शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

अर्थसंकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:28 IST

गेली वर्षभर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मोर्चे, आंदोलने केली, मात्र राज्य शासनाच्या अर्थसंकल्प पाहिला तर काहीच दिसत नाही. इंधन दरवाढ, नियमित ...

गेली वर्षभर शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी मोर्चे, आंदोलने केली, मात्र राज्य शासनाच्या अर्थसंकल्प पाहिला तर काहीच दिसत नाही. इंधन दरवाढ, नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदानाचा साधा उल्लेखही झाला नाही. कोणाचेही सरकार आले तरी शेतकऱ्यांच्या पदरीत निराशाच येते. प्रत्येकजण शेतकऱ्यांना ठेंगाच दाखवतो.

- जालंदर पाटील (प्रदेशाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना)

------------------------------

शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत लाभार्थींना गाय, म्हशींचा पक्का गोठा बांधण्यासाठी, शेळीपालन व कुकुटपालनाची शेड बांधण्यासाठी तसेच कंपोस्टिंगकरता अनुदान दिले जाणार आहे. कृषीपंप वीजजोडणी धोरण यामध्ये गेली पाच वर्षे पैसे भरून शेतकरी वीज जोडणी मिळेल या आशेवर बसले होते ती प्रक्रिया मागील सरकारनी किचकट आणि खर्चिक केली होती ती सुलभ केली आहे. वीज बिल थकबाकी ५० टक्के माफ केली आहे.

थोडक्यात शेतकरीवर्गाला ‘थोडी खुशी, थोडा गम’ असा हा अर्थसंकल्प आहे.

- विक्रांत पाटील (जिल्हाध्यक्ष, इरिगेशन फेडरेशन)

------------------------------

साखर उद्योगाचा अपेक्षाभंग

महाराष्ट्रातील साखर कारखान्यांकडून राज्यास ३००० ते ३५०० काेटींचे उत्पन्न निरनिराळ्या कराच्या रूपाने मिळते. त्यामुळे आर्थिक अडचणींतील साखर उद्याेगाकडून या अर्थसंकल्पाकडून काही आर्थिक तरतुदींबाबत अपेक्षा हाेत्या पण त्या एकदम फाेल ठरल्या आहेत.

विशेषकरून मागील ३ वर्षांमध्ये घेतलेल्या निरनिराळ्या कर्जावरील राज्य शासनाकडून देय असणाऱ्य व्याजाच्या रकमांची तरतूद, राज्यांत एकूण निर्माण हाेणाऱ्या १०० लाख टन साखरेपैकी राज्यांत फक्त २५ लाख टनच साखर खपते. उर्वरित साखर ईशान्य पूर्वेकडील राज्यांना पाठविली जाते. पण वाहतुकीचा खर्च २०० ते २५० प्रतिक्विंटल येत असलेने व उत्तर प्रदेशमधील साखर स्वस्त पडते. तेथील कारखान्यांनी ही बाजारपेठ काबीज केली आहे. परिणामी महाराष्ट्रातील कारखान्यांचे साखर साठे वाढून व्याज वाढत आहे. एफआरपीपोटी २५०० ते ३००० काेटींच्या रक्कमा थकल्या आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी राज्य शासनाकडून अंतर्गत साखर वाहतूक अनुदान म्हणून २०० रुपये प्रतिक्विंटल जाहीर हाेणे अपेक्षित हाेते. त्याचा विचार झालेला नाही, दिवसेंदिवस ऊसताेडणी मजुरांचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे मशीन खरेदीसाठी पूर्वीप्रमाणे अनुदान रक्कम जाहीर हाेणे अपेक्षित हाेते.

- पी. जी. मेढे (साखर उद्योग अभ्यासक)