शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शोषण व्यवस्थेला रोखण्यासाठी बुद्धांच्या विचारांची गरज --: श्रीमंत कोकाटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 14:56 IST

तर बुद्धांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविले पाहिजेत. निर्मिती विचारमंचचे अनिल म्हमाने म्हणाले, ‘देश अंधारलेल्या परिस्थितीतून जात आहे; त्यामुळे सर्वांनी मतभेद बाजूला ठेऊन एकजूट होण्याची वेळ आली आहे.

ठळक मुद्देकोकाटे म्हणाले, ‘गौतम बुद्ध ही सामान्य व्यक्ती नसून, जगाचा महामानव, रिअल हिरो आहे. जगात जात, वंश, धर्म यावरून संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष रोखायचा असेल, तसेच जगाचा नाश होण्यापासून वाचवायचे असेल, तर बुद्धांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविले पाहिजेत.

कोल्हापूर : अंधश्रद्धा वाढल्यानंतर चमत्कारावर विश्वास ठेवणाऱ्यांची संख्येत भर पडत जाते. यातून शोषण व्यवस्थेला खतपाणी घातले जाते. अशा वाढत्या शोषणव्यवस्थेला जर वेळीच रोखायचे असेल, तर बुद्धांचे विचार आत्मसात केले पाहिजे, असे प्रतिपादन पुणे येथील इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी रविवारी केले.

धम्मभवन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने दुस-या धम्मविचार साहित्य व संस्कृती संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांची निवड झाली आहे. शाहू स्मारक भवन येथील मिनी हॉलमध्ये सोमवारी निवडीबद्दल ट्रस्टच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अनिल म्हमाने होते. संभाजी ब्रिगेडचे हिंदूराव हुजरे-पाटील, प्रा. करुणा मिणचेकर, विमल पोखणीकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोकाटे म्हणाले, ‘गौतम बुद्ध ही सामान्य व्यक्ती नसून, जगाचा महामानव, रिअल हिरो आहे. जगात जात, वंश, धर्म यावरून संघर्ष सुरू आहे. हा संघर्ष रोखायचा असेल, तसेच जगाचा नाश होण्यापासून वाचवायचे असेल, तर बुद्धांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचविले पाहिजेत.निर्मिती विचारमंचचे अनिल म्हमाने म्हणाले, ‘देश अंधारलेल्या परिस्थितीतून जात आहे; त्यामुळे सर्वांनी मतभेद बाजूला ठेऊन एकजूट होण्याची वेळ आली आहे. तसेच विशिष्ट शक्तींना रोखण्यासाठी विचारवंतांसोबत राहणे रस्त्यावरील कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. यावेळी हिंदूराव हुजरे-पाटील, प्रा. करुणा मिणचेकर यांनी मनोगत व्यक्त केले. निर्मिती विचारमंचच्या संवाद प्रकाशनच्या वतीने प्रा. कपिल राजहंस लिखित ‘भीमा-कोरेगाव आणि इतर संकीर्ण लेख’ या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी दशरथ माने, प्रवीण पाटील, चैतल पाटील, प्रबुद्ध कांबळे, मानसिंग देसाई, बाबा महाडिक, सागर भोसले उपस्थित होते.----------------------------कोल्हापूरकरांचे एकदा ठरले की ठरलेकोल्हापूरकरांनी राज्यातच नव्हे, तर देशात वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांचे एकदा ‘ठरले की ठरले’; त्यासाठी ते काहीही करतात, असे कोकाटे यांनी आवर्जून सांगितले. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूर