शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बजेट प्रतिक्रिया (कृषी)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:14 IST

केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सगळे प्रयोग शेतीवरच केले जात असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पाच-सहा ...

केंद्रात भाजपचे सरकार आल्यापासून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सगळे प्रयोग शेतीवरच केले जात असल्याने शेतकरी मेटाकुटीला आला आहे. पाच-सहा वर्षे केवळ शेतीमालाला दीडपट भावाचे गाजर केंद्र सरकारने दाखवलेले आहे. प्रत्यक्षात काहीच झालेले नाही. उलट शेतीमाल कवडीमोल दराने विक्री करावा लागत आहे. एकीकडे बाजार समित्या राष्ट्रीय कृषी बाजाराशी जोडण्याची भाषा केली जाते. मात्र स्थानिक बाजार समित्यांमध्ये त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा कोठे आहेत? केंद्र सरकारचे बजेट म्हणजे केवळ फसवणूक असून शेतीमालाला दीडपट राहू दे, आधारभूत तरी किंमत द्या, एवढीच अपेक्षा आहे.

- बाबासाहेब देवकर (शेतकरी, गाडेगोंडवाडी)

पेट्रोल, डिझेलच्या दरात मोठी वाढ झाल्याने त्याचा फटका ग्राहकांना बसत आहे. केंद्र सरकार या बजेटमध्ये याबाबत काही तरी भाष्य करेल, अशी अपेक्षा होती. त्याचबरोबर जीएसटीसह इतर करांबाबत दिलासा मिळेल, असे वाटत होते, मात्र केंद्राच्या बजेटमधून अपेक्षाभंग झाला आहे.

- सूरज आडनाईक (व्यापारी, यवलूज)

केंद्राचे बजेट म्हणजे निव्वळ दिशाभूल आहे. यातून सामान्य माणसाला काहीच दिलासा नाही. कोरोनामुळे सामान्य माणसाचे जगणे मुश्कील झाले, त्यासाठी अपेक्षित असे काहीच यात दिसत नाही.

- प्रकाश पाटील (आमजाई व्हरवडे)