शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

‘आजरा’च्या रणांगणात इच्छुकांची भाऊगर्दी

By admin | Updated: April 29, 2016 00:52 IST

छाननीनंतर २२२ अर्ज : थांबवायचे कोणाला? नेत्यांपुढे बंडाचा पेच

आजरा : आजरा साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी छाननीनंतर २२२ उमेदवारांचे २६७ उमेदवार अर्ज राहिल्याने २१ जागांसाठी उमेदवार निवडीचा पेच गटनेत्यांसमोर असून उमेदवारी नाकारली तर ‘नाराज’ इच्छुक विरोधी आघाडीला रसद पुरविण्याचा धोकाही दिसत आहे.कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रसची आघाडी व विरोधात अशोकअण्णा चराटी, विष्णूपंत केसरकर व मित्रपक्षांची आघाडी अशी थेट लढत होणार आहे. दोन्हीही आघाड्या नेटक्या होणार असल्याने दोन्ही आघाड्यांमधून इच्छुकांची संख्या प्रचंड आहे. बेरजेच्या राजकारणात आजपर्यंत उमेदवारी निश्चित असणाऱ्यांपैकी अनेकांचे पत्ते ऐनवेळी कट होणार आहेत.दोन्ही आघाड्यांची बऱ्यापैकी पॅनेलरचना झाली आहे. राष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रस आघाडीतून जयवंतराव शिंपी, अल्बर्ट डिसोझा, मुकुंदराव देसाई, उदय पवार, सुधीर देसाई, सदाशिव डेळेकर, श्रीमती अंजनाताई रेडेकर, बी. टी. जाधव, वसंतराव धुरे, संभाजी पाटील (हत्तीवडे), उमेश आपटे, अनिल फडके, विकास बागडी, आप्पासाहेब खेडेकर, प्रा. सुनिल शिंत्रे, एम. के. देसाई यांची उमेदवारी निश्चित आहे.विरोधी आघाडीतून अशोकअण्णा चराटी, दिगंबर देसाई, विष्णूपंत केसरकर, नागोजी पाटील, सुनिता रेडेकर, नर्मदा सावेकर, दशरथ अमृते, बापूसाहेब सरदेसाई, विनायक देसाई, आनंदराव कुलकर्णी, मलिक बुरूड, राजू सावंत, संजय पाटील आदींची उमेदवारी निश्चित आहे.दोन आघाड्यांमध्ये दोन-चार जागांची निश्चिती होणे बाकी आहे. इच्छुकांची संख्या निश्चित झालेल्या उमेदवारी वगळता १८० च्या घरात आहे. दोन्ही पॅनेलमध्ये मिळून ७ ते ८ जागांकरिता १८० जण असल्याने नेतेमंडळींना पेचात टाकण्याचे काम इच्छुकांनी केले आहे. (प्रतिनिधी)राष्ट्रवादीचा ४ मे रोजी मेळावाराष्ट्रवादी-राष्ट्रीय काँगे्रस आघाडीचा बुधवारी (४ मे) बाजार मैदान, आजरा येथे आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, संध्यादेवी कुपेकर, डॉ. नंदिनी बाभूळकर, माजी आमदार के. पी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत मेळावा आयोजित केला आहे. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर येथील जनता बँकेत प्रमुख कार्यकर्त्यांची बैठकही पार पडली. मेळाव्याचे नेटके नियोजन करण्यात येत आहे.