शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

आरोग्यदायी गुढी उभारू, कोरोनाला हरवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:21 IST

संदीप बावचे : जयसिंगपूर : कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने सरकारने ब्रेक द चेन लागू करून कडक नियम ...

संदीप बावचे :

जयसिंगपूर : कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागल्याने सरकारने ब्रेक द चेन लागू करून कडक नियम सुरू केले आहेत. या नियमांचे सर्वांनी पालन करण्याची गरज आहे. कोरोनाचा वाढता प्रसार प्रशासनासमोर चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील जनतेने कोरोनाला हरविण्यासाठी नियम पाळून आरोग्याची गुढी उभारावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

गतवर्षी शिरोळ तालुक्यात कोरोनाचा पहिला टप्पा मे महिन्यात सुरू झाला होता. बारा रुग्ण आढळल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. प्रशासन, आरोग्य विभागाची धावपळ उडाली होती. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यांत कोरोनाने कहर केला होता. त्यामुळे कोरोनाचा आलेख पाहता नोव्हेंबरपर्यंत ४२०० कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. दरम्यान, पुन्हा एकदा कोरोनाचा प्रसार वाढू लागल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे. ब्रेक द चेनसाठी कडक नियम लागू करण्यात आले आहेत. शाळा, महाविद्यालये पुन्हा बंद आहेत. त्यामुळे ग्रामसमित्यांनी पुन्हा एकदा सक्रिय होऊन कोरोनाला वेशीवरच थोपविण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे.

मास्कचा वापर, सामाजिक अंतर व सॅनिटायझरचा वापर नागरिकांनी केला पाहिजे. कोरोनाची दुसरी लाट उंबरठ्यावर आली आहे. त्यामुळे शिरोळ तालुका हॉटस्पॉट होण्यापूर्वीच प्रशासन व लोकप्रतिनिधींना एकत्र येऊन काम करावे लागणार आहे. शिवाय, रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार थांबविण्याची देखील गरज आहे.

-------------

चौकट - लसींची गरज

कोरोना लसीकरणासाठी प्रशासनाने व्यापक स्तरावर जनजागृती केली होती. यामुळे नागरिकदेखील लसीकरणासाठी पुढे येऊ लागले होते. मात्र, मर्यादित लसीचे डोस मिळत असल्याने आरोग्य विभागाला अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे लसीचा पुरवठा महत्त्वाचा ठरणार आहे.

चौकट - ग्रामसमित्या नियुक्तीचे आदेश

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी ग्रामसमित्या स्थापित करण्यात आल्या आहेत. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, आशा स्वयंसेविका, धान्य दुकानदार, संस्थांचे अध्यक्ष, शासकीय व खासगी डॉक्टर्स, लोकप्रतिनिधी, तरुण मंडळे, बचत गट, कोतवाल, पोलीस पाटील यांचा यामध्ये समावेश आहे.