रतिनिधी) प्रशासनाला हे करावे लागणारपरीक्षा विभागाला सक्षम करण्याचे काम प्रशासनाला करावे लागणार आहे. त्यात सध्याची संगणक प्रणालीतील त्रुटींची पूर्तता करून ती अधिक सक्षम करणे; प्रश्नपत्रिकांचे आॅनलाईन वितरण, आदी कामकाजासाठी अद्ययावत माहिती व तंत्रज्ञान (आयटी) कक्षाची उभारणी करणे. आयटीच्या कामकाजात प्रशिक्षित कर्मचारी देणे तसेच यासाठी आवश्यक ती व्यवस्था उभारण्याची आवश्यकता आहे. ‘एमकेसीएल’ने विद्यापीठासमवेत काम करणे थांबविल्यामुळे अचानकपणे संबंधित दोन लाख विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचा भार विद्यापीठावर पडला आहे. तो पेलण्यासाठी विद्यापीठ सज्ज झाले आहे. त्यानुसार परीक्षा विभागाकडून याबाबतचा कृती आराखडा तयार केला जात आहे. सध्या ‘एमकेसीएल’कडून विद्यार्थ्यांची माहिती बिनचूकपणे मिळविण्याचे महत्त्वाचे काम आहे.- महेश काकडे, परीक्षा नियंत्रक, शिवाजी विद्यापीठ