शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

ब्रिटिशकालीन पुलाची मोठी दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2017 01:15 IST

कोसळण्याची शक्यता : तळकोकणला - कोल्हापूरशी व्यापारी संबंध जोडणारा मलकापूर शहराजवळील शाळी नदीवरील पूल

मलकापूर : तळकोकण व कोल्हापूरशी व्यापारी संबंध जोडणारा मलकापूर शहराजवळील शाळी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाला १३० वर्षे पूर्ण झाली आहेत. महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळल्यानंतर शाहूवाडी तालुक्यातील करंजोशी, मलकापूर, वारूळ या नदीवरील ब्रिटिशकालीन पूल चर्चेत आले. तिन्ही पुलांची दुरवस्था झाली आहे. पुलावरून अवजड वाहनांची ये-जा सुरू आहे. कधीही पूल कोसळण्याची शक्यता आहे. १८२७ मध्ये इंग्रजांनी शाहूवाडी तालुक्यातील आंबाडी, शाळी व कडवी नदीवर तीन पुलांचे बांधकाम केले आहे. तीन वर्षांत हे तीन पूल वाहतुकीस खुले झाले. त्यानंतर खऱ्या अर्थाने कोल्हापूर ते कोकण अशी वाहतूक सुरू झाली. दळण वळणाची साधने वाढली. मात्र, देशातून इंग्रज जाऊन सत्तर वर्षे झाली. शाळी नदीवरील पूल अरुंद असल्याने दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंचे दगड निखळून पडले आहेत. पुलाच्या दोन्ही कमानी नदीच्या गाळाने बुजल्या आहेत, तर पुलाच्या दोन्ही बाजूला झाडेझुडपे वाढली आहेत. त्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे. वारूळ नदीवरील पुलाच्या दोन्ही कठड्यांची दुरवस्था झाली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला लोखंडी खांब लावले आहेत; मात्र ते देखील वाहनांच्या धडकेने वाकले आहेत. या पुलावर अनेक अपघात होऊन अनेकजणांना नदीच्या पाण्यात जलसमाधी मिळाली आहे, तर काहीजणांना कायमचे अपंगत्व आले आहे. करंजोशी पुलाचे कठडे पडूनदेखील संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे. या पुलाच्या मध्यभागी मोठा बोगदा पडला होता. सध्या पुलावरून अवजड वाहने गेली की पूल हालत आहे. पावसाळ्यापूर्वी पुलांची डागडुजी करणे आवश्यक आहे. या तिन्ही पुलावरून बॉक्साईट, ऊस, कोळसा, आदींची वाहतूक होत होती. मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत होती. या कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर वाहनांची संख्या जास्त आहे. त्यामुळे हे तीन पूल जीर्ण झाले आहेत. या तिन्ही पुलांना कधीही पावसाळ्यात धोका होण्याची शक्यता आहे. शासनाच्या संबंधित विभागाने पर्यायी पूल बांधावा, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांतून होत आहे.