शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार
3
'चंद्राबाबू नायडू राहुल गांधींच्या संपर्कात; म्हणून ते...', जगन मोहन रेड्डींचा मोठा दावा
4
ना विद्युतीकरणाची गरज, ना पर्यावरणाची हानी; भारताचे पहिले हायड्रोजन ट्रेन इंजिन तयार, पहा फोटो
5
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
6
२२ वर्षांच्या आनंदमयी बजाजची मोठी भरारी! तब्बल २.५ अब्ज डॉलरचा व्यवसाय सांभाळणार
7
"मी बिपाशापेक्षा उत्तम...", मृणाल ठाकूरने तुलना करताच नेटकऱ्यांनी केलं ट्रोल, म्हणाले...
8
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
9
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
10
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
11
'इंडियन आयडॉल'चा विजेता, २० वर्षांचं करिअर; अभिजीत सावंतला पहिल्यांदाच मिळाली मोठी संधी
12
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
13
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
14
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
15
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
16
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
17
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
18
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
19
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
20
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?

ब्रिटिशकालीन पुलाची मोठी दुरवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2017 01:15 IST

कोसळण्याची शक्यता : तळकोकणला - कोल्हापूरशी व्यापारी संबंध जोडणारा मलकापूर शहराजवळील शाळी नदीवरील पूल

मलकापूर : तळकोकण व कोल्हापूरशी व्यापारी संबंध जोडणारा मलकापूर शहराजवळील शाळी नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाला १३० वर्षे पूर्ण झाली आहेत. महाड येथील सावित्री नदीवरील पूल कोसळल्यानंतर शाहूवाडी तालुक्यातील करंजोशी, मलकापूर, वारूळ या नदीवरील ब्रिटिशकालीन पूल चर्चेत आले. तिन्ही पुलांची दुरवस्था झाली आहे. पुलावरून अवजड वाहनांची ये-जा सुरू आहे. कधीही पूल कोसळण्याची शक्यता आहे. १८२७ मध्ये इंग्रजांनी शाहूवाडी तालुक्यातील आंबाडी, शाळी व कडवी नदीवर तीन पुलांचे बांधकाम केले आहे. तीन वर्षांत हे तीन पूल वाहतुकीस खुले झाले. त्यानंतर खऱ्या अर्थाने कोल्हापूर ते कोकण अशी वाहतूक सुरू झाली. दळण वळणाची साधने वाढली. मात्र, देशातून इंग्रज जाऊन सत्तर वर्षे झाली. शाळी नदीवरील पूल अरुंद असल्याने दररोज वाहतुकीची कोंडी होत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूंचे दगड निखळून पडले आहेत. पुलाच्या दोन्ही कमानी नदीच्या गाळाने बुजल्या आहेत, तर पुलाच्या दोन्ही बाजूला झाडेझुडपे वाढली आहेत. त्यामुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे. वारूळ नदीवरील पुलाच्या दोन्ही कठड्यांची दुरवस्था झाली आहे. पुलाच्या दोन्ही बाजूला लोखंडी खांब लावले आहेत; मात्र ते देखील वाहनांच्या धडकेने वाकले आहेत. या पुलावर अनेक अपघात होऊन अनेकजणांना नदीच्या पाण्यात जलसमाधी मिळाली आहे, तर काहीजणांना कायमचे अपंगत्व आले आहे. करंजोशी पुलाचे कठडे पडूनदेखील संबंधित विभागाने दुर्लक्ष केले आहे. या पुलाच्या मध्यभागी मोठा बोगदा पडला होता. सध्या पुलावरून अवजड वाहने गेली की पूल हालत आहे. पावसाळ्यापूर्वी पुलांची डागडुजी करणे आवश्यक आहे. या तिन्ही पुलावरून बॉक्साईट, ऊस, कोळसा, आदींची वाहतूक होत होती. मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांची वाहतूक होत होती. या कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावर वाहनांची संख्या जास्त आहे. त्यामुळे हे तीन पूल जीर्ण झाले आहेत. या तिन्ही पुलांना कधीही पावसाळ्यात धोका होण्याची शक्यता आहे. शासनाच्या संबंधित विभागाने पर्यायी पूल बांधावा, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांतून होत आहे.